शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

दीडशे सिंचन विहिरी खोदूनही पाणीप्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:13 IST

ऐन हिवाळ्यातच पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीही वीस गावांची तहान टँकरवरच भागविणार की काय? असे चित्र आहे.

ठळक मुद्देहदगाव तालुका वीस गावांतील तहान यंदाही टँकरवरच भागणार

हदगाव : जानेवारी, मार्च, एप्रिल व जून या कालावधीमध्ये १५० नवीन सिंचन विहिरी खोदल्या. परंतु, अद्यापही त्याची कामे पूर्ण झाली नाहीत. यामुळे ग्रामस्थांना ऐन हिवाळ्यातच पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीही वीस गावांची तहान टँकरवरच भागविणार की काय? असे चित्र आहे.तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा (९५० मिमी) ६५० मिमी पाऊस झाला. सुरुवातीला धो-धो पाऊस झाल्याने तो जमिनीत मुरण्याऐवजी वाहून गेला. तालुक्यात दोन नद्या व २८ तलाव असूनही पाण्याची समस्या काही भागात गंभीरच आहे. मनाठा, तामसा, तळणी, निवघा या सर्कलमधील २० गावांंना टँकरने पाणीपुरवठा सुरु होता. यावर्षी तेच चित्र आहे. पळसा व मनाठा या दोन गावांसाठी मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झाली. कामेही सुरु केले. परंतु या उन्हाळ्यात त्या योजनेचे पाणी मिळण्याची सूतराम शक्यता नाही.जलयुक्त शिवार अभियानात ५०-७० गावांमध्ये पाणी आडवा, पाणी जिरवा प्रयोग झाला. परंतु पाणीप्रश्न ‘जैसे थे’ आहे. दोन्ही नद्यांचे पाणी कुठेही न थांबता वाहून जात असल्याने नदीकाठावरील गावांतही पाणीटंचाई आहे.प्रत्येक कुटुंबात खाजगी बोअर झाल्यामुळे पाणीपातळी खोल गेली आहे. दोनशे फूट खोलीपर्यंत बोअर घेण्याचा शासनाचा नियम असला तरी शेतात व घरी पाचशे ते सातशे फुटांपर्यंत बोअर घेतले जातात. शंभर मीटर अंतरापर्यत दुसरा बोअर घेता येत नाही. परंतु, घराघरांमध्ये बोअर झाल्यामुळे जमिनीची चाळणी होऊन पाणीपातळी खालावली आहे.दरवर्षी पाणीटंचाईच्या बैठका होतात.शाश्वत पाणी आणण्याचे आश्वासन हवेतच विरले की काय ? असा प्रश्न पडला आहे. तीन-चार वर्षांपासून हालचाली बंद आहेत. सध्या बरडशेवाळा गावात पाण्याची तीव्रटंचाई सुरु आहे. एक किलोमीटर अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. कुठे नियोजन नसल्यामुळे पाणीटंचाई आहे तर कुठे पाणीपुरवठा योजनेची कामे रखडल्यामुळे पाणीटंचाई आहे. १२ डिसेंबरला पाणीटंचाई निवारणार्थ आराखड्यावर बैठक आहे. या बैठकीमध्ये मागील कामाचा आढावा घेतला तर परिस्थिती लक्षात येईल.

  • येत्या एक-दोन महिन्यांत तामसा, मनाठा, वडगाव, तळणी, पेवा, ठाकरवाडी, कनकेवाडी, सावरगाव, उमरी, कोंढूर, दिग्रस, निवघा, साप्ती आदी गावात पाणीटंचाई होऊ शकते. शाश्वत पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी तहानलेल्या गावांची मागणी आहे.
  • जलयुक्त शिवार अभियानात ५०-७० गावांमध्ये पाणी आडवा, पाणी जिरवा प्रयोग झाला. परंतु पाणीप्रश्न ‘जैसे थे’ आहे. दोन्ही नद्यांचे पाणी कुठेही न थांबता वाहून जात असल्याने नदीकाठावरील गावांतही पाणीटंचाई आहे.
  • प्रत्येक कुटुंबात खाजगी बोअर झाल्यामुळे पाणीपातळी खोल गेली आहे. दोनशे फूट खोलीपर्यंत बोअर घेण्याचा नियम असला तरी सातशे फुटांपर्यंत बोअर घेतले जातात.
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई