शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

तुटपुंजी मदत परत करणार म्हणताच शेतकऱ्यांना मंत्री राठोड म्हणाले, 'जास्त नुकसान, जास्त मदत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:09 IST

'९० दिवसांचे पीक, ६० दिवस पाऊस; सांगा साहेब, पीक कसे वाचणार?'; रुई येथील शेतकऱ्यांची मंत्र्यांसमोर व्यथा

हदगाव (नांदेड): सततच्या पावसामुळे खरीप हंगाम पूर्णतः हातचा गेला असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज रुई (ता. हदगाव) येथे राज्याचे जल व मृद संधारण मंत्री संजय राठोड यांच्या पाहणी दौऱ्यात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी हेक्टरी आठ हजार रुपयांची मदत तुटपुंजी असून, ती परत करण्याची वेळ आली आहे, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.

९० दिवसांचे पीक, त्यात ६० दिवस पाऊसहदगाव तालुक्यातील रुई येथे कयादू नदीकाठी असलेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री राठोड यांनी भेट दिली. यावेळी भर पावसातही शेकडो शेतकरी आपली व्यथा मांडण्यासाठी उपस्थित होते. "आम्ही पैसा टाकून बसलो आहोत, पण ९० दिवसांचे पीक आणि ६० दिवस पाऊस झाला, तर सांगा साहेब, पीक वाचणार तरी कसे?" असा प्रश्न शेतकऱ्यांनी मंत्र्यांना विचारला.

यावेळी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडताना थेट कर्जमाफीची मागणी केली. "यापूर्वी जाहीर केलेली मदत त्यावेळेसचे नुकसान पाहून होती, पण आता सप्टेंबर महिनाभर पाऊस झाल्याने थोडीफार आशा होती तीही मावळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांना आमच्या वेदना सांगा. आता नाही कर्ज माफ करणार तर कधी करणार?" असा सवाल कोहळीकर यांनी केला.

'जास्त नुकसान झालेल्यांना जास्त मदत'शेतकऱ्यांचा संताप आणि मागणी ऐकून मंत्री संजय राठोड यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, "ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले आहे, त्यांना मदतही जास्त मिळालीच पाहिजे." शेतकऱ्यांच्या तात्काळ मदतीच्या मागणीला त्यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, "तुमच्या भावना आणि मागण्या मी मुख्यमंत्री यांच्याकडे मांडणार आहे. तुमच्या पिकाच्या नुकसानीचा लेखाजोखा मंत्रिमंडळात ठेवला जाईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल."

पत्रकारांनी बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनावर मंत्र्यांची प्रतिक्रिया विचारली असता, "मी नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर आहे, तो विषय वेगळा आहे, त्यावर पुन्हा बोलू," असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. या पाहणी दौऱ्यात माजी खासदार सुभाष वानखेडे, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विवेक देशमुख यांच्यासह अनेक स्थानिक नेते उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : More damage, more aid: Minister assures farmers after inspection.

Web Summary : Farmers demand increased aid after crop loss due to incessant rains. Minister Rathod promised to present their concerns to the Chief Minister and ensure fair compensation based on the extent of damage during his visit.
टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडfloodपूरRainपाऊसFarmerशेतकरी