शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

रणरणत्या उन्हात आजपासून शाळांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:17 IST

तापमानाचा पारा अद्यापही चाळीशीच्या पार असून रणरणत्या उन्हातच १७ जूनपासून जिल्ह्यातील शाळांना प्रारंभ होणार आहे. नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. मृग नक्षत्र सुरू होवून आठ दिवस संपले तरीही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईच्या झळा कायम चार दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ अंशांवर स्थिर पाण्यासाठी भटकंती सुरूच

नांदेड : तापमानाचा पारा अद्यापही चाळीशीच्या पार असून रणरणत्या उन्हातच १७ जूनपासून जिल्ह्यातील शाळांना प्रारंभ होणार आहे. नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. मृग नक्षत्र सुरू होवून आठ दिवस संपले तरीही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशा या दुष्काळी वातावरणात शाळांना प्रारंभ होणार आहे. विशेष म्हणजे, या दुष्काळी परिस्थितीत सुरू होणाऱ्या शाळांबाबत जिल्ह्यातील एकाही पदाधिकारी अथवा लोकप्रतिनिधीने आवाज उठवला नाही, हे विशेष!जिल्ह्यात १७ जून रोजी शाळांना सुरुवात होत आहे. जिल्हा परिषदेच्या २ हजार २३९ शाळा तर पहिली ते बारावीपर्यंतच्या संपूर्ण शाळांची संख्या ३ हजार ७७६ इतकी आहे. या शाळांना १७ जून रोजी प्रारंभ होत आहे. जवळपास १२ लाख विद्यार्थी शाळांमध्ये पोहोचणार आहेत. त्यातच पहिलीच्या प्रवेशालाही प्रारंभ होणार आहे. जवळपास १५ दिवस पटनोंदणी चालणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचाही १७ जूनपासून शोध घेतला जाणार आहे. या सर्व बाबी शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी केल्या जाणार असल्या तरीही दुष्काळी परिस्थितीचा मोठा अडसर या सर्व बाबींपुढे राहणार आहे. पाणीटंचाईची तीव्रता अद्यापही वाढतच आहे. जिल्ह्यातील टँकरची संख्या १४० वर पोहोचली आहे. मुखेड तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ अंशावर कायम आहे.जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. मात्र या मागणीला प्रशासनाकडून अद्याप तरी प्रतिसाद मिळाला नाही. सुट्या वाढविण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र हा निर्णय शासनस्तरावरुन घेणे आवश्यक असल्याचे सांगत जिल्हा परिषदेने अंग काढून घेतले. या सर्व बाबींचा फटका १७ जूनपासून सुरू होणा-या शाळांना बसणार आहे.ग्रामीण भागात अद्यापही महिला-मुले पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. या परिस्थितीत शाळा सुरू होणे अडचणीचे ठरणार आहे. राज्य शासनाने दुष्काळी भागात शाळा-महाविद्यालयांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने टंचाईसदृश्य उपाययोजनेत शाळांनाही टँकरने पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यात टँकरची परिस्थिती पाहता ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये टँकर उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिल्यानंतरही टँकर उपलब्ध होत नसल्याची तक्रारी आल्या आहेत. त्यातच आता पाण्याचे स्त्रोतही बंद झाले आहेत. त्यामुळे शाळांना पाणीपुरवठा करायचा कुठून? हा प्रश्नही प्रशासनापुढे उभा टाकला आहे. अशा परिस्थितीत पाणी आणायचे कोठून? हा प्रश्न पुढे आला आहे. विदर्भात पाण्याच्या टंचाईमुळे २६ जूनपासून शाळा सुरू होतात. नांदेड जिल्ह्यात यावर्षी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने याबाबत ‘ब्र’ ही काढला नाही.आरटीईची दुसरी प्रवेश फेरी आज

  • बालकांचा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील ३ हजार २४८ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली असून पहिल्या फेरीत १ हजार ६४४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. दुसºया फेरीतील सोडत १७ जून रोजी होणार आहे. दुसºया फेरीत १ हजार ५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. याबाबत पालकांना मेसेज दिले जाणार असून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.
  • जिल्ह्यातील शाळामध्ये प्रवेश घेणाºया मुलांचे पहिल्याच दिवशी पुष्प देवून स्वागत केले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी हे आपआपल्या भागातील शाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.
टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थीRainपाऊसwater shortageपाणीटंचाई