शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार, पालकांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:22 IST

दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते- १.दरवर्षी ज्या पद्धतीने परीक्षा होतात, त्याचप्रमाणे परीक्षा घेणे आवश्यक आहे. कारण मागील वर्षभर विद्यार्थ्यांना ...

दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते- १.दरवर्षी ज्या पद्धतीने परीक्षा होतात, त्याचप्रमाणे परीक्षा घेणे आवश्यक आहे. कारण मागील वर्षभर विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेतानाही अनेकांना या अडचणींचा सामना करावा लागला असता. - चंद्रप्रकाश गायकवाड, नांदेड

२. कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता दहावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा वातावरणात परीक्षेला कसे पाठवायचे, याची भीती पालकांना आहे. - मनोहर कवडे, नांदेड.

३. विद्यार्थ्यांसाठी हे वर्षच खूप कठीण गेले आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा घेणारेच ठरले आहे. सुरुवातीला ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम शिकविण्यात आला; परंतु ऑनलाइन पद्धतीमुळे अनेकांचे समाधान झाले नाही. तसेच अभ्यासक्रमही पूर्ण झाला नाही. - अशोक उफाडे

बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते.

१.परीक्षा केंद्रावर होणारी विद्यार्थ्यांची गर्दी तसेच आपल्याकडे असलेल्या सुविधांचा अभाव, यामुळे नक्कीच पालकांना भीती वाटत आहे. शहरातील सर्वच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. आता कोरोनामुळे हे नियोजन कसे करणार, हा प्रश्न आहे. - गंगाधर गायकवाड, नांदेड

२. शाळांचे वर्ग तसेच खाजगी शिकवण्या बंद असल्याने विद्यार्थ्यांना स्वत:च अनेक कठीण वाटणारे प्रकरणे सोडवावी लागली. त्यामुळे परीक्षा कशाही झाल्या तरी विद्यार्थ्यांना त्या द्याव्याच लागणार आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लेखी परीक्षाच महत्त्वाच्या आहेत. - सीमा बुक्तरे, सिद्धांतनगर, नांदेड.

३. शिक्षणमंत्र्यांनी ऑफलाइन परीक्षा जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे. कारण लेखी परीक्षेद्वारेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात येते. त्यामुळे जो निर्णय घेण्यात आला तो योग्यच आहे. विद्यार्थ्यांनी कोरोनाला न घाबरता परीक्षेला सामोरे जावे.- सुनील लोंढे