शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पाण्यावर १५ दिवस पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:40 AM

शहराची तहान भागविण्यासाठी सिद्धेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यावर आणखी १५ दिवस पोलिसांसह महापालिका, पाटबंधारे विभागाच्या पथकांचा पहारा राहणार आहे.

ठळक मुद्देविष्णूपुरीतील मृत जलसाठ्यात झाली चार इंचाची वाढसिद्धेश्वरमधून आतापर्यंत १५ पैकी ५ दलघमी पाणी सोडले

नांदेड : शहराची तहान भागविण्यासाठी सिद्धेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यावर आणखी १५ दिवस पोलिसांसह महापालिका, पाटबंधारे विभागाच्या पथकांचा पहारा राहणार आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी तीन वाजेपासून विष्णूपुरीत दाखल झालेल्या पाण्यामुळे मृत जलसाठ्यात चार इंचाची वाढ झाली आहे.वसमतपासून पाण्यावर या पथकांची नजर राहणार आहे. वसमत, औंढा आणि नांदेड अशा तीन विभागांत पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत अधीक्षक अभियंता सब्बीनवार यांनी सिद्धेश्वर धरणातून नांदेडपर्यंत येणाऱ्या पाण्याचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता एस. बी. बिराजदार, बी. डी. भालेराव, कार्यकारी अभियंता नीळकंठ गव्हाणे, महापालिकेचे उपायुक्त विलास भोसीकर, उपअभियंता संघरत्न सोनसळे, अविनाश अटकोरे, रमेश चौरे, सदाशिव पतंगे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, सिद्धेश्वर धरणातून विष्णूपुरी प्रकल्पात सोडण्यात येणा-या १५ पैकी ५ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. आणखी १० दलघमी पाणी सोडणे शिल्लक आहे. हे पाणी सोडले जात आहे. पाण्याचा अवैध उपसा होऊ नये, पाण्याची चोरी होऊ नये यासाठी पथकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे. पोलिसांचीही स्वतंत्र पथके राहणार आहेत. दरम्यान, महापौर दीक्षा धबाले यांनी शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईस कारणीभूत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. डिसेंबरपासूनच विष्णूपुरी प्रकल्पातून होणारा अवैध पाणी उपसा बंद करणे आवश्यक होते. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे आज शहरातील नागरिकांसमोर जलसंकट उभे राहिले आहे. अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पथकांच्या नाकर्तेपणामुळेच ही टंचाई उद्भवली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महापौर दीक्षा धबालेंसह स्थायी समिती सभापती फारुख अली खान, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, उमेश चव्हाण, किशोर स्वामी, अब्दुल सत्तार, विनय गिरडे, दुष्यंत सोनाळे आदींनी केली आहे.तर दुसरीकडे मनपाचे माजी विरोधी पक्षनेते महेश खोमणे यांनी शहरातील टंचाईला महापालिकेचे अकार्यक्षम अधिकारी, नगरसेवक जबाबदार असल्याची टीका केली. पदाधिकाºयांनी पाणीटंचाईचे खापर प्रशासनावर फोडले आहे. पण पाण्याचे योग्य नियोजन होत नसताना पदाधिकारी काय करत होते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नाने सिद्धेश्वरचे पाणी उपलब्ध झाले असून उपलब्ध झालेल्या पाण्याचे महापालिकेने योग्य नियोजन करावे, असेही खोमणे यांनी म्हटले आहे.२१ पथकांची पोलिसांसह गस्त राहणारसिद्धेश्वर धरणातून नांदेडसाठी सोडण्यात आलेल्या पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. परिणामी नांदेडची तहान भागविण्याच्या प्रयत्नांना मोठी खीळ बसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन शनिवारी सायंकाळी नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांच्या अध्यक्षतेखाली वसमत येथे नांदेड पाटबंधारे मंडळ, पूर्णा पाटबंधारे मंडळ आणि नांदेड महापालिकेच्या अधिकाºयांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत नांदेडसाठी सोडलेल्या पाण्यावर आगामी काळात १५ दिवस पहारा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.यामध्ये मनपाच्या सहा पथकांमध्ये जलसंपदा विभागाचे दोन कर्मचारी समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याचवेळी पथकाचे क्षेत्र वाढवून आता वसमत ते सिद्धेश्वरपर्यंत गस्त घातली जाणार आहे. महापालिकेच्या १८ पथकांसह ३ भरारी पथकांचीही स्थापना करण्यात आली आहे.संपूर्ण महापालिका पाण्याच्या गस्तीवरशहरात झालेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता महापालिकेचे सर्व अधिकारी-कर्मचारी पाण्याच्या गस्तीवर नियुक्त करण्याचा निर्णय आयुक्त लहुराज माळी यांनी घेतला आहे. तीन पाणीपाळ्यामध्ये गस्तीवर राहणार आहेत. वसमतपासून आता ही गस्त सिद्धेश्वरपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून नांदेडला पाणी उपलब्ध व्हावे हीच भूमिका असल्याचे माळी म्हणाले.

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाNanded policeनांदेड पोलीस