शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

पिंपळढव, सुधा-रेणापूर प्रकल्पाला मिळाले पाणी उपलब्धता प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:33 IST

मागील अनेक वर्षांपासून भोकर तालुक्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या व या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी साह्यभूत ठरणा-या पिंपळढव साठवण तलाव व सुधा-रेणापूर प्रकल्पाची उंची वाढविण्यासंदर्भात आता हिरवा कंदिल मिळाला असून शासनाचे या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले आहे.

ठळक मुद्देमाजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी शासनाकडून हिरवा कंदिल२००६ पासून सुरु होता पाठपुरावा

नांदेड : मागील अनेक वर्षांपासून भोकर तालुक्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या व या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी साह्यभूत ठरणा-या पिंपळढव साठवण तलाव व सुधा-रेणापूर प्रकल्पाची उंची वाढविण्यासंदर्भात आता हिरवा कंदिल मिळाला असून शासनाचे या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले आहे. या कामासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण मागील अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून आता हे दोन्ही प्रकल्प मार्गी लागणार आहेत.गोदावरी खोºयातील मराठवाड्याच्या हक्काचे १०२ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. परंतु त्यापैकी केवळ ७६ टीएमसी पाण्याचा उपयोग होतो. उर्वरित २९ टीएमसी पाणी वापरण्याची परवानगी मिळावी, यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे प्रयत्न सुरु होते. त्यातील भोकर तालुक्यासाठी १७ दलघमी पाणी मिळण्यास नाशिक येथील नियोजन व जलविज्ञान विभागाचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत नव्हते. यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी २०१६ पासून अनेकवेळा शासनास पत्र पाठवून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. या संदर्भात त्यांनी १२ डिसेंबर २०१६, २६ नोव्हेंबर २०१७, २५ सप्टेंबर २०१८ व ३ नोव्हेंबर २०१८ रोजी शासनास पत्र लिहून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात विनंती केली होती.यासंदर्भात २५ सप्टेंबर २०१८ व ३ नोव्हेंंबर २०१८ रोजी शासनस्तरावर बैठका घेण्यात आल्या. या बैठकांना जलसंपदामंत्र्यांसह स्वत: अशोकराव चव्हाण, भोकरच्या आ. अमिता चव्हाण यांची उपस्थिती होती. यांनी या बैठकांमध्ये सुधा-रेणापूर प्रकल्पाची उंची वाढविणे, पिंपळढव साठवण तलावाची निर्मिती करणे यासह पाकी जाकापूर तलाव व तालुक्यातील इतर छोटे मोठे सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्याचा आग्रह धरला होता.पाणी उपलब्धता प्रमाणपत्रा संदर्भात शासनाने फेरआढावा घेण्याची विनंती अशोकराव चव्हाण यांनी केली. त्यांच्या विनंतीनुसार फेर आढावा घेण्यात आला व त्यानुसारच आता सुधा प्रकल्पाची उंची वाढविणे व पिंपळढव साठवण तलाव निर्माण करणे यासाठी आवश्यक असलेले पाणी उलपब्धता प्रमाणपत्र २० जून २०१९ रोजीच्या शासन आदेशानुसार प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता हे दोन्ही प्रकल्प मार्गी लागणार आहेत.माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे भोकर तालुक्यात त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळालेजल परिषदेच्या एकात्मिक जल आराखड्यास मध्य गोदावरी खो-यातील पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळवून घेण्यासाठी प्रयत्न केला. त्यानुसार ३० नोव्हेंबर २०१७ रोजी २९.८१ अ.घ.फू. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवून घेतले. गोदावरी पाणी तंटा लवादाच्या मान्यतेनुसार पाणी वापराची मर्यादा १०२ अ.घ.फू. आहे. मराठवाड्यातील तलावांची मूळ क्षमता जरी १०४ अ.घ.फू. असली तरी प्रत्यक्षात मात्र २९.८१ अ.घ.फू. पाण्याची तूट होती. असे असले तरी कोणत्याही प्रकल्प निधीसाठी शासनाचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत नव्हते.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीDamधरणAshok Chavanअशोक चव्हाण