शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

हक्काच्या पाण्यासाठी एकजुटीने विरोध करावा; अशोक चव्हाण यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 19:26 IST

पाटबंधारे विभागाने नुकताच आदेश काढून होऊ घातलेल्या सापळी प्रकल्पातूनही ३३ दलघमी पाणी पुन्हा इतरत्र वळविण्याचा निर्णय घेतला आहे.

नांदेड : अप्पर पैनगंगा प्रकल्पाच्या मूळ संकल्पनेनुसार १ लाख २५ हजार १२६ हेक्टर सिंचनक्षेत्र प्रस्तावित आहे. २००८ पर्यंत या क्षेत्रात १८ हजार हेक्टरने घट झाली. २०१७ पर्यंत या प्रकल्पात पाण्याचा येवा केवळ ७५ टक्क्यांवर आला. प्रत्यक्षात या प्रकल्पातून केवळ ३८२ दलघमी पाणी मिळत असल्याने सिंचनाचे ३१ हजार ३९६ हेक्टर क्षेत्रच शिल्लक राहिले. हा केवळ इसापूर धरणाचा हिशेब आहे, अशी परिस्थिती असताना राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाने नुकताच आदेश काढून होऊ घातलेल्या सापळी प्रकल्पातूनही ३३ दलघमी पाणी पुन्हा इतरत्र वळविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका नांदेडसह परभणी, यवतमाळ जिल्ह्याला बसणार आहे. दरम्यान, सदर निर्णय शासनाने तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. या निर्णयाचा जिल्हावासियांनी  एकजुटीने विरोध करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

याबाबत माहिती देताना खा. चव्हाण म्हणाले, अप्पर पैनगंगेच्या मूळ मान्यता प्रस्तावानुसार इसापूर आणि सापळी या दोन्ही धरणांचे पाणी अप्पर पैनगंगेला मिळणार होते आणि तेव्हा म्हणजेच १९६८ साली या पैनगंगेच्या माध्यमातून १ लाख २५ हजार १२६ हेक्टर सिंचनक्षेत्र प्रस्तावित करण्यात आले होते. यातील इसापूर धरणाचे काम १९८२ ला पूर्ण झाले. तर सापळी धरणाचे काम अद्यापही सुरु झाले नाही. इसापूरमधील पाण्याचा हिशेब केला असता २००८ पर्यंत १ लाख २५ हजार १२६ हेक्टर सिंचनक्षेत्रात घट होत आता हे क्षेत्र १ लाख ७ हजारांवर आले आहे. १९८२ ते २०१७ या कालावधीत प्रकल्पातील पाण्याचा येवा मूळ प्रस्तावाच्या ७५ टक्क्यांवर आला. आणि सद्य:स्थितीत ३८२  दलघमी पाणी यातून मिळते. म्हणजेच ५८१.३२ दलघमीची तूट निर्माण झाली आहे.

या तुटीमुळे आज इसापूर धरणातील एकूण सिंचनक्षेत्र केवळ ३१ हजार ३९६ हेक्टर म्हणजेच मूळ  मान्यतेच्या ३९ टक्के इतके उरले आहे. अशा स्थितीत पाटबंधारे विभागाने १८ मे रोजी निर्णय घेत होऊ घातलेल्या सापळी धरणातील ३३ दलघमी पाणी दुसऱ्याच प्रकल्पासाठी वळविण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आज जायकवाडी प्रकल्पाची जी विदारक अवस्था झाली आहे तशीच स्थिती येणाऱ्या काळात नांदेड, परभणी, यवतमाळ जिल्ह्यांतील पाण्याची होणार असल्याचे सांगत एखाद्या जिल्ह्यातील पाण्याचा अनुशेष भरुन काढावा याला आमचा विरोध नाही. मात्र हे करताना दुसऱ्या जिल्ह्यात अनुशेष निर्माण केला जात असल्याचे  सांगत शासनाच्या वरील निर्णयाची कार्यवाही झाल्यास धर्माबादलासुद्धा पाणी मिळणार नाही.  त्यामुळेच मूळ प्रकल्पात जो हिस्सा नांदेड, परभणी, यवतमाळसाठी दिला आहे तो शासनाने कायम ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगत याबाबत  तातडीने कार्यवाही न झाल्यास पुढील भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

धर्माबादपर्यंत कालव्याचे काम होत आले आहे. एकीकडे ही कालव्याची कामे सुरु असताना दुसरीकडे  शासनाकडून पाणी काढून घेण्याचा डाव खेळला जात आहे. याला अप्पर पैनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या सर्वांनी एकजुटीने विरोध करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला आ. डी. पी. सावंत, महापौर शीला भवरे, माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे, संतोष पांडागळे, विजय येवनकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणWaterपाणीState Governmentराज्य सरकार