शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
4
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
5
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
6
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
7
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
8
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
9
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
10
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
11
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
12
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
13
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
14
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
15
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
16
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
17
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
18
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
19
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
20
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री

मतदानाद्वारे दगाबाज भाजपाला धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:22 IST

अशा दगाबाज पक्षाला धडा शिकविण्याची संधी पालिका निवडणुकांच्या माध्यमातून लोहावासियांना मिळाली आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणा-या भाजपाला धडा शिकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देविराट सभाअशोकराव चव्हाण यांचे आवाहन

नांदेड : केंद्रातील आणि राज्यातील भाजपच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. समाजातील सर्वच घटकाला या सरकारने दगा देण्याचे काम केले आहे. अशा दगाबाज पक्षाला धडा शिकविण्याची संधी पालिका निवडणुकांच्या माध्यमातून लोहावासियांना मिळाली आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणा-या भाजपाला धडा शिकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले.लोहा नगरपालिका निवडणुकीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व भटक्या विमुक्त जाती महासंघ आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ येथील श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या विराट सभेत ते बोलत होते. व्यासपिठावर माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार, माजी मंत्री आ.डी.पी. सावंत, युवानेते धीरज देशमुख, माजी मंत्री आ.बस्वराज पाटील, आ.वसंतराव चव्हाण, आ.अमरनाथ राजुरकर, महापौर शीलताई भवरे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, प्रदेश सरचिटणीस बी.आर. कदम, माजी आ.रोहिदास चव्हाण, माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ.रावसाहेब अंतापूरकर, माजी महापौर अब्दुल सत्तार, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, उपमहापौर विनय गिरडे पाटील, सभापती शमीम अब्दुल्ला, माजी महापौर अब्दुल सत्तार, तालुकाध्यक्ष माधवराव पांडागळे, रंगनाथ भुजबळ, माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे, कल्याण सूर्यवंशी, माजी सभापती किशोर स्वामी, माजी सभापती संजय बेळगे, संजय देशमुख लहानकर, आनंद चव्हाण, विजय येवनकर, प्रशांत तिडके आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना खा.अशोकराव चव्हाण म्हणाले की, जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने सध्या मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजुन काढत आहे. या सरकारने जनतेला वा-यावर सोडले आहे. त्यामुळे अच्छे दिनचे स्वप्न दाखविलेल्या भाजपाच्या काळात जनतेसाठी बुरे दिन आले आहेत. पण काळजी करू नका , येणारे सरकार काँग्रेस पक्षाचेच राहणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून महाराष्टभर फिरत असताना वारे काँग्रेसच्या दिशेने वाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. येणा-या काळात महाराष्ट्राबरोबरच केंद्रातील सरकारही काँग्रेसचेच येणार आहे. त्यामुळे उद्या सर्वांगीन विकासासाठी लोहावासियांनी काँग्रेसच्या पाठीशी रहावे, आवाहन खा. चव्हाण यांनी केले.नांदेड जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा लोहा आणि कंधारची परिस्थिती वेगळी आहे. निष्ठा आणि विश्वास कशाला म्हणतात? हेच काहींना माहित नाही. अशा व्यक्ती या कधीच एका पक्षासोबत राहिलेल्या नाहीत. अशा दलबदलू लोकांना जागा दाखवून देण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांना मिळाली आहे. केवळ लोहा नगरपालिकाच नव्हे तर आगामी विधानसभा निवडणूक आणि लातूर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी पूर्ण ताकतीने काँग्रेससोबत रहा, असे आवाहनही त्यांनी केले.माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार, माजी मंत्री आ.डी.पी. सावंत, युवानेते धीरज देशमुख, माजी मंत्री आ.बस्वराज पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली.प्रारंभी सभेचे प्रास्ताविक नगराध्यक्षपदाचे उमेदवार सोनू संगेवार यांनी केले तर सुत्रसंचालन आणि आभार प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले. यावेळी माजी सभापती मसुद खान, उमेश पवळे, सुनिल शेट्टे, बालाजी पांडागळे, संजय मोरे, राजू काळे, श्रीनिवास जाधव, फारूखअली खान, साबेर चाऊस यांची उपस्थिती होती.पुढील सर्व निवडणुकात भाजपचे पाणीपतकंधार-लोहा तालुक्यातील कामधेनु असलेला कलंबर सहकारी साखर कारखाना कोणी बंद पाडला? चंद्रपूर जिल्ह्यातील बंद पडलेली दारूची दुकाने नांदेड जिल्ह्यात कोणी सुरू केली? याची माहिती तुम्हा सर्व मतदारांना आहे. देशी दारूची दुकाने चालविण्याइतके सोपे काम साखर कारखाने चालविण्याचे नाही. त्यामुळे अशा नेत्यांना जनताच जागा दाखवून देईल. असे सांगतानाच शेतक-यांना स्वत:च चिता रचून त्यावर पेटवून घेवून आत्महत्या हत्या करण्याची वेळ या सरकारने आणली आहे. त्यामुळे आता हे सरकार घालविण्याचे काम लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीतून तुम्ही करावे. देशात ज्या पाच राज्यांत आता निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपाचे पाणीपत दिसत आहे. त्याचीच पुनरावृत्ती लोह्यात करा असेही ते म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपा