शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:55 PM

यावर्षी नियोजित वेळेपूर्वी हजेरी लावलेल्या दमदार पावसाने सामान्यांसह शेतकऱ्यांना सुखद दिलासा मिळाला असला तरी मागील आठ दिवसांपासून पावसाने खंड दिला आहे. परिणामी, बळीराजा चिंतातूर झाला असून शेतकऱ्यांना आता पेरणीयोग्य दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : यावर्षी नियोजित वेळेपूर्वी हजेरी लावलेल्या दमदार पावसाने सामान्यांसह शेतकऱ्यांना सुखद दिलासा मिळाला असला तरी मागील आठ दिवसांपासून पावसाने खंड दिला आहे. परिणामी, बळीराजा चिंतातूर झाला असून शेतकऱ्यांना आता पेरणीयोग्य दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळत आहे.यंदा राज्यात समाधानकारक पर्जन्यवृष्टी होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून अनेक भागात पाण्याअभावी संकटांचा सामना करणा-या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, यावर्षीच्या मोसमात पावसाने वेळेपूर्वी काही दिवस अगोदरच जोरदार लावली. त्यामुळे सुरूवातीला झालेल्या दमदार पावसावरच काही शेतक-यानी पेरणींच्या कामांना सुरूवात केली. परंतु, मागील आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतक-यांची चिंता आता वाढली आहे.दरम्यान, मशागतींची सर्व कामे आटोपून सुरूवातीलाच झालेल्या पावसावर काही शेतकºयांनी पेरणींची कामे पूर्ण केली. परंतु, त्यानंतर पावसाने दांडी मारल्यामुळे पेरणी केलेल्या शेतक-यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता त्यांना भेडसावत आहे.रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मृग नक्षत्राची सुरुवात होईपर्यंत जिल्ह्यातही पावसाचे जोरदार आगमन झाले. परंतु, त्यानंतर पावसाने खंड दिल्यामुळे शेतक-यांच्या नजरा आता आकाशाकडे आहेत.

बळीराजा पेरणीसाठी सज्जयावर्षी समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यासह अनेकांनी वर्तविला. त्यामुळे मागील काही वर्षानंतर यावर्षी तरी मृग नक्षत्रातच पेरणी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, शेतक-यांनी मशागतीची कामे वेगाने केली. तसेच जमेल त्या परिस्थितीत खते, बियाणांचे नियोजनही केले. दरम्यान, शेतकरी पेरणीच्या तयारीत असतानाच अचानक पावसाने दांडी मारल्याने सामान्यांसह शेतक-यांनाही आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.---ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढमागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे. तर दुसरीकडे तापमानाचा पारा जवळपास ३६ ते ३८ अंशापर्यंत गेला आहे. परिणामी, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने सामान्य नागरिकांसह शेतक-यांचीही चिंता वाढविली असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीRainपाऊस