शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
4
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
5
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
6
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
7
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
8
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
9
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
10
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
11
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
12
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
13
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
14
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
15
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
16
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
17
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
18
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
19
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
20
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

प्रेमीयुगुलाचा करुण अंत! संसार मोडून एकत्र आले, पण समाज विरोधाला कंटाळून जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:00 IST

शेजाऱ्यांमध्ये प्रेम फुलले, संसार मोडून एकत्र राहिले; वर्षभरानंतर गावी परताच नातेवाईक, समाजाचा विरोध वाढल्याने प्रेमीयुगुलाचा टोकाचा निर्णय

हदगाव (नांदेड): 'प्यार किया तो डरना क्या' म्हणत संसार आणि मुलांना सोडून पळून गेलेल्या एका विवाहित प्रेमीयुगुलाचा प्रवास अत्यंत दु:खद पद्धतीने संपुष्टात आला. गावातील व नातेवाईकांचा विरोध तीव्र झाल्याने त्यांनी बामणीफाटा येथील शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या दोघांचाही ६ ऑक्टोबर रोजी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नेमके काय आहे प्रकरण?हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील रहिवासी असलेले गजानन केरबा गव्हाळे (वय ३५, व्यवसाय चालक) आणि उमा बालाजी कपाटे (वय २८) हे दोघेही विवाहित होते आणि त्यांना प्रत्येकी तीन अपत्ये होती. एकमेकांचे शेजारी असल्याने त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. मात्र, दोघांचेही संसार सुखाचे सुरू असतानाही त्यांनी समाजाला आणि कुटुंबाला झुगारून १९ ऑक्टोबर २०२४ रोजी मुलांना टाकून पलायन केले. जवळपास एक वर्षभर दोघेही एकत्र राहिले. परंतु, प्रेमाची नशा उतरल्यावर त्यांना कुटुंबाची आणि गावाची आठवण झाली. दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी हे दोघेही गावी चिंचगव्हाण येथे परतले.

गावात तीव्र विरोध, टोकाचे पाऊलगावी परत येताच त्यांना नातेवाईकांचा आणि समाजात तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. विशेषतः, गजाननच्या पत्नीने त्यांना घरात घेण्यास स्पष्ट नकार दिला. समाजाच्या या विरोधामुळे आणि अवहेलना सहन न झाल्याने, दोघांनीही बाईकवरून गाव सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बामणीफाटा येथील एका पेट्रोल पंपावर बाईक सोडून जवळच्या शेतात विषारी औषध प्राशन केले. विषारी औषध प्राशन केल्याची माहिती गावातील काही तरुणांना मिळताच त्यांनी दोघांना तात्काळ हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु दुसऱ्या दिवशी, ६ ऑक्टोबर रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आई-वडील आणि ६ अपत्यांना सोडून गेले!या घटनेमुळे चिंचगव्हाण गावावर आणि दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे, या दोघांनाही मिळून सहा अपत्ये आहेत. या आत्महत्येमुळे सहा निष्पाप मुलांचे छत्र हरवले आहे. रात्री उशिरा या दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या कृत्यामुळे मुलीकडील नातेवाईक इतके नाराज होते की, ते अंत्यविधीसाठीही आले नाहीत. या प्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Lovers' Tragic End: Eloped, Faced Opposition, Ended Their Lives

Web Summary : Married lovers, facing societal disapproval after eloping and abandoning their families, committed suicide in Hingoli. They were discovered in a field after consuming poison, later dying in hospital, leaving six children orphaned.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूNandedनांदेड