शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह सोहळ्यात २६ जोडप्यांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळ शहादा-नंदुरबार विभाग यांच्या सहकार्याने व श्री संतसेना नाभिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळ शहादा-नंदुरबार विभाग यांच्या सहकार्याने व श्री संतसेना नाभिक समाज सेवा मंडळाच्या वतीने मंगळवारी येथे सामूहिक विवाह सोहळा झाला. नाममात्र एक रुपया नोंदणी फी घेऊन या सोहळ्यात २६ जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात आले.शहादा तालुका खरेदी-विक्री संघाच्या प्रांगणात गुजर नाभिक समाजाचा सातवा तर समाज सेवा मंडळातर्फे पहिला सामूहिक विवाह सोहळा झाला. या वेळी आमदार राजेश पाडवी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, तळोद्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी, जि.प.चे शिक्षण सभापती अभिजित पाटील, बांधकाम सभापती जयश्री पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, मराठा सेवा संघाचे समन्वयक श्यामभाऊ जाधव, अरुण चौधरी, प्रांताधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य मकरंद पाटील, पं.स. सदस्य शिवाजी पाटील, सुनील सखाराम पाटील, रवींद्र राऊळ, ज्ञानेश्वर चौधरी, डॉ.कांतीलाल टाटिया, डॉ.योगेश चौधरी, प्रा.संजय जाधव, वर्षा जाधव, नगरसेवक संजय साठे, आनंदा पाटील, नगरसेवक योगिता वाल्हे, वर्षा जव्हेरी, संतोष वाल्हे, नाना निकुंभ, विजय कदम, संजय राजपूत, अतुल जयस्वाल, दिनेश खंडेलवाल, डॉ.किशोर पाटील, दिलीप गांगुर्डे, यशवंत चौधरी, प्रा.लियाकत सैयद, नासीर पठाण, जितेंद्र जगदाळे, विनोद जैन आदी उपस्थित होते.सकाळी नऊ वाजता वरांची श्री सिद्धेश्वर गणेश मंदिरापासून सजवलेल्या ट्रॅक्टरवरुन वरात काढण्यात आली. त्यानंतर ११ वाजता मोठ्या उत्साहात २६ जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात आले. या विवाह सोहळ्याला महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश सहा ते सात हजार वºहाडी मंडळी उपस्थित होते. वधू-वरांसाठी स्वतंत्र स्टेज व त्यांच्या समोरच नातेवाईकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. पुरोहित, फोटोग्राफर, व्हिडिओ चित्रीकरण, भोजनावळ, पिण्याचे पाणी, फिरते स्वच्छतागृह, मंडपात सी.सी. टीव्ही कॅमेरा, वाहनतळ आदी सुविधा आयोजकांनी केल्या होत्या.दीपक पाटील म्हणाले की, सामूहिक विवाह ही काळाची गरज असून नाभिक समाजाने वेळेवर विवाह लावून नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम आयोजित करून आदर्श निर्माण केला आहे. विजय चौधरी म्हणाले की, सामूहिक विवाह सोहळा पद्धतीमुळे परिवार व समाजात एकोपा निर्माण होते. गुजर नाभिक समाजाने सामूहिक विवाह सोहळ्याचे सातत्य कायम ठेवावे, असे सांगितले. या सोहळ्यासाठी धर्मदाय आयुक्त, महिला बालकल्याण विभाग, समाजातील विविध गावातील संस्था, संघटना, तरूण, महिला मंडळ यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा.अनिल साळुंके, व प्रा.हितेंद्र जाधव तर आभार प्रा.गणेश कन्हैया यांनी मानले. गुजर नाभिक समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.विवाह सोहळ्यात सहभागी जोडप्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र, संसारोपयोगी साहित्य, अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना टी-शर्ट वाटप करण्यात आले. वृक्षाचे रोप देऊन नवदाम्पत्यांची बिदाई करण्यात आली.सोहळ्यासाठी आलेले वधू-वरांचे हजारो नातेवाईक शिस्तीने रांगेत बसले होते. हा सोहळा दोन दिवस असल्याने त्यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ३६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.श्री महावीर सहकारी पतसंस्था, सरदार वल्लभभाई पटेल पतसंस्था, संत सेना नाभिक कारागीर पतसंस्था व श्यामभाऊ दिनकर जाधव व समस्त जाधव परिवारातर्फे सामूहिक विवाह सोहळ्याला देणगी जाहीर करण्यात आली.