शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

स्त्रीच्या उद्ध्वस्त आयुष्याची ‘सल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:18 AM

समाजामध्ये घडणा-या विविध घटनांचे पडसाद समाजातील सर्व घटकांवर कमी-अधिक प्रमाणात पडत असतात़ त्यात जर जातीय दंगली, सामाजिक विद्रोह, धार्मिक युद्ध असतील तर त्याचे परिणाम भयंकर असतात. ते परिणाम मुख्यत्वे करून स्त्रियांनाच भोगावे लागतात. मग ते कुठल्याही अंगाने असतील; पण त्रास, भोग, दु:ख हे स्त्रियांच्याच वाट्याला आलेले असतात़ यावर प्रकाश टाकणा-या ‘सल’ या नाटकामुळे रसिकांची मने हेलावून गेली होती़

ठळक मुद्देराज्य नाट्यस्पर्धा : अंतिम फेरीत एकापेक्षा एक सरस नाटके

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : समाजामध्ये घडणा-या विविध घटनांचे पडसाद समाजातील सर्व घटकांवर कमी-अधिक प्रमाणात पडत असतात़ त्यात जर जातीय दंगली, सामाजिक विद्रोह, धार्मिक युद्ध असतील तर त्याचे परिणाम भयंकर असतात. ते परिणाम मुख्यत्वे करून स्त्रियांनाच भोगावे लागतात. मग ते कुठल्याही अंगाने असतील; पण त्रास, भोग, दु:ख हे स्त्रियांच्याच वाट्याला आलेले असतात़ यावर प्रकाश टाकणा-या ‘सल’ या नाटकामुळे रसिकांची मने हेलावून गेली होती़महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, वाशी नवी मुंबईच्या वतीने विवेक भगत लिखित अशोक पालवे दिग्दर्शित ‘सल’ हे नाटक सादर करण्यात आले़आपला काही गुन्हा नसताना, अपराध नसताना साराचे (दीपाली चौगुले) आयुष्य एका घटनेने उद्ध्वस्त झालेले असते. त्याच घटनेची सल, दु:ख तिच्या मनात कायमचे असते, शत्रू उघडपणे समोर नसतानासुद्धा आयुष्यभर त्याचा शोध घेणे. वर्तमानकाळ सांभाळून भूतकाळातल्या घटनेतल्या अपराध्याचा, भविष्यकाळात शोध घेणे, अशावेळी कुणाचीही साथ मिळत नाही, अगदी ज्यांना जवळचे समजतो तेसुद्धा ऐन वेळेला रंग बदलतात आणि अंतिम निर्णयाची वेळ येते, तेव्हा काळजावर दगड ठेवून कठोर निर्णय एक स्त्रीच घेवू शकते. अशाप्रकारे सारा खान तिच्या मनातले दु:ख या नाटकातून व्यक्त करते.या नाटकात अशोक पालवे यांनी साकारलेली इन्स्पेक्टर चव्हाणची भूमिका ही लक्षवेधी ठरली तर महेंद्र तांडेल आणि दीपाली चौगुले यांनी आपली भूमिका उत्तमरीत्या साकारली. नाटकाची जमेची बाजू म्हणजे श्याम चव्हाण यांची प्रकाशयोजना आणि कलावंतांचा अभिनय. नैपथ्य विवेक भगत, संगीत- अभिषेक भगत, रंगभूषा- देवा सरकटे, वेशभूषा- प्रिया पालवे यांनी साकारली तर रंगमंच व्यवस्था: निरंजन घरत, विदुला निरंजन, अतुल अंकुश यांनी सांभाळली.तर कुसुम सभागृहात सकाळी ‘भेटी लागी जिवा’ या नाटकातून अवघी पंढरी अवतरली होती़ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अभिजित दळवी लिखित, महेंद्र दिवेकर दिग्दर्शित ‘भेटी लागी जिवा’ हे नाटक सादर केले़ वेटिंग फोर गोदा हे सॅम्युलर बॅकेट यांनी १९५२ साली लिहिलेले अ‍ॅबसर्ड या प्रकारातील नाटक १९५४ च्या आसपास मंचित झाले. कित्येक देशांत त्यांचे प्रयोग झाले आणि वेगवेगळ्या धर्तीवरचे हे नाटक अनेक भाषांत भाषांतरितही झाले. त्या नाटकातील दीदी, गोगो हे दोन प्रमुख पात्रे आहेत़ ही पात्रे आता पंढरीच्या वारीत गोदाला शोधत आहेत. त्यांना देव हा मंदिरात नसून माणसात आहे. पांडुरंग हा देवळात नसून वारीला येणा-या भक्तासांबत तो निघून जातो, याचा साक्षात्कार होतो़