शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नांदेडमध्ये शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर  संताप; विद्यार्थी मृत्यू प्रकरणी गुन्हे नोंदवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 11:47 AM

हदगाव तालुक्यातील आष्टी शाळकरी मुलाच्या मृत्यूप्रकरणी  पोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा त्यासह शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या  निरपराध तरुणांना सोडून देण्याची मागणी बुधवारी शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली.

ठळक मुद्दे हदगाव तालुक्यातील आष्टी शाळकरी मुलाच्या मृत्यूप्रकरणी  पोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावात्यासह शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या  निरपराध तरुणांना सोडून देण्याची मागणी बुधवारी शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली.यावेळी आमदारांसह नगरसेवक तसेच समाजाच्या प्रतिनिधींनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला़ पोलीस अधीक्षकांची तातडीने बदली करा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 

नांदेड : हदगाव तालुक्यातील आष्टी शाळकरी मुलाच्या मृत्यूप्रकरणी  पोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा त्यासह शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या  निरपराध तरुणांना सोडून देण्याची मागणी बुधवारी शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली. यावेळी आमदारांसह नगरसेवक तसेच समाजाच्या प्रतिनिधींनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला़ पोलीस अधीक्षकांची तातडीने बदली करा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात बचतभवन येथे बुधवारी सायंकाळी झालेली शांतता समितीची बैठक वादळी ठरली़ आ़डी़पी़सावंत, आ़हेमंत पाटील यांच्यासह महापौर शीलाताई भवरे, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, भदंत पैय्याबोधी आदींनी जिल्हाधिकार्‍यांसमोर प्रशासनाला धारेवर धरले़ या बैठकीत पोलिसांनी अतिरेकी बळाचा वापर करत महिला, मुले, वृद्धांना मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध केला. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, मात्र घरातील चिमुकली मुले, महिला, वृद्धांना गुन्हेगाराप्रमाणे मारहाण कशासाठी, असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला. यावेळी रमेश सोनाळे, डॉ. एन. के. सरोदे, प्रफुल्ल सावंत, सुभाष रायबोले, किशोर भवरे, सुखदेव चिखलीकर, प्रशांत इंगोले यांनी आपल्या भावना मांडताना पोलिसांनी समाजात शांतता नांदण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना पोलीसच शांतता बिघडवित असल्याचा आरोप केला़ बुधवारी शहरात पोलिसांचा दहशतवादच होता अशी प्रतिक्रियाही यावेळी उमटली.  पोलीस अधीक्षक  चंद्रकिशोर मिना यांची तात्काळ बदली करण्याची मागणी

यावेळी करण्यात आली़ भदंत पंय्याबोधी म्हणाले, समाजातील अप्रिय घटना टाळण्यासाठी आमच्याकडून नेहमीच सहकार्य होते़ मात्र पोलिसांकडून अतिरेकी बळाचा झालेला वापर ही बाब निंदणीय असल्याचे सांगून पोलीस अधीक्षकांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. महापौर शीलाताई भवरे, सुरेश गायकवाड यांनी पोलीस प्रशासनाने वेळीच खबरदारी न घेतल्याने शहरात ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले. मंगळवारीच पत्र देऊन शांतता समितीची बैठक घेण्याची  मागणी आपण केली होती. मात्र त्याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप भवरे यांनी केला़ 

आष्टी (ता. हदगाव) येथील निष्पाप शाळकरी मुलाचा मृत्यू ही बाबही अत्यंत संतापजनक तसेच दुखद आहे. आष्टीमध्येही पोलिसांनी पाशवी बळाचा वापर केला. राज्य राखीव दलाच्या तुकडीतील जवानाने केलेल्या मारहाणीत योगेश जाधव या १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी संबधितावर कारवाईची मागणी करण्यात आली़ बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, तहसीलदार किरण अंबेकर, अभिजीत फस्के यांचीही उपस्थिती होती.

पोलीस-जनतेमध्ये दुवा राहिला नसल्याची व्यक्त केली खंतभीमा कोरेगाव येथील घटना ही निषेधार्यच आहे. त्याचे पडसाद अपेक्षित होते. शहरात शांतता टिकून ठेवण्यासाठी पोलीस आणि जनतेमध्ये दुवा असला पाहिजे मात्र तो राहिला नसल्याचे  आ. हेमंत पाटील यांनी सांगितले. सामान्य जनतेशीच नव्हे तर माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीशीही पोलिसांचा संवाद कमी असल्याचे ते म्हणाले. नांदेडकर हे चांगल्या अधिकार्‍यांचा नेहमीच सन्मान करतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली़ 

विद्यार्थ्याचा मृत्यू दुर्देवी; कायदेशीर बाबी तपासू-जिल्हाधिकारीजिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यात घडलेल्या घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या बाबतही कायदेशीर बाब विचारात घेतली जाईल असे ते म्हणाले. नागरिकांनी शांततेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी अतिरिक्त पोलीस अधीक्षक  मंगेश शिंदे यांनी शहरात पोलिसांनी शांतता  ठेवण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता असे सांगितले. राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या सध्या शहरात आहेत. आणखी एक तुकडी येत असल्याचे सांगितले. कायद्याचे पालन न करणार्‍यावर कारवाई होईल असेही ते म्हणाले. 

पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन निंदनीय- आ.सावंतभीमा कोरेगाव घटनेचे पडसाद नांदेडमध्ये उमटतील ही बाब अपेक्षित असतानाही आवश्यक तो बंदोबस्त ठेवण्यात आला नाही. उलट एका घटनेनंतर पोलिसांनी थेट आंबेडकरनगर, जयभीमनगर, जनता कॉलनी येथे घरात शिरुन महिला, मुले, वृद्धांना मारहाण केली. घरात तोडफोड केली. पोलिसांनी केलेले हे कोम्बिंग आॅपरेशन निंदनीय असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधी व पोलिसांमध्ये दुरावा वाढत आहे. पोलीसच आता बघून घेऊची भाषा करीत आहेत. सहा वर्षाच्या अजय किशनराव पाईकराव, संगीता संजय खंडागळे, लक्ष्मी सिद्धार्थ जावळे, पृथ्वीराज रमेश काळे या निष्पाप नागरिकांना घरातून बाहेर काढून मारहाण करणे ही कोणती मर्दांनगी असल्याच सवाल  आ. सावंत यांनी केला. आष्टी येथील प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारNandedनांदेड