शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
4
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
5
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
6
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
7
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
8
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
9
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
10
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
11
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
12
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
13
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
14
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
15
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
16
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
18
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
19
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
20
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
Daily Top 2Weekly Top 5

तुटपुंजी मदत परत करणार म्हणताच शेतकऱ्यांना मंत्री राठोड म्हणाले, 'जास्त नुकसान, जास्त मदत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:09 IST

'९० दिवसांचे पीक, ६० दिवस पाऊस; सांगा साहेब, पीक कसे वाचणार?'; रुई येथील शेतकऱ्यांची मंत्र्यांसमोर व्यथा

हदगाव (नांदेड): सततच्या पावसामुळे खरीप हंगाम पूर्णतः हातचा गेला असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज रुई (ता. हदगाव) येथे राज्याचे जल व मृद संधारण मंत्री संजय राठोड यांच्या पाहणी दौऱ्यात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी हेक्टरी आठ हजार रुपयांची मदत तुटपुंजी असून, ती परत करण्याची वेळ आली आहे, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.

९० दिवसांचे पीक, त्यात ६० दिवस पाऊसहदगाव तालुक्यातील रुई येथे कयादू नदीकाठी असलेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री राठोड यांनी भेट दिली. यावेळी भर पावसातही शेकडो शेतकरी आपली व्यथा मांडण्यासाठी उपस्थित होते. "आम्ही पैसा टाकून बसलो आहोत, पण ९० दिवसांचे पीक आणि ६० दिवस पाऊस झाला, तर सांगा साहेब, पीक वाचणार तरी कसे?" असा प्रश्न शेतकऱ्यांनी मंत्र्यांना विचारला.

यावेळी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडताना थेट कर्जमाफीची मागणी केली. "यापूर्वी जाहीर केलेली मदत त्यावेळेसचे नुकसान पाहून होती, पण आता सप्टेंबर महिनाभर पाऊस झाल्याने थोडीफार आशा होती तीही मावळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांना आमच्या वेदना सांगा. आता नाही कर्ज माफ करणार तर कधी करणार?" असा सवाल कोहळीकर यांनी केला.

'जास्त नुकसान झालेल्यांना जास्त मदत'शेतकऱ्यांचा संताप आणि मागणी ऐकून मंत्री संजय राठोड यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, "ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले आहे, त्यांना मदतही जास्त मिळालीच पाहिजे." शेतकऱ्यांच्या तात्काळ मदतीच्या मागणीला त्यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, "तुमच्या भावना आणि मागण्या मी मुख्यमंत्री यांच्याकडे मांडणार आहे. तुमच्या पिकाच्या नुकसानीचा लेखाजोखा मंत्रिमंडळात ठेवला जाईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल."

पत्रकारांनी बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनावर मंत्र्यांची प्रतिक्रिया विचारली असता, "मी नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर आहे, तो विषय वेगळा आहे, त्यावर पुन्हा बोलू," असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. या पाहणी दौऱ्यात माजी खासदार सुभाष वानखेडे, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विवेक देशमुख यांच्यासह अनेक स्थानिक नेते उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : More damage, more aid: Minister assures farmers after inspection.

Web Summary : Farmers demand increased aid after crop loss due to incessant rains. Minister Rathod promised to present their concerns to the Chief Minister and ensure fair compensation based on the extent of damage during his visit.
टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडfloodपूरRainपाऊसFarmerशेतकरी