शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांमधील ३१५ वर्गखोल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या दुर्गम भागातील अनेक शाळाखोल्यांची अवस्था जीर्ण बनली आहे. ३१५ पेक्षा अधिक शाळाखोल्या निर्लेखित करून त्यांचे ...

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या दुर्गम भागातील अनेक शाळाखोल्यांची अवस्था जीर्ण बनली आहे. ३१५ पेक्षा अधिक शाळाखोल्या निर्लेखित करून त्यांचे नव्याने बांधकाम करण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी ८० शाळाखोल्यांच्या बांधकामाला मंजुरी मिळाली असून लवकरच त्यांचे बांधकाम केले जाणार आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांतील शाळाखोल्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. सर्वाधिक शाळाखोल्यांची दुरवस्था ही सातपुड्यातील दुर्गम भागात आहेत. या शाळाखोल्या बांधकामासाठी विविध योजनांतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील शैक्षणिक वर्षात यातील निम्म्यापेक्षा अधिक शाळाखोल्या बांधून मिळतील यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

यंदा कोरोनामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उघडल्याच नाहीत. त्यांची देखरेख व दुरुस्तीदेखील झाली नाही. परिणामी शाळाखोल्या खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. नंदुरबार जिल्ह्यात प्राथमिक शाळांची संख्या १९०० असून शाळाखोल्यांची संख्या तीन हजार ७८३ इतकी आहे. त्यातील तब्बल ३१९ शाळाखोल्या या खराब झाल्या असून त्यांना निर्लेखित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात तीन हजार ५६३ शाळाखोल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या आहेत, तर २१८ खोल्या या मोफत उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. अर्थात मोफत खोल्या या त्या-त्या गावातील ग्रामपंचायतींनी सभागृहे व खासगी घरे या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. सुमारे ८० खोल्यांचे बांधकाम होणार असून त्यातील काही आकांक्षित जिल्हा निधीतून होणार आहेत.

गळक्या शाळाखोल्यांमुळे अपघाताची भीती...

n अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील ५० पेक्षा अधिक शाळाखोल्या या गळक्या आहेत. पावसाळ्यात शिक्षकांना प्लास्टिक कागद किंवा ताडपत्री लावून गळती थांबवावी लागते. अशावेळी मोठा अपघात होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे अशा शाळाखोल्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला जातो, परंतु त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. खापर व परिसरातील सपाटीवरील गावांमधील शाळाखोल्यांची अवस्थादेखील दयनीय आहे. त्याबाबतही ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.

n सातपुड्यातील अनेक गावांमधील शाळा या कुडाच्या घरात भरविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता राहत नाही. शिक्षकांनादेखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दुर्गम भागातील अशा गाव व पाड्यांमध्ये जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्यामुळे ही समस्या आहे. त्यावर उपाय म्हणून बांबू शाळेचा प्रयोग राबविण्याचे ठरविण्यात आले, परंतु तो देखील यशस्वी होऊ शकला नाही; नंतर फायबर शीटपासून शाळाखोल्या बांधण्याचे ठरविण्यात आले, परंतु त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.