शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

जरांगे पाटलांना ठाकरे गटाच्या खासदाराचा उघड पाठिंबा; म्हणाले, "शेवटपर्यंत त्यांच्यासोबत आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 14:07 IST

हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन चालू आहे. प्रशासन मात्र याची दखल घेत नाही. सध्या प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. त्यांचा अजून सत्तेचा माज गेला नाही. - आष्टीकर

मविआमध्ये जागावाटपाबाबत बोलणी सुरु होणार आहेत. अशातच संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करावा असे म्हणत चर्चेला तोंड फोडले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने यावर नकार कळविला असून निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवू अशी भुमिका घेतली आहे. यातच आता ठाकरे गटात उमेदवारी मिळविण्यासाठी नेते प्रयत्न करू लागले आहेत. ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि ठाकरेंचा माजी खासदार सुभाष वानखेडे यांना तिकीट मिळू नये अशी मागणी केली आहे. 

महाविकास आघाडीकडून प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेचे तिकीट मिळू नये, असे माझे मत असल्याचे आष्टीकर म्हणाले. तसेच ठाकरे गटाचे नेते माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी लोकसभेला पक्ष विरोधी काम केले आहे. त्यांना देखील विधानसभेचे तिकीट मिळणार नाही. ज्या दिवशी वानखेडे तिकीट मागतील तेव्हा त्यांची तक्रार पक्षाकडे करणार. पक्षविरोधी कारवाई केल्यानंतर उबाठा  गटातून उमेदवारी मिळत नाही, हे लोकांना समजायला हवे, असे आष्टीकर म्हणाले. 

हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन चालू आहे. प्रशासन मात्र याची दखल घेत नाही. सध्या प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. त्यांचा अजून सत्तेचा माज गेला नाही. शेतकऱ्यांना तो उतरवावा लागेल आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असा इशारा आष्टीकर यांनी दिला. या सरकारला दोनच महिने शिल्लक आहेत, काहीही घोषणा करायला काय हरकत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी अर्थसंकल्पावर दिली. 

6 जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता संवाद रॅलीला सुरुवात होणार आहे. मी त्यांच्यासोबत आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबत आहे असे देखील आष्टीकर म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaratha Reservationमराठा आरक्षण