शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
3
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
4
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
5
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
6
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
8
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
9
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
11
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
12
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
13
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
14
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
15
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
16
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
17
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
18
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
19
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
20
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा

हक्काच्या पाण्यासाठी एकजुटीने विरोध करावा; अशोक चव्हाण यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 19:26 IST

पाटबंधारे विभागाने नुकताच आदेश काढून होऊ घातलेल्या सापळी प्रकल्पातूनही ३३ दलघमी पाणी पुन्हा इतरत्र वळविण्याचा निर्णय घेतला आहे.

नांदेड : अप्पर पैनगंगा प्रकल्पाच्या मूळ संकल्पनेनुसार १ लाख २५ हजार १२६ हेक्टर सिंचनक्षेत्र प्रस्तावित आहे. २००८ पर्यंत या क्षेत्रात १८ हजार हेक्टरने घट झाली. २०१७ पर्यंत या प्रकल्पात पाण्याचा येवा केवळ ७५ टक्क्यांवर आला. प्रत्यक्षात या प्रकल्पातून केवळ ३८२ दलघमी पाणी मिळत असल्याने सिंचनाचे ३१ हजार ३९६ हेक्टर क्षेत्रच शिल्लक राहिले. हा केवळ इसापूर धरणाचा हिशेब आहे, अशी परिस्थिती असताना राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाने नुकताच आदेश काढून होऊ घातलेल्या सापळी प्रकल्पातूनही ३३ दलघमी पाणी पुन्हा इतरत्र वळविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका नांदेडसह परभणी, यवतमाळ जिल्ह्याला बसणार आहे. दरम्यान, सदर निर्णय शासनाने तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. या निर्णयाचा जिल्हावासियांनी  एकजुटीने विरोध करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

याबाबत माहिती देताना खा. चव्हाण म्हणाले, अप्पर पैनगंगेच्या मूळ मान्यता प्रस्तावानुसार इसापूर आणि सापळी या दोन्ही धरणांचे पाणी अप्पर पैनगंगेला मिळणार होते आणि तेव्हा म्हणजेच १९६८ साली या पैनगंगेच्या माध्यमातून १ लाख २५ हजार १२६ हेक्टर सिंचनक्षेत्र प्रस्तावित करण्यात आले होते. यातील इसापूर धरणाचे काम १९८२ ला पूर्ण झाले. तर सापळी धरणाचे काम अद्यापही सुरु झाले नाही. इसापूरमधील पाण्याचा हिशेब केला असता २००८ पर्यंत १ लाख २५ हजार १२६ हेक्टर सिंचनक्षेत्रात घट होत आता हे क्षेत्र १ लाख ७ हजारांवर आले आहे. १९८२ ते २०१७ या कालावधीत प्रकल्पातील पाण्याचा येवा मूळ प्रस्तावाच्या ७५ टक्क्यांवर आला. आणि सद्य:स्थितीत ३८२  दलघमी पाणी यातून मिळते. म्हणजेच ५८१.३२ दलघमीची तूट निर्माण झाली आहे.

या तुटीमुळे आज इसापूर धरणातील एकूण सिंचनक्षेत्र केवळ ३१ हजार ३९६ हेक्टर म्हणजेच मूळ  मान्यतेच्या ३९ टक्के इतके उरले आहे. अशा स्थितीत पाटबंधारे विभागाने १८ मे रोजी निर्णय घेत होऊ घातलेल्या सापळी धरणातील ३३ दलघमी पाणी दुसऱ्याच प्रकल्पासाठी वळविण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आज जायकवाडी प्रकल्पाची जी विदारक अवस्था झाली आहे तशीच स्थिती येणाऱ्या काळात नांदेड, परभणी, यवतमाळ जिल्ह्यांतील पाण्याची होणार असल्याचे सांगत एखाद्या जिल्ह्यातील पाण्याचा अनुशेष भरुन काढावा याला आमचा विरोध नाही. मात्र हे करताना दुसऱ्या जिल्ह्यात अनुशेष निर्माण केला जात असल्याचे  सांगत शासनाच्या वरील निर्णयाची कार्यवाही झाल्यास धर्माबादलासुद्धा पाणी मिळणार नाही.  त्यामुळेच मूळ प्रकल्पात जो हिस्सा नांदेड, परभणी, यवतमाळसाठी दिला आहे तो शासनाने कायम ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगत याबाबत  तातडीने कार्यवाही न झाल्यास पुढील भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

धर्माबादपर्यंत कालव्याचे काम होत आले आहे. एकीकडे ही कालव्याची कामे सुरु असताना दुसरीकडे  शासनाकडून पाणी काढून घेण्याचा डाव खेळला जात आहे. याला अप्पर पैनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या सर्वांनी एकजुटीने विरोध करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला आ. डी. पी. सावंत, महापौर शीला भवरे, माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे, संतोष पांडागळे, विजय येवनकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणWaterपाणीState Governmentराज्य सरकार