शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दीडशे सिंचन विहिरी खोदूनही पाणीप्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:13 IST

ऐन हिवाळ्यातच पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीही वीस गावांची तहान टँकरवरच भागविणार की काय? असे चित्र आहे.

ठळक मुद्देहदगाव तालुका वीस गावांतील तहान यंदाही टँकरवरच भागणार

हदगाव : जानेवारी, मार्च, एप्रिल व जून या कालावधीमध्ये १५० नवीन सिंचन विहिरी खोदल्या. परंतु, अद्यापही त्याची कामे पूर्ण झाली नाहीत. यामुळे ग्रामस्थांना ऐन हिवाळ्यातच पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीही वीस गावांची तहान टँकरवरच भागविणार की काय? असे चित्र आहे.तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा (९५० मिमी) ६५० मिमी पाऊस झाला. सुरुवातीला धो-धो पाऊस झाल्याने तो जमिनीत मुरण्याऐवजी वाहून गेला. तालुक्यात दोन नद्या व २८ तलाव असूनही पाण्याची समस्या काही भागात गंभीरच आहे. मनाठा, तामसा, तळणी, निवघा या सर्कलमधील २० गावांंना टँकरने पाणीपुरवठा सुरु होता. यावर्षी तेच चित्र आहे. पळसा व मनाठा या दोन गावांसाठी मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झाली. कामेही सुरु केले. परंतु या उन्हाळ्यात त्या योजनेचे पाणी मिळण्याची सूतराम शक्यता नाही.जलयुक्त शिवार अभियानात ५०-७० गावांमध्ये पाणी आडवा, पाणी जिरवा प्रयोग झाला. परंतु पाणीप्रश्न ‘जैसे थे’ आहे. दोन्ही नद्यांचे पाणी कुठेही न थांबता वाहून जात असल्याने नदीकाठावरील गावांतही पाणीटंचाई आहे.प्रत्येक कुटुंबात खाजगी बोअर झाल्यामुळे पाणीपातळी खोल गेली आहे. दोनशे फूट खोलीपर्यंत बोअर घेण्याचा शासनाचा नियम असला तरी शेतात व घरी पाचशे ते सातशे फुटांपर्यंत बोअर घेतले जातात. शंभर मीटर अंतरापर्यत दुसरा बोअर घेता येत नाही. परंतु, घराघरांमध्ये बोअर झाल्यामुळे जमिनीची चाळणी होऊन पाणीपातळी खालावली आहे.दरवर्षी पाणीटंचाईच्या बैठका होतात.शाश्वत पाणी आणण्याचे आश्वासन हवेतच विरले की काय ? असा प्रश्न पडला आहे. तीन-चार वर्षांपासून हालचाली बंद आहेत. सध्या बरडशेवाळा गावात पाण्याची तीव्रटंचाई सुरु आहे. एक किलोमीटर अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. कुठे नियोजन नसल्यामुळे पाणीटंचाई आहे तर कुठे पाणीपुरवठा योजनेची कामे रखडल्यामुळे पाणीटंचाई आहे. १२ डिसेंबरला पाणीटंचाई निवारणार्थ आराखड्यावर बैठक आहे. या बैठकीमध्ये मागील कामाचा आढावा घेतला तर परिस्थिती लक्षात येईल.

  • येत्या एक-दोन महिन्यांत तामसा, मनाठा, वडगाव, तळणी, पेवा, ठाकरवाडी, कनकेवाडी, सावरगाव, उमरी, कोंढूर, दिग्रस, निवघा, साप्ती आदी गावात पाणीटंचाई होऊ शकते. शाश्वत पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी तहानलेल्या गावांची मागणी आहे.
  • जलयुक्त शिवार अभियानात ५०-७० गावांमध्ये पाणी आडवा, पाणी जिरवा प्रयोग झाला. परंतु पाणीप्रश्न ‘जैसे थे’ आहे. दोन्ही नद्यांचे पाणी कुठेही न थांबता वाहून जात असल्याने नदीकाठावरील गावांतही पाणीटंचाई आहे.
  • प्रत्येक कुटुंबात खाजगी बोअर झाल्यामुळे पाणीपातळी खोल गेली आहे. दोनशे फूट खोलीपर्यंत बोअर घेण्याचा नियम असला तरी सातशे फुटांपर्यंत बोअर घेतले जातात.
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई