शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी उसाचे नवीन लागवड क्षेत्र घटले; साखरेचे उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 17:36 IST

दिवसेंदिवस पाण्याची कमतरता भासत असल्याने अनेक शेतकऱ्यांची ऊस लागवडीकडे पाठ

- रामेश्वर काकडे नांदेड: गतवर्षी नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील ३० कारखान्यांनी एक कोटी पाच लाख ६५ हजार ७७८ टन उसाचे गाळप केले होते तर एक कोटी सहा लाख ७९ हजार ६४१ क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. परंतु, यावर्षी नांदेड विभागात उसाचे नवीन लागवड क्षेत्र ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने यंदा साखरेच्या उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज ऊस तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

नांदेड विभागात नांदेड ६, लातुर १२, परभणी ७ तर हिंगोली जिल्ह्यात ५ असे एकूण ३० सहकारी साखर कारखाने आहेत. गतवर्षी ३० कारखान्यांनी १ कोटी ५ लाख ६५ हजार ७७८ मे. टन ऊसाचे गाळप केले होते. तर १ कोटी ६ लाख ७९ हजार ६४१ मे टन साखरेचे उत्पादन झाले होते. विभागाचा सरासरी साखर उतारा १०.११ टक्के इतका आला होता. यावर्षी नवीन ऊस लागवड मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने साखर उत्पादनात कमालाची घट येण्याची शक्यता आहे. गतवर्षी ऊस गाळपासाठी ३१ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते, पण त्यापैकी ३० कारखान्यांनी प्रत्यक्षात ऊसाचे गाळप केले. 

विभागातील जिल्हानिहाय ऊस लागवड या हंगामात नांदेड विभागात ऊसासाठी सरासरी असलेले क्षेत्र आणि प्रत्यक्ष झालेली ऊस लागवड अशी- नांदेड सरासरी क्षेत्र २२ हजार ३०३ हेक्टर, प्रत्यक्ष ऊस लागवड २३६२ हेक्टर, ११ टक्के, परभणी २५ हजार ९२ हेक्टर, प्रत्यक्ष लागवड ११ हजार ४३४ हेक्टर, ४६ टक्के, हिंगोली सरासरी क्षेत्र १० हजार ६३६ हेक्टर, लागवड ७ हजार ३१९ हेक्टर, ६९ टक्के, लातुर ३६ हजार ५८४ हेक्टर, प्रत्यक्ष लागवड ७०८ हेक्टर, दोन टक्के याप्रमाणे नांदेड प्रादेशिक सहसंचालक कार्यालयांतर्गत उसाची नवीन लागवड करण्यात आलेली आहे. 

दिवसेंदिवस पाण्याची भासते कमतरताउसाला मिळणारा भाव खर्चाच्या तुलनेत कमी मिळत आहे. त्यात उसाला जास्त पाण्याची आवश्यकता असते. पण, दिवसेंदिवस पाण्याची कमतरता भासत असल्याने अनेक शेतक-यांनी ऊस लागवडीकडे पाठ फरविल्याचे दिसून येते. त्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली व लातुर या चारही जिल्ह्यात ऊस लागवडीचे क्षेत्र घटले आहे. 

२१-२२ मध्ये १ कोटी ४७ लाख टन ऊस गाळप नांदेड विभागात २०२१- २२ या वर्षात नांदेड, परभरणी, लातुर व हिंगोली या चार जिल्ह्यात २७ साखर कारखान्यांनी १ कोटी ४७ लाख ८३४७ मे. टन ऊसाचे गाळप केले होते. तर १ कोटी ५३ लाख २१६५३ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते.

टॅग्स :sugarcaneऊसNandedनांदेडSugar factoryसाखर कारखानेRainपाऊस