शहरं
Join us  
Trending Stories
1
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
2
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
3
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
4
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
5
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
6
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
7
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
8
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
9
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
10
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
11
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
12
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
13
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
15
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
16
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
17
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
18
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
19
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
20
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना आणि काँग्रेस यापुढेही महाविकास आघाडीत एकत्र राहतील- अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 16:31 IST

सरकार स्थिर नसल्याने फोडाफोडी, माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचा आरोप.

नांदेड : राज्यातील सरकारकडे स्पष्ट बहुमत असतानाही फोडाफोडीचे राजकारण करण्यात येत आहे. याचा अर्थच राज्यातील सध्याचे सरकार स्थिर नाही. त्यामुळे इतर पक्षांतील लोकांना फोडाफोडी करून आणावे लागत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला.

राज्यातील रविवारच्या राजकीय भूकंपावर चव्हाण म्हणाले, सरकार स्थिर नसल्याने फोडाफोडी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातून सरकार वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. १६ आमदार अपात्र ठरतील का, या विषयावर काही सांगता येत नाही. माझे थोड्या वेळापूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोलणे झाले आहे. त्यांना मी सांगितले, शिवसेना आणि काँग्रेस महाविकास आघाडीत यापुढेही एकत्र राहतील, एकत्र निवडणुका लढवतील.

राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत शरद पवार यांनी निर्णय घ्यावा. त्यांच्याशी अजून बोलणे झाले नसून त्यांना थोडा वेळ लागेल, असेही चव्हाण म्हणाले. तसेच नांदेड जिल्ह्यात लाेकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून विधानसभानिहाय आढावा घेण्यात येत आहे, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष