शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

सत्ताधारी पायउतार होईपर्यंत संघर्ष सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:40 IST

केंद्र व राज्य सरकारने मागील साडेचार वर्षांत जनतेला विकासाच्या नावावर केवळ भूलथापा दिल्या़ लोकांचे हित व हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी काँग्रेसने राज्यभर जनसंघर्ष यात्रा सुरु केली असून सत्ताधारी पायउतार होइपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे

ठळक मुद्देभोकर येथे जनसंघर्ष यात्रा : अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : केंद्र व राज्य सरकारने मागील साडेचार वर्षांत जनतेला विकासाच्या नावावर केवळ भूलथापा दिल्या़ लोकांचे हित व हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी काँग्रेसने राज्यभर जनसंघर्ष यात्रा सुरु केली असून सत्ताधारी पायउतार होइपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण केले़ शहरातील मोंढा मैदानात काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त शुक्रवारी विराट जाहीर सभेचे आयोजन केले होते़ यावेळी ते बोलत होते.मंचावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नसीम खान, आ. अमिता चव्हाण, प्रा.बालाजी गाढे, बी. आर. कदम, गोविंदराव नागेलीकर, जगदीश पाटील भोसीकर, आप्पाराव सोमठाणकर, गणपतराव तिडके, प्रकाशराव देशमुख, बाळासाहेब रावणगावकर, गोविंदबाबा गौड, सभापती झिमाबाई चव्हाण, नगराध्यक्ष संगिता चिंचाळकर, मंगाराणी अंबुलगेकर, भारतीबाई पवार, शेख युसूफ, नरसारेड्डी गोपीडवाड, पप्पू पाटील कोंडेकर आदी उपस्थित होते़खा.चव्हाण म्हणाले, नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळेच सरकार या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन अडचणी आणत आहे़ जिल्ह्यात अकराशे डीपी बंद कसे ?, गुळगुळीत रस्त्याचा दावा करणाऱ्या नितीन गडकरींना नांदेड ते भोकर रस्ता दिसत नाही का? असा सवालही त्यांनी केला. या सरकारने साडेचार वर्षांत शेतकºयांना काय दिले ? असे विचारुन इंग्रजांना काँग्रेसने जसे देशाबाहेर हाकलले तसे बोंडअळी, पीकविमा, कर्जमाफी यात शेतकºयांची घोर निराशा करणाºया सरकारला काँग्रेस सत्तेबाहेर फेकेल. आरक्षणाच्या बाबतीतही धनगर समाजाला दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही़ यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. नसीम खान, आ. अमिता चव्हाण यांनी सभेत सरकारच्या कार्यपद्धतीचा समाचार घेवून येणाºया काळात काँग्रेसचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये यांनी केले. तालुकाध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर यांनी आभार मानले.सरकारची अवस्था बोंडअळीसारखी - विखे पाटीलविरोधी पक्षनेते विखे पाटील म्हणाले की, राज्यातील सरकारची अवस्था बोंडअळीसारखीच झाली आहे़ कारण, कापूसही नाही अन् बोंडअळी नुकसान भरपाईही नाही. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या भीतीने सरकारने १८० तालुक्यांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली. इतिहासात प्रथमच शेतकरी संपावर गेल्याची घटना या सरकारच्या काळात घडली. शेतक-यांना मदत देताना निकष लावले जातात़ तर मोठे उद्योगपती पळून गेले तेव्हा निकष कुठे होते ? सरकार धनदांडगे, पुंजीपतींचे असून छत्रपतींचे नाव घेवून सत्तेवर आलेल्या सरकारने स्मारकाची उंची कमी केली़ छत्रपतींचा अवमान करणारे सरकार शेतक-यांचा काय मान करणार, असेही ते म्हणाले़

टॅग्स :NandedनांदेडCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राAshok Chavanअशोक चव्हाणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील