शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त कॅनॉलमुळे चिंता वाढली, विष्णुपुरी आवर्तनाचा शेतकऱ्यांना होणार का फायदा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 17:42 IST

मागील पंधरा - वीस वर्षांपासून या कॅनॉलचे काम अर्धवट स्वरूपाचेच असून मुख्य कॅनॉलला जोडणाऱ्या चाऱ्या तर अजूनही बेवारसच आहेत.

नांदेड :  शंभर टक्के शेतजमीन पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने विष्णुपुरी प्रकल्पातून रब्बी पिकांसाठी पाण्याचे आवर्तने सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, या प्रकल्पांतर्गत निर्माण करण्यात आलेले कॅनॉल व त्याला जोडण्यात आलेल्या चाऱ्या गवत, झुडुपांनी गच्च भरल्यामुळे सोडलेले पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचूच शकणार नाही. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पातून सोडणाऱ्या पाण्याचा आम्हाला काय फायदा? असा सूर कॅनाॅल परिसरातील शेतकऱ्यांतून निघत आहे.

नादेड जिल्ह्यातील नांदेड, लोहा, नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची बरीच शेती निसर्गावर अवलंबून आहे. नेहमीच नैसगिक आपत्तीच्या आहारी त्यांची पिके जाऊन मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना नियोजित व हक्काचे पाणी मिळावे ल शेतकरी सदन व्हावा, या उद्देशाने या तालुक्यातील परिसरामध्ये विष्णुपुरी प्रकल्पांतर्गत कॅनॉल निर्मिती करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांची लाखो एक्कर जमिनी गेल्या. त्याबदल्यात शेतकऱ्यांना मिळणारा मावेजाही तुटपुंज्या स्वरूपाचा होता. मात्र, शेतकरी पाण्यामुळे आपल्याला फायदा होईल, या आशेने हप्प राहिले. मागील पंधरा - वीस वर्षांपासून या कॅनॉलचे काम अर्धवट स्वरूपाचेच असून मुख्य कॅनॉलला जोडणाऱ्या चाऱ्या तर अजूनही बेवारसच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी तर मिळत नाहीच, उलट यामुळे कॅनॉल मध्ये व बाजूने गवत मादत आहे. त्यामुळे बाजूचे शेतकरी यावर गुरे चारण्यासाठी आणत आहेत व पिकांचेही नुकसान करीत आहेत. यातून अनेकदा भांडणाचे प्रकार घडत असून शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. या कॅनॉलची दुरुस्ती करून मगच पाणी सोडल्यास शेवटपर्यंच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल व पाणी वाया जाणार नाही, अशी चर्चा शेतकऱ्यांतून होत आहे.

रब्बी पिकांसाठी आवर्तने सोडण्याचे झाले नियोजनमाजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी नुकतेच रब्बी पिकांसाठी विष्णुपुरी प्रकल्पातून आवर्तने सोडण्याचे जाहीर केले आहे. या पाण्याचा नांदेड, लोहा, नायगाव तालुक्यातील बऱ्याच खेड्यांना फायदा होणार आहे. मात्र, या कॅनॉलमध्ये गवत, झुडुपे वाढल्यामुळे पाणी शेवटपर्यंत जाण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच लोहा व नायगाव तालुक्यातील भागामध्ये या कॅनॉलल्या जोडलेल्या चाऱ्यांचे कामच झाले नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा होणार नाही. कॅनॉलची साफसफाई करून चाऱ्यांचे बांधकाम करावे व नंतरच पाणी सोडावे, असा सूर या परिसरातील शेतकऱ्यांतून निघत आहे.

जमीन पडीक राहत आहेमाझ्या शेतातून कॅनाल जाणार म्हणून वीस वर्षांपूर्वी जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले. यात माझी बरीच जमीन गेली. नंतर कॅनॉल खोदून सिमेंटचे आतून बांधकाम केले. मात्र, बाजूने जोडलेल्या चाऱ्यांचे कामच केले नाही. मागील दोन वर्षांपासून पाणी सोडत आहेत. मात्र, अर्धवट कामामुळे माझ्या शेतापर्यंत पाणीच पोहोचतच नाही. त्याचा परिसरातील शेतकऱ्यांनाही काही फायदा होत नसून हे पाणी मिळेल त्या मार्गाने नदीत जाऊन पडते. यामुळे जमीन पडिक राहात असून जनावरांचा त्रास मात्र वाढला आहे.- शेख मुकद्दर, शेतकरी

टॅग्स :vishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीNandedनांदेडagricultureशेती