शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

‘माझा मुलगा इतरांमध्ये जिवंत राहील’; शेतकरी पित्याचा मोठा निर्णय, मृत मुलाचे अवयवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 13:51 IST

दुर्दैवी मृत्यूच्या वेदनेतून अवयवदानाने दिली आशा; नांदेडच्या पंडित काळे यांचा हैद्राबादेत ग्रीन कॉरिडॉर

नांदेड : अपघाती मृत्यू झालेल्या तरुण मुलाला शेवटचा निरोप देताना शेतकरी पित्याचे डोळे पाणावले. “मुलाचा मृत्यू सहन होत नाही, पण त्याच्या जाण्यानंतर त्याचे अवयव कुणा गरजूंच्या जीवनात नवप्रकाश घेऊन आले, याचं समाधान आहे,” अशी भावना व्यक्त करून आपण समाजाचे देणे लागत असल्याचे दायित्व काळे कुटुंबीयांनी दु:खद प्रसंगीही पार पाडले.

शेतकरी कुटुंबातील पंडित व्यंकटराव काळे (वय ४२रा.जुना कौठा, नांदेड) यांचा सासरवाडीकडून गावी परत येत असताना ३ जुलै रोजी डेरला पाटीजवळील पुलावर दुचाकी अपघात झाला होता. जखमी अवस्थेत नागरिकांनी त्यांना नांदेड येथील यशोसाई रुग्णालयात दाखल केले होते. हृदय व अन्य अवयव काम करत असले, तरी मेंदूची संवेदना जाणवत नसल्याचे डॉक्टरांनी नातेवाइकांना सांगितले. मुलगा ब्रेनडेड झाल्याचे मान्य करणं काळे कुटुंबीयांसाठी अत्यंत अवघड ठरत होते. आशेचा शेवटचा किरण म्हणून नातलगांनी पंडित यास उपचारासाठी हैद्राबाद येथे एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार करूनही प्रकृती सुधारणार नसल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले, तसेच अवयवदान केल्यास अन्य व्यक्तींच्या माध्यमातून मुलगा जिवंत असल्याची अनुभूती होईल, असा सल्ला समुपदेशकांनी दिला. त्यावर मरणोत्तर अवयदानाबाबत पंडित जागरूक होता, तसेच अपघाती अथवा अकाली निधन झाल्यास वापरायोग्य अवयव दान करावेत, अशी त्याची इच्छा असल्याचे सांगून शेतकरी असलेल्या या कुटुंबाने ग्रीन कॉरिडॉरसाठी अनुकूलता दर्शविली.

धाडसी निर्णय अनेकांसाठी प्रेरणास्रोत६ जुलै रोजी सर्व वैद्यकीय तपासण्या झाल्यावर, ७ जुलै रोजी सकाळी विशेष डॉक्टरांच्या टीमने हृदय, दोन्ही किडनी, यकृत (लिव्हर), फुप्फुस यांचे संकलन केले. या अवयवांना वेळेत योग्य रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. पंडित काळेंच्या मरणोत्तर योगदानातून देशातील विविध ठिकाणी अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळाली. त्यानंतर, सोमवारी रात्री उशिरा नांदेड येथे पंडित काळे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत, पंडित काळेंना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यापश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे. काळे कुटुंबाने घेतलेला हा धाडसी निर्णय आज अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरत असून, अवयवदानाबाबत जनजागृतीचे आणि विचारप्रवृत्त होण्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेकांना जीवदान देऊन गेल्याचे समाधानतरुण मुलाचे अकाली निधन होईल, असे वाटले नव्हते. घटना दुर्दैवी असली, तरी जड अंतःकरणाने सत्य स्वीकारले. मरणोत्तर अवयवदानाच्या माध्यमातून पंडित भविष्यातही जगात कायम राहणार आहे. मुलाच्या जाण्याने आयुष्याची पोकळी कायम राहणार आहे. मात्र, आयुष्यभर ज्याने समाजाची सेवा केली आणि मृत्यूनंतरही तो गरजू, व्याधींनी ग्रासलेल्या अनेकांना जीवदान देऊन गेल्याचे समाधान असल्याची भावना शेतकरी असलेले पंडितचे वडील व्यंकटराव काळे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :NandedनांदेडOrgan donationअवयव दानMedicalवैद्यकीय