शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

सत्ताधारी पायउतार होईपर्यंत संघर्ष सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:40 IST

केंद्र व राज्य सरकारने मागील साडेचार वर्षांत जनतेला विकासाच्या नावावर केवळ भूलथापा दिल्या़ लोकांचे हित व हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी काँग्रेसने राज्यभर जनसंघर्ष यात्रा सुरु केली असून सत्ताधारी पायउतार होइपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे

ठळक मुद्देभोकर येथे जनसंघर्ष यात्रा : अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : केंद्र व राज्य सरकारने मागील साडेचार वर्षांत जनतेला विकासाच्या नावावर केवळ भूलथापा दिल्या़ लोकांचे हित व हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी काँग्रेसने राज्यभर जनसंघर्ष यात्रा सुरु केली असून सत्ताधारी पायउतार होइपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण केले़ शहरातील मोंढा मैदानात काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त शुक्रवारी विराट जाहीर सभेचे आयोजन केले होते़ यावेळी ते बोलत होते.मंचावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नसीम खान, आ. अमिता चव्हाण, प्रा.बालाजी गाढे, बी. आर. कदम, गोविंदराव नागेलीकर, जगदीश पाटील भोसीकर, आप्पाराव सोमठाणकर, गणपतराव तिडके, प्रकाशराव देशमुख, बाळासाहेब रावणगावकर, गोविंदबाबा गौड, सभापती झिमाबाई चव्हाण, नगराध्यक्ष संगिता चिंचाळकर, मंगाराणी अंबुलगेकर, भारतीबाई पवार, शेख युसूफ, नरसारेड्डी गोपीडवाड, पप्पू पाटील कोंडेकर आदी उपस्थित होते़खा.चव्हाण म्हणाले, नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळेच सरकार या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन अडचणी आणत आहे़ जिल्ह्यात अकराशे डीपी बंद कसे ?, गुळगुळीत रस्त्याचा दावा करणाऱ्या नितीन गडकरींना नांदेड ते भोकर रस्ता दिसत नाही का? असा सवालही त्यांनी केला. या सरकारने साडेचार वर्षांत शेतकºयांना काय दिले ? असे विचारुन इंग्रजांना काँग्रेसने जसे देशाबाहेर हाकलले तसे बोंडअळी, पीकविमा, कर्जमाफी यात शेतकºयांची घोर निराशा करणाºया सरकारला काँग्रेस सत्तेबाहेर फेकेल. आरक्षणाच्या बाबतीतही धनगर समाजाला दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही़ यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. नसीम खान, आ. अमिता चव्हाण यांनी सभेत सरकारच्या कार्यपद्धतीचा समाचार घेवून येणाºया काळात काँग्रेसचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये यांनी केले. तालुकाध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर यांनी आभार मानले.सरकारची अवस्था बोंडअळीसारखी - विखे पाटीलविरोधी पक्षनेते विखे पाटील म्हणाले की, राज्यातील सरकारची अवस्था बोंडअळीसारखीच झाली आहे़ कारण, कापूसही नाही अन् बोंडअळी नुकसान भरपाईही नाही. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या भीतीने सरकारने १८० तालुक्यांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली. इतिहासात प्रथमच शेतकरी संपावर गेल्याची घटना या सरकारच्या काळात घडली. शेतक-यांना मदत देताना निकष लावले जातात़ तर मोठे उद्योगपती पळून गेले तेव्हा निकष कुठे होते ? सरकार धनदांडगे, पुंजीपतींचे असून छत्रपतींचे नाव घेवून सत्तेवर आलेल्या सरकारने स्मारकाची उंची कमी केली़ छत्रपतींचा अवमान करणारे सरकार शेतक-यांचा काय मान करणार, असेही ते म्हणाले़

टॅग्स :NandedनांदेडCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राAshok Chavanअशोक चव्हाणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील