शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

मनरेगा मजुरांना आता आठ दिवसांत मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:15 AM

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांना आता १५ ऐवजी आठ दिवसांत मजुरी दिली जाणार आहे. २०१८-१९ पर्यंत मजुरांची मजुरी ही १५ दिवसांच्या आत दिली जात होती.

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थिती, मजुरांना शासन निर्णयाचा लाभ

अनुराग पोवळे।नांदेड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांना आता १५ ऐवजी आठ दिवसांत मजुरी दिली जाणार आहे. २०१८-१९ पर्यंत मजुरांची मजुरी ही १५ दिवसांच्या आत दिली जात होती. २०१९-२० या आर्थिक वर्षात आठ दिवसांच्या आत मजुरी अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.जिल्ह्यात आजघडीला ९४२ कामावर १३ हजार ५१२ मजूर कामावर आहेत. यात यंत्रणांची २४५ तर ग्रामपंचायतीची ६९७ कामे सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ५८ मजूर किनवट तालुक्यात आहेत. या तालुक्यात १२६ कामे सुरू आहेत. माहूर तालुक्यातही ६८ कामांवर १ हजार ३२० मजूर कार्यरत आहेत तर नायगाव तालुक्यात १०६ कामांवर १ हजार २७८, अर्धापूर तालुक्यात ९४ कामांवर १ हजार ४४२, भोकर तालुक्यात ९४ कामांवर १ हजार ४४२, मुखेड तालुक्यात ५१ कामांवर ४७७ मजूर, बिलोली तालुक्यात ६७ कामांवर ५९५, देगलूर तालुक्यात २९ कामांवर ४३६, हदगाव तालुक्यात ६० कामांवर ९६०, हिमायतनगर तालुक्यात २२ कामांवर ३७३, कंधार तालुक्यात ३४ कामांवर ४४०, लोहा तालुक्यात ३३ कामांवर १ हजार १०, मुदखेड तालुक्यात ५३ कामांवर ४७५, नांदेड तालुक्यात ४८ कामांवर ४४२ आणि उमरी तालुक्यात ५४ कामांवर ७२३ मजूर कार्यरत आहेत.या मजुरांना हजेरीपत्रक संपल्यानंतर आठ दिवसांच्या आत मजुरी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी २०१८-१९ च्या अखेरपर्यंत १५ दिवसांच्या आत मजुरी प्रदान करावी लागायची. त्यावेळी मजुरी प्रदान करण्याचे जिल्ह्याचे प्रमाण १०० टक्के होते. आठ दिवसांच्या आत मजुरी प्रदान करण्याचा आदेश आल्यानंतर ही टक्केवारी ६६.२९ टक्क्यांवर आली आहे. यापुढे विहित वेळेत मजुरी अदा न करणाºया संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर विलंबाची जबाबदारी निश्चित करुन शासन निर्णयानुसार ०.६ टक्के विलंबाची रक्कम संबंधितांकडून वसूल करुन ती शासनखाती जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.जिल्ह्यात १५ दिवसांत मजुरी द्यावी लागत असताना मजुरी प्रदान करण्याचे प्रमाण १०० टक्के होते. आठ दिवसांत मजुरी देण्याचे आदेश आल्यानंतर नांदेड तालुक्याचे मजुरी अदा करण्याचे प्रमाण सर्वाधिक ८८.७४ आहे तर त्याखालोखाल मुदखेडचे तालुक्याचे प्रमाण ८६.७१ इतके आहे. सर्वात कमी प्रमाण भोकर तालुक्याचे असून आठ दिवसांत मजुरी देण्याची टक्केवारी ४०.१८ टक्के इतके आहे. आठ दिवसांत मजुरी देण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील मजुरांना दुष्काळी परिस्थितीत त्याचा लाभ होणार आहे.सहा तालुक्यांत ७४ ग्रा.पं.मध्ये कामच नाहीजिल्ह्यात २०१८-१९ मध्ये दुष्काळाची परिस्थिती होती. या परिस्थितीत ग्रामपंचायतीमार्फत मनरेगाची कामे हाती घेणे आवश्यक होते. मात्र तब्बल ७४ ग्रामपंचायतींनी मनरेगाअंतर्गत एकही काम हाती घेतले नाही. यात दुष्काळी तालुके म्हणून ओळखल्याजाणाºया मुखेड, लोहा तालुक्यासह नांदेड तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींचा समावेश आहे.नांदेड तालुक्यातील ७३ पैकी १९ ग्रामपंचायतींनी २०१८-१९ मध्ये एकही काम केले नाही तर मुखेड तालुक्यातील १८ आणि लोहा तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींनी मनरेगाअंतर्गत काम हाती घेतले नाही. कंधार तालुक्यातील ८, बिलोली तालुक्यातील २, धर्माबाद तालुक्यातील २, किनवट तालुक्यातील ४, मुदखेड तालुक्यातील २ आणि हदगाव तसेच माहूर तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा काम करण्यामध्ये समावेश आहे

टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळGovernmentसरकारNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडcollectorजिल्हाधिकारी