शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

६० टक्क्यांहून अधिक बेरोजगार सहकारी संस्था बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 6:00 AM

लेखा परीक्षण केले नसल्याने सध्या राज्यातील ६० टक्क्यांहून अधिक बेरोजगार सहकारी संस्था बंद पडल्या आहेत.

नांदेड : लेखा परीक्षण केले नसल्याने सध्या राज्यातील ६० टक्क्यांहून अधिक बेरोजगार सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. ज्या सुरू आहेत, त्यांना कामे मिळत नाहीत. त्यामुळे सभासदांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर बेरोजगार सहकारी संस्थांना आरक्षण द्या, नाहीतर सर्वच आरक्षण रद्द करा, अशी मागणी बेरोजगार सहकारी संस्था बचाव कृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे़बेरोजगार सहकारी संस्थांना मजूर सहकारी संस्थेच्या धर्तीवर आरक्षण, वर्गीकरण कामे मिळावित, ही मागणी २००८ पासून होत आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने २८ जुलै २०१४ ला शासनाला आठ आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते़ १६ आॅगस्ट २०१६ च्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रानुसार बेरोजगार सहकारी संस्थेचे वर्गीकरण केले जात आहे. पण ई-टेंडर निविदा भरता येत नाहीत आणि ३ लाखांच्या आतील काम आरक्षण बेरोजगार संस्थेला दिले जात नसल्याने कामही मिळत नाहीत. त्यामुळे बेरोजगार सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत.यासंदर्भात समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात मंत्रालय व जिल्हा स्तरावर अधिकाऱ्यांच्या मनमानी कामामुळे बेरोजगार युवकांना रोजगार मिळत नाही. ई-टेंडर निविदेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत ठरावीक चार-दोन कंपन्यांनाच कामे मिळत असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे.