शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

नांदेडात ४१ जोडप्यांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:21 AM

ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय यांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नाची चिंता असते़ या काळजीतच अनेकदा ते टोकाचे पाऊल उचलून आत्महत्येसारखा निर्णय घेतात़

ठळक मुद्देस्वयंसेवकांच्या परिश्रमाने दिमाखदार सोहळा

नांदेड : ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय यांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नाची चिंता असते़ या काळजीतच अनेकदा ते टोकाचे पाऊल उचलून आत्महत्येसारखा निर्णय घेतात़ अशा कुटुंबाच्या मदतीला साईप्रसाद ही स्वयंसेवकांची संघटना धावून जाते़ बुधवारी साईप्रसादच्या वतीने आयोजित विवाह सोहळ्यात अशाच कुटुंबातील ४१ जोडप्यांच्या डोक्यावर अक्षदा टाकण्यात आल्या़ स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमामुळे संकटात सापडलेल्या या जोडप्यांच्या नवआयुष्याला सुरुवात झाली आहे़सनई, चौघड्याचा मंजुळ स्वर, १ लाख चौरस फुटांचा भव्य मंडप, ५०० फूट लांबीचे व्यासपीठ या सोहळ्यासाठी उभारण्यात आले होते़ कोणताही पदाधिकारी किंवा अध्यक्ष व्यासपीठावर न जाता संतांच्या आशीर्वादात दिमाखदार सोहळा पार पडला़ आतापर्यंत साईप्रसादच्या वतीने अशा सोहळ्याच्या माध्यमातून २२९ विवाह लावून दिले आहेत़ यंदाच्या सोहळ्यातील ४१ जोडप्यांपैकी ८ वधू-वरांचे वडील हयात नाहीत़ ३ जोडप्यांच्या डोक्यावरुन आई अन् वडील दोघांचेही छत्र हरवले आहे़ अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील जोडपेही आजच्या सोहळ्यात लग्नबंधनात अडकले़ सकाळी साडेसहा वाजेपासूनच वधू-वरांच्या आगमनाला सुरुवात झाली होती़ प्रत्यक वºहाडाला स्वतंत्र खोली देण्यात आली होती़सोहळ्यामध्ये वधू पक्षाची बाजू सांभाळत साईप्रसादच्या स्वयंसेवकांनी आपली भूमिका चोख बजावली़ सकाळी चहा-नाश्ता व त्यानंतर जेवण अशी व्यवस्था करण्यात आली होती़ दुपारी सव्वा दोन वाजता मंगलमय वातावरणात या जोडप्यांवर फुलांचा अक्षदा टाकण्यात आला़ सोहळ्यात जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी संत बाबा कुलवंतसिंघजी, संत श्री नरेंद्रसिंघजी महाराज, संत बाबा बलविंदरसिंघजी, संत बाबा प्रेमसिंघजी, संत बाबा ज्योतिंदरसिंघजी यांची उपस्थिती होती़ जवळपास पंधरा हजार वºहाडींची या लग्नसोहळ्याला उपस्थिती होती़ परंतु, कुठेही रुसवा-फुगवा नाही़ स्वयंसेवकांनीही आपल्याच घरातील लग्नकार्य आहे, या भावनेतून हातभार लावला़अंगणात जावून लावणार लग्नवसमत तालुक्यातील हट्टा येथे नानासाहेब भवर यांच्या मुलीचे ७ मे २०१९ रोजी लग्न ठरले होते़ परंतु पैशाची व्यवस्था होत नसल्यामुळे २८ मार्च रोजी नानासाहेब यांनी आत्महत्या केली़ भवर कुुटुंबाला २० गुंठे जमीन असून ते मजुरी करतात़ त्यांच्या मदतीसाठी साईप्रसादने त्यांच्या मुलीचा त्यांच्या अंगणात जावून लग्न लावण्याचा निर्णय घेतला आहे़ या जोडप्याला संसारोपयोगी सर्व वस्तू देण्यात येणार आहेत़

टॅग्स :Nandedनांदेडmarriageलग्नSocialसामाजिक