शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

हक्काच्या पाण्यासाठी एकजुटीने विरोध करावा; अशोक चव्हाण यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 19:26 IST

पाटबंधारे विभागाने नुकताच आदेश काढून होऊ घातलेल्या सापळी प्रकल्पातूनही ३३ दलघमी पाणी पुन्हा इतरत्र वळविण्याचा निर्णय घेतला आहे.

नांदेड : अप्पर पैनगंगा प्रकल्पाच्या मूळ संकल्पनेनुसार १ लाख २५ हजार १२६ हेक्टर सिंचनक्षेत्र प्रस्तावित आहे. २००८ पर्यंत या क्षेत्रात १८ हजार हेक्टरने घट झाली. २०१७ पर्यंत या प्रकल्पात पाण्याचा येवा केवळ ७५ टक्क्यांवर आला. प्रत्यक्षात या प्रकल्पातून केवळ ३८२ दलघमी पाणी मिळत असल्याने सिंचनाचे ३१ हजार ३९६ हेक्टर क्षेत्रच शिल्लक राहिले. हा केवळ इसापूर धरणाचा हिशेब आहे, अशी परिस्थिती असताना राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाने नुकताच आदेश काढून होऊ घातलेल्या सापळी प्रकल्पातूनही ३३ दलघमी पाणी पुन्हा इतरत्र वळविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका नांदेडसह परभणी, यवतमाळ जिल्ह्याला बसणार आहे. दरम्यान, सदर निर्णय शासनाने तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. या निर्णयाचा जिल्हावासियांनी  एकजुटीने विरोध करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

याबाबत माहिती देताना खा. चव्हाण म्हणाले, अप्पर पैनगंगेच्या मूळ मान्यता प्रस्तावानुसार इसापूर आणि सापळी या दोन्ही धरणांचे पाणी अप्पर पैनगंगेला मिळणार होते आणि तेव्हा म्हणजेच १९६८ साली या पैनगंगेच्या माध्यमातून १ लाख २५ हजार १२६ हेक्टर सिंचनक्षेत्र प्रस्तावित करण्यात आले होते. यातील इसापूर धरणाचे काम १९८२ ला पूर्ण झाले. तर सापळी धरणाचे काम अद्यापही सुरु झाले नाही. इसापूरमधील पाण्याचा हिशेब केला असता २००८ पर्यंत १ लाख २५ हजार १२६ हेक्टर सिंचनक्षेत्रात घट होत आता हे क्षेत्र १ लाख ७ हजारांवर आले आहे. १९८२ ते २०१७ या कालावधीत प्रकल्पातील पाण्याचा येवा मूळ प्रस्तावाच्या ७५ टक्क्यांवर आला. आणि सद्य:स्थितीत ३८२  दलघमी पाणी यातून मिळते. म्हणजेच ५८१.३२ दलघमीची तूट निर्माण झाली आहे.

या तुटीमुळे आज इसापूर धरणातील एकूण सिंचनक्षेत्र केवळ ३१ हजार ३९६ हेक्टर म्हणजेच मूळ  मान्यतेच्या ३९ टक्के इतके उरले आहे. अशा स्थितीत पाटबंधारे विभागाने १८ मे रोजी निर्णय घेत होऊ घातलेल्या सापळी धरणातील ३३ दलघमी पाणी दुसऱ्याच प्रकल्पासाठी वळविण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आज जायकवाडी प्रकल्पाची जी विदारक अवस्था झाली आहे तशीच स्थिती येणाऱ्या काळात नांदेड, परभणी, यवतमाळ जिल्ह्यांतील पाण्याची होणार असल्याचे सांगत एखाद्या जिल्ह्यातील पाण्याचा अनुशेष भरुन काढावा याला आमचा विरोध नाही. मात्र हे करताना दुसऱ्या जिल्ह्यात अनुशेष निर्माण केला जात असल्याचे  सांगत शासनाच्या वरील निर्णयाची कार्यवाही झाल्यास धर्माबादलासुद्धा पाणी मिळणार नाही.  त्यामुळेच मूळ प्रकल्पात जो हिस्सा नांदेड, परभणी, यवतमाळसाठी दिला आहे तो शासनाने कायम ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगत याबाबत  तातडीने कार्यवाही न झाल्यास पुढील भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

धर्माबादपर्यंत कालव्याचे काम होत आले आहे. एकीकडे ही कालव्याची कामे सुरु असताना दुसरीकडे  शासनाकडून पाणी काढून घेण्याचा डाव खेळला जात आहे. याला अप्पर पैनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या सर्वांनी एकजुटीने विरोध करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला आ. डी. पी. सावंत, महापौर शीला भवरे, माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे, संतोष पांडागळे, विजय येवनकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणWaterपाणीState Governmentराज्य सरकार