शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

दुष्काळातही सोहळे, उत्सवावर लाखोंचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:16 IST

दुष्काळ पडला म्हटले तरी पोटात गोळा उठतो. डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. ज्यांनी १९७२ चा दुष्काळ अनुभवला ते आजही झाडपाला खाऊन दिवस काढल्याच्या आठवणी सांगतात.

ठळक मुद्देहदगाव तालुका : २२ गावांत १०० लग्नकर्जबाजारी होवून लग्नात पैशांची उधळपट्टी करण्याचा प्रघात

सुनील चौरे।हदगाव : दुष्काळ पडला म्हटले तरी पोटात गोळा उठतो. डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. ज्यांनी १९७२ चा दुष्काळ अनुभवला ते आजही झाडपाला खाऊन दिवस काढल्याच्या आठवणी सांगतात. परंतु, आता दुष्काळग्रस्त गावांत लग्नाचा सुकाळ झाला असून धार्मिक कार्यक्रम जयंतीवरही लाखोंचा खर्च केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़तालुक्यात सरासरीपेक्षा निम्मा पाऊस झाला. यामुळे कोरडवाहू शेतीसह बागायती शेतीतील उत्पन्नाला फटका बसला. कापूस, मूग, उडीद, सोयाबीन याची आणेवारी कमी आल्याने जिल्ह्यात मनाठा मंडळाचा समावेश दुष्काळात झाला. यामुळे २०-२२ गावांचा समावेश आहे. निसर्गाची अवकृपा झाल्याने माणूस हतबल होतो. शेती असा व्यवसाय आहे की, नफ्याची खात्री नाहीच. उपवर झालेल्या मुलीच्या लग्नाचीही चिंता कुटुंबाला असते.मुलीच्या लग्नासाठी तिच्या जन्मापासून बचत केली जाते. परंतु, सतत पडत असलेल्या दुष्काळामुळे फिक्स डिपॉझीट काढण्याची वेळही शेतकऱ्यांवर आली आहे. सुगी चांगली येईल या आशेने शेतकरी शेतीवर खर्च करतो. लहरी पावसामुळे, हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजामुळे शेतकरीवर्ग कर्जबाजारी होत आहे. अशाच गावात तीन महिन्यांत शेकडो लग्न होत आहेत.या लग्नात होणा-या खर्चावर कुठेही बारकाई दिसत नाही. फटाके, डेकोरेशन, बँड, स्वयंपाकातील विविध पदार्थ व लग्नाला आमंत्रित होणारे शेकडो नातेवाईक यामुळे खर्च अमाप होतो. यावर उपाय म्हणून सामूहिक विवाह मेळावे घेण्यात येतात. तर कुठे सर्वधर्मीय विवाह मेळावेही घेतले जातात. परंतु आजही सामाजिक दडपणामुळे व अहंकारामुळे अनेक मंडळी कर्जबाजारी होऊन लग्नावर खर्च करतात व शेवटी नैराश्यात येतात.

वाढदिवसाचे बॅनर लावून केला जातो खर्च

  • गावात ज्येष्ठ नागरिकांना, निराधारांना पगार नाही. सहाशे रुपये महिना मिळावा यासाठी ही मंडळी एकीकडे पुढाऱ्यांच्या पाठीमागे फिरताना दिसते तर दुसरीकडे हीच पुढारी मंडळी नेत्याच्या वाढदिवसाचे बॅनर काढण्यात दंग झालेले दिसतात. दुष्काळग्रस्त गावांत लग्नाचा सुकाळ पाहिल्यानंतर येथे दुष्काळ नाही. कागदावरच हा दुष्काळ आहे़
  • पळसा येथील शेतक-याने शेतातील हरभरा आगीत जळाल्यामुळे मुलीचे ठरलेले लग्न कसे करावे? या विवंचनेतून आत्महत्या केली. २२ गावांतही सध्या पारायण, अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहेत. एका कार्यक्रमासाठी साधारणत: ५० हजार ते १ लक्ष रुपये खर्च होतो़ दुष्काळ पडल्यामुळे निदान त्यावर्षी खर्च करण्यात येऊ नये. परंतु पुढारी ऐकत नाहीत.
टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळmarriageलग्न