शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पाण्यासाठी नांदेडकरांचा सर्जिकल स्ट्राईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:49 AM

परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात दिग्रस बंधाऱ्यातून नांदेडसाठी राखीव असलेल्या २५ दलघमी पाणीसाठ्यांपैकी २० दलघमी पाणी शनिवारी भल्यापहाटे सोडण्यात आले़ दुपारपर्यंत विष्णूपुरी प्रकल्पात हे पाणी पोहोचले़ विरोधाच्या पार्श्वभूमीवर गोपनीय पद्धतीने नियोजन करीत नांदेडकरांनी पाण्यासाठी विरोध करणा-यांवर सर्जिकल स्ट्राईकच केल्याचे दिसून आले़

ठळक मुद्देदिग्रसचे पाणी नांदेडलाविष्णूपुरी प्रकल्पाचा पाणीसाठा पोहोचला ५० दलघमीवर

नांदेड : परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात दिग्रस बंधाऱ्यातून नांदेडसाठी राखीव असलेल्या २५ दलघमी पाणीसाठ्यांपैकी २० दलघमी पाणी शनिवारी भल्यापहाटे सोडण्यात आले़ दुपारपर्यंत विष्णूपुरी प्रकल्पात हे पाणी पोहोचले़ विरोधाच्या पार्श्वभूमीवर गोपनीय पद्धतीने नियोजन करीत नांदेडकरांनी पाण्यासाठी विरोध करणा-यांवर सर्जिकल स्ट्राईकच केल्याचे दिसून आले़पाणी सोडण्यासाठी पालम परिसरातील नागरिकांचा होणारा विरोध लक्षात घेता अतिशय गोपनीय पद्धतीने पहाटे तीन वाजताच जलसंपदा विभागाचे अधिकारी मोहीम फत्ते करण्यासाठी पालमकडे रवाना झाले होते़ हक्काचे पाणी मिळविण्यासाठी नांदेडच्या अधिका-यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याचे यातून दिसून आले़ दिग्रसच्या पाण्यामुळे विष्णूपुरीचा पाणीसाठा ५० दलघमीवर पोहोचला असून आगामी दहा महिने हे पाणी शहराची तहान भागवू शकते़यंदा दिग्रस बंधाºयात ३७ दलघमी पाणीसाठा करण्यात आला होता़ त्यापैकी २५ दलघमी पाणी हे नांदेडसाठी राखीव होते़ दिग्रस बंधाºयाची क्षमता ही ६३ दलघमीची असून त्यापैकी ४० दलघमी पाण्यावर नांदेडकरांचा हक्क आहे़ तशी आराखड्यातच नोंद करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता एऩ एम़ कहाळेकर यांनी दिली़परंतु दिग्रस बंधा-यातून नांदेडला पाणी सोडण्यासाठी परभणीकरांचा मोठा विरोध होत होता़ त्यासाठी अनेक मोर्चेही काढण्यात आले होते़ याबाबत नांदेड दक्षिणचे आ़ हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतला़त्यानंतर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांशी चर्चा करुन पाणी नांदेडला मिळावे यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या़ त्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच दिग्रस बंधारा परिसरात २०० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते़ शनिवारी पहाटे तीन वाजता नांदेडहून जलसंपदा विभागाचे पथक पालमकडे रवाना झाले होते़रात्रभर जिल्हाधिकारी डोंगरे हे या पथकाच्या संपर्कात होते़ सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास दिग्रस बंधा-याचे १६ पैकी ९ दरवाजे उघडून गोदावरीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला़ दुपारपर्यंत बंधा-यातील २६ दलघमी पाणीसाठ्यापैकी २० दलघमी पाणी गोदावरीतून विष्णूपुरी प्रकल्पात पोहोचत होते़ सोडलेल्या २० दलघमी पाण्यापैकी ८० टक्के पाणी हे विष्णूपुरीत पोहोचणार असल्याचेही कहाळेकर म्हणाले़ दिग्रसचे पाणी विष्णूपुरीत आल्यामुळे आजघडीला विष्णूपुरीच्या पाणी साठ्यात वाढ होवून ते ५० दलघमीवर पोहोचले आहे़त्यामुळे नांदेडकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे़ दरवर्षी मार्च महिन्यात दिग्रस बंधा-यातून नांदेडसाठी पाणी सोडले जाते़ परंतु, यंदा पाण्याची भीषण समस्या असून दिग्रस बंधा-यातील पाणीसाठाही इतरत्र वापरण्यात येत होता़ त्यामुळे नांदेडकरांनी डिसेंबरमध्येच दिग्रस बंधाºयाचे आपल्या हक्काचे पाणी आणले़ या पाण्यामुळे नांदेडकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे़रोलर गेले चोरीलाविष्णूपुरी प्रकल्पाच्या राईझिंग लाईनला अनेक ठिकाणी गळती लागली आहे़ त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे़ यामागे राईझिंग लाईनमध्ये पाण्याच्या दबावानुसार कमी-जास्त होणारे रोलर चोरीला गेल्यामुळे हा प्रकार घडत आहे़ ही जलवाहिनी ३५ वर्षांपूर्वीची असून त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे़ विशेष म्हणजे, तांत्रिक विभागाने याची काळजी घेण्याची गरज आहे़ जलवाहिनीतून गळती झालेले सर्व पाणी हे परत विष्णूपुरीतच येत असल्याची माहितीही कहाळेकर यांनी दिली़पाण्यासाठी गोपनीय पद्धतीने केले नियोजनदिग्रसमधून पाणी सोडण्यासाठी परभणी जिल्ह्यातील नागरिकांचा मोठा विरोध होत होता़ बंधारा परिसरात शेतकºयांनी अनेक आंदोलनेही केली होती़ त्यात बंधा-यात केवळ २६ दलघमी पाणी असून त्यातील २० दलघमी पाणी नांदेडला सोडल्यास दिग्रसचे वाळवंट होईल, अशी भीती वर्तविण्यात येत होती़ त्यामुळे पाणी सोडताना अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती़ त्यामुळे पाणी सोडण्यासाठी गोपनीय पद्धतीने नियोजन करण्यात आले़ पहाटे तीन वाजता जलसंपदा विभागाचे पथक दिग्रसकडे रवाना झाले होते़ या ठिकाणी अगोदरच मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता़ सकाळी ६ वा़२० मिनिटांनी नऊ दरवाजे उघडून गोदावरीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला़ सकाळी अकरा वाजेपर्यंत दिग्रसमधील २० दलघमी पाणी गोदावरीत झेपावले होते़ त्यामुळे परभणीकरांना विरोधाची संधीच देण्यात आली नाही़अधिका-यांचा गौरवपाण्यासाठी प्रयत्न करणा-या जलसंपदा विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचा-यांचा आ़हेमंत पाटील यांनी सत्कार केला़ यावेळी कार्यकारी अभियंता एऩएमक़हाळेकर, उपकार्यकारी अभियंता नीळकंठ गव्हाणे, शाखा अभियंता मोपले, एल़ बी़ गुडेवार, बी़ एम़ गायकवाड, एस़ आऱ वावरे, एस़व्ही़होळगे यांची यावेळी उपस्थिती होती़ यापूर्वी पथकातील काही अधिकाºयांवर परभणी जिल्ह्यात हल्ल्याच्या घटनाही घडल्या होत्या़ असे असताना हिमतीने आपली मोहीम फत्ते केली़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईDamधरण