शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

नादुरुस्त कॅनॉलमुळे चिंता वाढली, विष्णुपुरी आवर्तनाचा शेतकऱ्यांना होणार का फायदा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 17:42 IST

मागील पंधरा - वीस वर्षांपासून या कॅनॉलचे काम अर्धवट स्वरूपाचेच असून मुख्य कॅनॉलला जोडणाऱ्या चाऱ्या तर अजूनही बेवारसच आहेत.

नांदेड :  शंभर टक्के शेतजमीन पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने विष्णुपुरी प्रकल्पातून रब्बी पिकांसाठी पाण्याचे आवर्तने सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, या प्रकल्पांतर्गत निर्माण करण्यात आलेले कॅनॉल व त्याला जोडण्यात आलेल्या चाऱ्या गवत, झुडुपांनी गच्च भरल्यामुळे सोडलेले पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचूच शकणार नाही. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पातून सोडणाऱ्या पाण्याचा आम्हाला काय फायदा? असा सूर कॅनाॅल परिसरातील शेतकऱ्यांतून निघत आहे.

नादेड जिल्ह्यातील नांदेड, लोहा, नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची बरीच शेती निसर्गावर अवलंबून आहे. नेहमीच नैसगिक आपत्तीच्या आहारी त्यांची पिके जाऊन मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना नियोजित व हक्काचे पाणी मिळावे ल शेतकरी सदन व्हावा, या उद्देशाने या तालुक्यातील परिसरामध्ये विष्णुपुरी प्रकल्पांतर्गत कॅनॉल निर्मिती करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांची लाखो एक्कर जमिनी गेल्या. त्याबदल्यात शेतकऱ्यांना मिळणारा मावेजाही तुटपुंज्या स्वरूपाचा होता. मात्र, शेतकरी पाण्यामुळे आपल्याला फायदा होईल, या आशेने हप्प राहिले. मागील पंधरा - वीस वर्षांपासून या कॅनॉलचे काम अर्धवट स्वरूपाचेच असून मुख्य कॅनॉलला जोडणाऱ्या चाऱ्या तर अजूनही बेवारसच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी तर मिळत नाहीच, उलट यामुळे कॅनॉल मध्ये व बाजूने गवत मादत आहे. त्यामुळे बाजूचे शेतकरी यावर गुरे चारण्यासाठी आणत आहेत व पिकांचेही नुकसान करीत आहेत. यातून अनेकदा भांडणाचे प्रकार घडत असून शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. या कॅनॉलची दुरुस्ती करून मगच पाणी सोडल्यास शेवटपर्यंच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल व पाणी वाया जाणार नाही, अशी चर्चा शेतकऱ्यांतून होत आहे.

रब्बी पिकांसाठी आवर्तने सोडण्याचे झाले नियोजनमाजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी नुकतेच रब्बी पिकांसाठी विष्णुपुरी प्रकल्पातून आवर्तने सोडण्याचे जाहीर केले आहे. या पाण्याचा नांदेड, लोहा, नायगाव तालुक्यातील बऱ्याच खेड्यांना फायदा होणार आहे. मात्र, या कॅनॉलमध्ये गवत, झुडुपे वाढल्यामुळे पाणी शेवटपर्यंत जाण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच लोहा व नायगाव तालुक्यातील भागामध्ये या कॅनॉलल्या जोडलेल्या चाऱ्यांचे कामच झाले नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा होणार नाही. कॅनॉलची साफसफाई करून चाऱ्यांचे बांधकाम करावे व नंतरच पाणी सोडावे, असा सूर या परिसरातील शेतकऱ्यांतून निघत आहे.

जमीन पडीक राहत आहेमाझ्या शेतातून कॅनाल जाणार म्हणून वीस वर्षांपूर्वी जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले. यात माझी बरीच जमीन गेली. नंतर कॅनॉल खोदून सिमेंटचे आतून बांधकाम केले. मात्र, बाजूने जोडलेल्या चाऱ्यांचे कामच केले नाही. मागील दोन वर्षांपासून पाणी सोडत आहेत. मात्र, अर्धवट कामामुळे माझ्या शेतापर्यंत पाणीच पोहोचतच नाही. त्याचा परिसरातील शेतकऱ्यांनाही काही फायदा होत नसून हे पाणी मिळेल त्या मार्गाने नदीत जाऊन पडते. यामुळे जमीन पडिक राहात असून जनावरांचा त्रास मात्र वाढला आहे.- शेख मुकद्दर, शेतकरी

टॅग्स :vishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीNandedनांदेडagricultureशेती