शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

नांदेड जिल्ह्यात केवळ दीड टक्के पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:44 AM

पेरणी काळात शेतक-यांना सावकाराचा उंबरठा चढण्याची वेळ येवू नये म्हणून शासनाकडून गरजू शेतक-यांना अल्प व्याजदरात पीक कर्ज वाटप करण्यात येते़ विविध बँकांच्या माध्यमातून जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते़

ठळक मुद्देबँक अधिकाऱ्यांची उदासिनता पेरणीपूर्व पीककर्ज मिळाल्यास शेतकऱ्यांना ठरेल लाभदायी

श्रीनिवास भोसले।नांदेड : पेरणी काळात शेतक-यांना सावकाराचा उंबरठा चढण्याची वेळ येवू नये म्हणून शासनाकडून गरजू शेतक-यांना अल्प व्याजदरात पीक कर्ज वाटप करण्यात येते़ विविध बँकांच्या माध्यमातून जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते़ परंतु, शेतक-यांकडे बँक अधिका-यांचा पाहण्याचा दृष्टीकोण आणि उदासिनतेमुळे उद्दिष्ट देवूनही शेतक-यांना कर्ज मिळत नाही़ यंदाच्या खरीप हंगामात आजपर्यंत केवळ १़६३ टक्केच कर्जवाटप झाले आहे़शासनाच्यावतीने शेतक-यांना खरीप, रबी हंगामात पेरणीसाठी लागणारे खत-बी बियाणे खरेदीसाठी पीककर्ज उपबल्ध करून दिले जाते़ परंतू, नांदेड जिल्ह्यातील बँक अधिका-यांच्या उदासिनतेमुळे गरज असतांनादेखील शेतकºयांना कर्ज मिळत नाही़ गतवर्षी जिल्हाधिका-यांनी आदेश दिल्यानंतर बँकानी कर्जवाटपाची गती वाढविली होती़ परंतु, पेरणी करण्यापूर्वीच पीककर्ज उपलब्ध झाले तर त्यांचा शेतक-यांना योग्य फायदा होतो़ परंतु, बँकाच्या दिरंगाईचा फटका बळीराजाला सहन करावा लागतो़ बँकाकडे अर्ज करून तसेच बँक अधिका-यांनी सांगितलेल्या कागदपत्रांची पुर्तता करूनदेखील कर्जासाठी बँकाचे उंबरठे झिजवावे लागतात़ ही परिस्थिती बदलली आणि बँकामधील एजंटांवर अंंकुश मिळविण्यात प्रशासनास यश आले तरच सर्वसामान्य शेतक-यांनी वेळेत पीक कर्ज उपलब्ध होवू शकते़नांदेड जिल्ह्याला यंदाच्या २०१९ - २० खरीप हंगामासाठी १९६७ कोटी ५० लाख ९७ हजार रूपये पीक कर्ज वाटपाचे लक्षांक देण्यात आला आहे़ यामध्ये सर्वाधिक १५११ कोटी ७३ लाख ७४ हजार रूपये उद्दिष्ट व्यापारी आणि खासगी बँकांना दिले आहे़ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस १७८ कोटी ६० लाख ४० हजार रूपये तर ग्रामीण बँकेस २७७ कोटी १६ लाख ८३ हजार रूपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ यामध्ये सर्वाधिक ११ कोटी ३२ लाख १७ हजार रूपये पीककर्ज २ हजार ६३८ शेतक-यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वाटप केले आहे़ त्याची टक्केवारी ६़३४ एवढी आहे़आजपर्यंत साडेचार हजार शेतक-यांना लाभजिल्ह्यातील बँकांना कोट्यवधींचे उद्दिष्ट असूनही पीककर्ज वाटपात आखडता हात घेतल्याचे पहाला मिळत आहे़ आजपर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ५८३ शेतक-यांना पीककर्ज वाटप करण्यात आले आहे़ यामध्ये सर्वाधिक २ हजार ६३८ शेतकरी सभासद हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आहेत़ तर १ हजार ९७ शेतक-यांना व्यापारी आणि खासगी बँकानी आणि ग्रामीण बँकेने ८४८ शेतक-यांना पीक कर्ज वाटप केले आहे़ खासगी बँका पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत़पीककर्ज हे पेरणीसाठी दिले जाते़ त्यामुळे पीककर्ज वाटप १५ जूनपर्यंत पूर्ण करायला हवे़ परंतु, बँकाकडून दिरंगाई केली जाते़ त्यामुळे पेरणी काळात शेतक-यांना सावकारी कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही, हे वास्तव आहे़

टॅग्स :NandedनांदेडbankबँकFarmerशेतकरीMONEYपैसा