शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीचे ६९३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 3:52 PM

राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ६९३ कोटी ९७ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत़

ठळक मुद्दे आता नव्याने अर्ज करण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली एकट्या बँक आॅफ इंडियाच्या ७० हजार २०९ नऊ शेतकऱ्यांच्या खात्यातील तब्बल ४७४ कोटी ४२ लाख रुपये माफ केले आहेत़

नांदेड : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ६९३ कोटी ९७ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत़ त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह इतरही खाजगी बँकांचा समावेश आहे़ आता नव्याने अर्ज करण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे़ आतापर्यंत एकट्या बँक आॅफ इंडियाच्या ७० हजार २०९ नऊ शेतकऱ्यांच्या खात्यातील तब्बल ४७४ कोटी ४२ लाख रुपये माफ केले आहेत़

आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना असल्याचा राज्य शासनाने प्रचार केला़ परंतु सुरुवातीच्या टप्प्यात कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरतानाच शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला होता़ त्यात कोणत्याही एकाच खात्यातील रक्कम माफ होणार असल्याच्या निर्णयानंतर अगोदर फुगलेली शेतकऱ्यांची संख्या पडताळणीत कमी झाली़ 

त्यानंतरही कागदपत्रांची जमवाजमव करताना शेतकऱ्यांना बँकाचे उंबरठे झिजवावे लागले़ त्यात आता शासनाने दीड लाखांवरील कर्जाची रक्कम भरण्यासाठी सेटलमेंट योजना आणली़ त्यासाठी अगोदरच ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती़ परंतु सेटलमेंटला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादामुळे त्याची मुदत आता ३० एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे़ तर कर्जमाफीसाठी नवीन शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठीही मुदतवाढ देण्यात आली आहे़ तर दुसरीकडे आतापर्यंत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या ग्रीन लिस्ट येणेही सुरुच आहे़ त्यामुळे कर्जमाफीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे़ 

बँकनिहाय मिळालेली कर्जमाफी- जिल्हा मध्यवर्ती बँक-३७ हजार १७५ शेतकरी - ४९ कोटी ७७ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँक- १८ हजार ४५२ शेतकरी -१०८ कोटी ५६ लाख रुपये, अलाहाबाद बँक-१६०-७८ लाख, आंध्रा बँक-२६-२० लाख, बँक आॅफ बडोदा-१४१-५६ लाख, बँक आॅफ इंडिया-३००-१ कोटी १ लाख, बँक आॅफ महाराष्ट्र-६ हजार २३१-२९ कोटी ७६ लाख, कॅनरा बँक-३४८- १ कोटी ८० लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया-२०-१४ कोटी ७६ लाख, कॉर्पोरेशन बँक-४१, २७ लाख, देना बँक-११६८-७ कोटी ७९ लाख, इंडियन ओवरसीज बँक-५-५ लाख, ओबीसी बँक-३२-१९ लाख, पंजाब अ‍ॅन्ड सिंध बँक-३८-२५ लाख, पंजाब नॅशनल बँक-४३-१८ बँक, सिंडीकेट बँक-१३-१२ लाख, आयसीआयसीआय बँक-३-३ लाख, युनियन बँक आॅफ इंडिया-३११-२ कोटी ११ लाख, एक्सीस बँक-६-५ लाख, एचडीएफसी बँक-२७२- १ कोटी २९ लाख, डेव्हलपमेंट क्रेडीट बँक-४- २ लाख रुपये या बँकातील शेतकऱ्यांच्या खात्यावर भरले़ तर आयडीबीआय, विजया, कर्नाटका, युको, कोटक महिंद्रा व करुर वैश्य या बँकांना मात्र कर्जमाफीचे कोणतेही उद्दिष्ट नसल्याचे आढळून आले़ 

तीन महिन्यांत २५ आत्महत्याकर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना कमी होतील, असा अंदाज बांधण्यात येत होता़ परंतु तो साफ चुकीचा ठरला़ गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात २५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे़ त्यामध्ये १७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत़ तर ८ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत़ गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल ७५१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे़ 

मुदतवाढीचा लाभ घ्यावाकर्जमाफीच्या योजनेसाठी नवीन शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़ तर सेटलमेंटसाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत वाढविण्यात आली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील  शेतकऱ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे़ 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजनाbankबँकMONEYपैसा