शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलद्वारे परीक्षा देण्याचा नांदेडात नवा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:45 IST

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग आणि विद्या प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम मोबाईल अ‍ॅपद्वारे घेण्यात येणारी ‘कलचाचणी व अभिक्षमता’ चाचणी एका केंद्रावर एकाच वेळी ५६७ विद्यार्थ्यांनी देण्याचा नवा विक्रम नांदेडात नोंदविण्याला गेला आहे़

ठळक मुद्देशालेय शिक्षण विभागाचा उपक्रम महात्मा फुले हायस्कूलमध्ये एकदाच ५६७ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

श्रीनिवास भोसले।नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग आणि विद्या प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम मोबाईल अ‍ॅपद्वारे घेण्यात येणारी ‘कलचाचणी व अभिक्षमता’ चाचणी एका केंद्रावर एकाच वेळी ५६७ विद्यार्थ्यांनी देण्याचा नवा विक्रम नांदेडात नोंदविण्याला गेला आहे़ यापूर्वी ठाण्यामध्ये ४३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याची नोंद असून तो आकडा नांदेडने मोडीत काढला आहे़दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभाग व विद्या प्राधीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने कल प अभिक्षमता चाचणी घेण्यात येते़ केवळ माहितीच्या अभावामुळे पालक आणि विद्यार्थी, दहावीनंतर काय? याबाबत द्विधा मन:स्थितीत असतात आणि परिस्थितीजन्य कारणांअभावी कित्येकदा आवड आणि अभिक्षमता नसणाऱ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतला जातो. हा धोका टाळता यावा व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षण आणि रोजगार यातील दरी कमी करण्यासाठी रचनात्मक बदलाचाच भाग म्हणून सदर चाचणी घेण्यात येत आहे़ सदर चाचणीत भाषिक, सांख्यिकीय, अवकाशीय आणि तार्किक या चार क्षमतांचे मापन केले जाते़ यामध्ये वाणिज्य, कला, विज्ञान, यांत्रिक कला, गणवेशधारी सेवा, ललित क्षेत्र आदी क्षेत्रांविषयी विद्यार्थ्यांचा मानसशास्त्रीय दृष्टीकोण तपासला जातो़चाचणीसाठी वेळेची मर्यादा असून क्षमता परीक्षणासाठी १५ मिनिटे व तार्किक, अवकाशीय, सांख्यिकीय क्षमता परीक्षणासाठी प्रत्येकी २० मिनिटे दिली़ यामुळे विद्यार्थ्यांना आवड आणि क्षमता यांची योग्यरित्या सांगड घालण्यास नक्कीच मदत होईल. ‘महाकरिअरमित्र’ अ‍ॅपच्या माध्यमातून परीक्षा घेतली जात आहे़डीआयईसीपीडी, श्रीनगर यांच्या नियोजनाखाली जिल्ह्यातील ६२५ माध्यमिक शाळांत १८ डिसेंबरपासून सदर परीक्षा घेतली जात आहे़ यामध्ये सर्व माध्यमांच्या शाळांचा समावेश असून ५४ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे़ दरम्यान, २७ डिसेंबर रोजी बाबानगर येथील महात्मा फुले हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक व्यंकट पाटील यांच्या नियोजनातून विजयनगर, बाबानगर येथील महात्मा फुले शाळेतील ५६७ विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ५६७ मोबाईलवर परीक्षा देवून नवा विक्रम निर्माण केला आहे़ यशस्वीतेसाठी जिल्हा समन्वयक युवराज देशमुख, जिल्हा समुपदेशक बालासाहेब कच्छवे यांच्यासह मास्टर ट्रेनर, अविरतचे सर्व प्रशिक्षणप्राप्त मुख्याध्यापक परिश्रम घेत आहेत़आतापर्यंत राज्यातील सव्वाआठ लाख विद्यार्थ्यांनी दिली कल चाचणीसन २०१६-१७ मध्ये दहावीच्या बहिस्थ: विद्यार्थ्यांसह एकूण १६ लाख ६७ हजार ४४५ तर २०१७ -१८ मध्ये १७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांनी संगणकाद्वारे दिली होती़ मात्र यंदापासून अभिक्षमता चाचणी ‘मोबाईल अ‍ॅप’द्वारे घेण्यात येत असून त्यास विद्यार्थी आणि पालकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे़ दरम्यान, आपल्या आवडीच्या क्षेत्रांचे व तज्ज्ञांचे मार्गदर्शनात्मक व्हिडीओज पाहू शकतील व तज्ज्ञांचे लेख वाचू शकतील. २०१८-१९ साठीची कल व अभिक्षमता चाचणी १८ डिसेंबर २०१८ रोजी शाळांमध्ये सुरु झाली असून आजपर्यंत ८ लाख २२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली़ त्यासाठी ४ लाख ९२ हजारपेक्षा जास्त मोबाईल फोन वापरले गेले आहेत़ठाण्याचा रेकॉर्ड मोडलायापूर्वी ठाण्यात ४३८ विद्यार्थ्यांनी एकाच वेळी परीक्षा दिली होती़ तो तोडून ५६७ विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड महात्मा फुले शाळेच्या माध्यमातून नांदेडच्या नावे निर्माण झाला आहे़ तसेच सातारा - ३८५, बुलढाणा- ३००, कन्नड - २४५ तर अकोला येथे २१५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याची नोंद आहे़

टॅग्स :NandedनांदेडStudentविद्यार्थीEducationशिक्षणSchoolशाळा