शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

त्रिसदस्यीय समितीची उपस्थितीत बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 18:52 IST

पाणीसाठाच नसल्याने बाभळी बंधाऱ्याचे झाले वाळवंट

ठळक मुद्दे वीजपुरवठा बंद असल्यामुळे जनरेटरच्या सहाय्याने उघडले दरवाजे गत सहा वर्षांपासून बाभळी बंधाऱ्याचा २़७४ टीएमसी पाणीसाठा आजपर्यंत  पूर्ण झाला नाही.

धर्माबाद (जि़ नांदेड) : तालुक्यातील वादग्रस्त बाभळी बंधाऱ्याचे सर्व १४ दरवाजे १ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत उघडण्यात आले. बंधाऱ्यावरील वीजपुरवठा खंडित असल्याने जनरेटरच्या सहाय्याने १४ दरवाजे उघडण्यात आले. बंधारा अगोदरच कोरडाठाक पडल्याने बाभळी बंधाऱ्याचे अक्षरश: वाळवंट झाले आहे.

देशभरातील बहुचर्चित तसेच महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात बाभळी बंधारा निर्मितीवरून वाद झाला होता. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर २८ फेब्रुवारी २०१३ रोजी न्यायालयाने याप्रकरणी निकाल देत १ जुलै रोजी बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात येतील व २९ आॅक्टोबर रोजी बंद करण्यात यावेत तसेच उपलब्ध पाणीसाठ्यापैकी दशांश सहा टीएमसी पाणी १ मार्च रोजी तेलंगणात सोडण्यात यावे. या निकालानुसार १ जुलै रोजी बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे जनरेटरच्या सहाय्याने उघडण्यात  आले. बंधाऱ्यावरील सेंटरचा पहिला दरवाजा  सकाळी ११ वाजता उघडण्यात आला. हळूहळू सायंकाळपर्यंत चौदाही दरवाजे उघडण्यात आले. सर्व प्रयत्न करूनही सर्वोच्च  न्यायालयाने बाभळी  बंधाऱ्यास काही अटी  टाकून  न्याय दिला. बंधाऱ्यास न्याय मिळाला; पण  जाचक अटींमुळे  बंधाऱ्यात पाणीसाठा राहात नसल्याने पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांचा आनंद फार काळ टिकला नाही.

गत सहा वर्षांपासून बाभळी बंधाऱ्याचा २़७४ टीएमसी पाणीसाठा आजपर्यंत  पूर्ण झाला नाही. त्याचे कारणही तसेच आहे. पावसाळा संपल्यानंतर म्हणजे २९ आॅक्टोबरला गेट खाली टाकले जातात. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून गेल्यानंतर पाणीसाठा होतच नाही.  झालाच तर दुसऱ्या अटीप्रमाणे एक मार्च रोजी असलेल्या साठ्यातील ०़६ टीएमसी पाणी सोडावे लागते म्हणजेच पाणीसाठा असला तर सर्व साठा सोडावा लागतोच. या कारणाने बाभळी बंधारा कोरडाच असतो म्हणून कोरड्या बंधाऱ्याचे गेट टाकून काय फायदा? असा खोचक प्रश्न जनतेतून ऐकायला मिळतो. तिसरी  अट  म्हणजे, १ जुलै रोजी सर्व गेट उघडल्याने पूर्ण पावसाळा संपेपर्यंत सर्व गेट उघडे राहणार. मग असा प्रश्न पडतो की, बाभळी बंधाऱ्याच्या हक्काचे २़७४ टीएमसी पाणीसाठा कसा जमा होईल? 

१ जुलै ते २९ आॅक्टोबर या चार महिन्यांच्या पावसाळा कालावधीत आंध्र प्रदेशातील श्रीराम धरणाचा ११२ टीएमसी पाणीसाठा कराराप्रमाणे झाल्यावर जादाचे पाणी आंध्र प्रदेश धरणाचे सर्व दरवाजे उचलून पाणी सागराला सोडून देते. या प्रकारामुळे नदीचे पाणी श्रीराम सागररालही नाही व बाभळी बंधाऱ्यालाही नाही तर सर्व पाणी समुद्रात आहे. सर्वपक्षीय बाभळी बंधारा कृती समिती व शेतकरी, सर्व लोकप्रतिनिधीची अशी मागणी आहे की, आम्ही सर्व सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचा व दिलेल्या निकालाचा सन्मान करतो मग दुसरा प्रश्न पुढे येतो, बाभळी बंधाऱ्यातील २़७४ टीएमसी पाणीसाठा गेला कुठे? म्हणून पुन्हा हक्काचा पाणीसाठा द्या ही मागणी पुढे येऊ लागली आहे.

यावेळी केंद्रीय जल आयोगाचे कार्यकारी अभियंता व्ही. गंगाधर, तेलंगणा राज्यातील श्रीराम सागरचे कार्यकारी अभियंता बी. रामाराव, आंध्र प्रदेश राज्यातील कार्यकारी अभियंता के. नारायण रेड्डी, महाराष्ट्र पाटबंधारे विभाग नांदेडचे कार्यकारी अभियंता नीळकंठ गव्हाणे, श्रीराम सागरचे उपविभागीय अभियंता  टी. जगदीश, बाभळी बंधाऱ्याचे उपविभागीय अभियंता गणेश शेळके, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आर.के. मुक्कावार, सब डिव्हिजनल इंजिनिअर श्री.जगन, कनिष्ठ अभियंता एस़ बी़ देवकांबळे तसेच बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील रोशनगावकर, सहसचिव जी. पी. मिसाळे, नीळकंठ पाटील आदमपूरकर, गंगाधर पाटील बाभळीकर, सय्यद मसूद आली, चव्हाण, गुंडेवार, गुंजकर, पांडे आदी उपस्थित होते.  

टॅग्स :DamधरणWaterपाणीNandedनांदेडTelanganaतेलंगणा