शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

पाण्याअभावी उसाचे नवीन लागवड क्षेत्र घटले; साखरेचे उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 17:36 IST

दिवसेंदिवस पाण्याची कमतरता भासत असल्याने अनेक शेतकऱ्यांची ऊस लागवडीकडे पाठ

- रामेश्वर काकडे नांदेड: गतवर्षी नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील ३० कारखान्यांनी एक कोटी पाच लाख ६५ हजार ७७८ टन उसाचे गाळप केले होते तर एक कोटी सहा लाख ७९ हजार ६४१ क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. परंतु, यावर्षी नांदेड विभागात उसाचे नवीन लागवड क्षेत्र ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने यंदा साखरेच्या उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज ऊस तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

नांदेड विभागात नांदेड ६, लातुर १२, परभणी ७ तर हिंगोली जिल्ह्यात ५ असे एकूण ३० सहकारी साखर कारखाने आहेत. गतवर्षी ३० कारखान्यांनी १ कोटी ५ लाख ६५ हजार ७७८ मे. टन ऊसाचे गाळप केले होते. तर १ कोटी ६ लाख ७९ हजार ६४१ मे टन साखरेचे उत्पादन झाले होते. विभागाचा सरासरी साखर उतारा १०.११ टक्के इतका आला होता. यावर्षी नवीन ऊस लागवड मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने साखर उत्पादनात कमालाची घट येण्याची शक्यता आहे. गतवर्षी ऊस गाळपासाठी ३१ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते, पण त्यापैकी ३० कारखान्यांनी प्रत्यक्षात ऊसाचे गाळप केले. 

विभागातील जिल्हानिहाय ऊस लागवड या हंगामात नांदेड विभागात ऊसासाठी सरासरी असलेले क्षेत्र आणि प्रत्यक्ष झालेली ऊस लागवड अशी- नांदेड सरासरी क्षेत्र २२ हजार ३०३ हेक्टर, प्रत्यक्ष ऊस लागवड २३६२ हेक्टर, ११ टक्के, परभणी २५ हजार ९२ हेक्टर, प्रत्यक्ष लागवड ११ हजार ४३४ हेक्टर, ४६ टक्के, हिंगोली सरासरी क्षेत्र १० हजार ६३६ हेक्टर, लागवड ७ हजार ३१९ हेक्टर, ६९ टक्के, लातुर ३६ हजार ५८४ हेक्टर, प्रत्यक्ष लागवड ७०८ हेक्टर, दोन टक्के याप्रमाणे नांदेड प्रादेशिक सहसंचालक कार्यालयांतर्गत उसाची नवीन लागवड करण्यात आलेली आहे. 

दिवसेंदिवस पाण्याची भासते कमतरताउसाला मिळणारा भाव खर्चाच्या तुलनेत कमी मिळत आहे. त्यात उसाला जास्त पाण्याची आवश्यकता असते. पण, दिवसेंदिवस पाण्याची कमतरता भासत असल्याने अनेक शेतक-यांनी ऊस लागवडीकडे पाठ फरविल्याचे दिसून येते. त्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली व लातुर या चारही जिल्ह्यात ऊस लागवडीचे क्षेत्र घटले आहे. 

२१-२२ मध्ये १ कोटी ४७ लाख टन ऊस गाळप नांदेड विभागात २०२१- २२ या वर्षात नांदेड, परभरणी, लातुर व हिंगोली या चार जिल्ह्यात २७ साखर कारखान्यांनी १ कोटी ४७ लाख ८३४७ मे. टन ऊसाचे गाळप केले होते. तर १ कोटी ५३ लाख २१६५३ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते.

टॅग्स :sugarcaneऊसNandedनांदेडSugar factoryसाखर कारखानेRainपाऊस