शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

दुष्काळातही सोहळे, उत्सवावर लाखोंचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:16 IST

दुष्काळ पडला म्हटले तरी पोटात गोळा उठतो. डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. ज्यांनी १९७२ चा दुष्काळ अनुभवला ते आजही झाडपाला खाऊन दिवस काढल्याच्या आठवणी सांगतात.

ठळक मुद्देहदगाव तालुका : २२ गावांत १०० लग्नकर्जबाजारी होवून लग्नात पैशांची उधळपट्टी करण्याचा प्रघात

सुनील चौरे।हदगाव : दुष्काळ पडला म्हटले तरी पोटात गोळा उठतो. डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. ज्यांनी १९७२ चा दुष्काळ अनुभवला ते आजही झाडपाला खाऊन दिवस काढल्याच्या आठवणी सांगतात. परंतु, आता दुष्काळग्रस्त गावांत लग्नाचा सुकाळ झाला असून धार्मिक कार्यक्रम जयंतीवरही लाखोंचा खर्च केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़तालुक्यात सरासरीपेक्षा निम्मा पाऊस झाला. यामुळे कोरडवाहू शेतीसह बागायती शेतीतील उत्पन्नाला फटका बसला. कापूस, मूग, उडीद, सोयाबीन याची आणेवारी कमी आल्याने जिल्ह्यात मनाठा मंडळाचा समावेश दुष्काळात झाला. यामुळे २०-२२ गावांचा समावेश आहे. निसर्गाची अवकृपा झाल्याने माणूस हतबल होतो. शेती असा व्यवसाय आहे की, नफ्याची खात्री नाहीच. उपवर झालेल्या मुलीच्या लग्नाचीही चिंता कुटुंबाला असते.मुलीच्या लग्नासाठी तिच्या जन्मापासून बचत केली जाते. परंतु, सतत पडत असलेल्या दुष्काळामुळे फिक्स डिपॉझीट काढण्याची वेळही शेतकऱ्यांवर आली आहे. सुगी चांगली येईल या आशेने शेतकरी शेतीवर खर्च करतो. लहरी पावसामुळे, हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजामुळे शेतकरीवर्ग कर्जबाजारी होत आहे. अशाच गावात तीन महिन्यांत शेकडो लग्न होत आहेत.या लग्नात होणा-या खर्चावर कुठेही बारकाई दिसत नाही. फटाके, डेकोरेशन, बँड, स्वयंपाकातील विविध पदार्थ व लग्नाला आमंत्रित होणारे शेकडो नातेवाईक यामुळे खर्च अमाप होतो. यावर उपाय म्हणून सामूहिक विवाह मेळावे घेण्यात येतात. तर कुठे सर्वधर्मीय विवाह मेळावेही घेतले जातात. परंतु आजही सामाजिक दडपणामुळे व अहंकारामुळे अनेक मंडळी कर्जबाजारी होऊन लग्नावर खर्च करतात व शेवटी नैराश्यात येतात.

वाढदिवसाचे बॅनर लावून केला जातो खर्च

  • गावात ज्येष्ठ नागरिकांना, निराधारांना पगार नाही. सहाशे रुपये महिना मिळावा यासाठी ही मंडळी एकीकडे पुढाऱ्यांच्या पाठीमागे फिरताना दिसते तर दुसरीकडे हीच पुढारी मंडळी नेत्याच्या वाढदिवसाचे बॅनर काढण्यात दंग झालेले दिसतात. दुष्काळग्रस्त गावांत लग्नाचा सुकाळ पाहिल्यानंतर येथे दुष्काळ नाही. कागदावरच हा दुष्काळ आहे़
  • पळसा येथील शेतक-याने शेतातील हरभरा आगीत जळाल्यामुळे मुलीचे ठरलेले लग्न कसे करावे? या विवंचनेतून आत्महत्या केली. २२ गावांतही सध्या पारायण, अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहेत. एका कार्यक्रमासाठी साधारणत: ५० हजार ते १ लक्ष रुपये खर्च होतो़ दुष्काळ पडल्यामुळे निदान त्यावर्षी खर्च करण्यात येऊ नये. परंतु पुढारी ऐकत नाहीत.
टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळmarriageलग्न