शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

दुष्काळातही सोहळे, उत्सवावर लाखोंचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:16 IST

दुष्काळ पडला म्हटले तरी पोटात गोळा उठतो. डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. ज्यांनी १९७२ चा दुष्काळ अनुभवला ते आजही झाडपाला खाऊन दिवस काढल्याच्या आठवणी सांगतात.

ठळक मुद्देहदगाव तालुका : २२ गावांत १०० लग्नकर्जबाजारी होवून लग्नात पैशांची उधळपट्टी करण्याचा प्रघात

सुनील चौरे।हदगाव : दुष्काळ पडला म्हटले तरी पोटात गोळा उठतो. डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. ज्यांनी १९७२ चा दुष्काळ अनुभवला ते आजही झाडपाला खाऊन दिवस काढल्याच्या आठवणी सांगतात. परंतु, आता दुष्काळग्रस्त गावांत लग्नाचा सुकाळ झाला असून धार्मिक कार्यक्रम जयंतीवरही लाखोंचा खर्च केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़तालुक्यात सरासरीपेक्षा निम्मा पाऊस झाला. यामुळे कोरडवाहू शेतीसह बागायती शेतीतील उत्पन्नाला फटका बसला. कापूस, मूग, उडीद, सोयाबीन याची आणेवारी कमी आल्याने जिल्ह्यात मनाठा मंडळाचा समावेश दुष्काळात झाला. यामुळे २०-२२ गावांचा समावेश आहे. निसर्गाची अवकृपा झाल्याने माणूस हतबल होतो. शेती असा व्यवसाय आहे की, नफ्याची खात्री नाहीच. उपवर झालेल्या मुलीच्या लग्नाचीही चिंता कुटुंबाला असते.मुलीच्या लग्नासाठी तिच्या जन्मापासून बचत केली जाते. परंतु, सतत पडत असलेल्या दुष्काळामुळे फिक्स डिपॉझीट काढण्याची वेळही शेतकऱ्यांवर आली आहे. सुगी चांगली येईल या आशेने शेतकरी शेतीवर खर्च करतो. लहरी पावसामुळे, हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजामुळे शेतकरीवर्ग कर्जबाजारी होत आहे. अशाच गावात तीन महिन्यांत शेकडो लग्न होत आहेत.या लग्नात होणा-या खर्चावर कुठेही बारकाई दिसत नाही. फटाके, डेकोरेशन, बँड, स्वयंपाकातील विविध पदार्थ व लग्नाला आमंत्रित होणारे शेकडो नातेवाईक यामुळे खर्च अमाप होतो. यावर उपाय म्हणून सामूहिक विवाह मेळावे घेण्यात येतात. तर कुठे सर्वधर्मीय विवाह मेळावेही घेतले जातात. परंतु आजही सामाजिक दडपणामुळे व अहंकारामुळे अनेक मंडळी कर्जबाजारी होऊन लग्नावर खर्च करतात व शेवटी नैराश्यात येतात.

वाढदिवसाचे बॅनर लावून केला जातो खर्च

  • गावात ज्येष्ठ नागरिकांना, निराधारांना पगार नाही. सहाशे रुपये महिना मिळावा यासाठी ही मंडळी एकीकडे पुढाऱ्यांच्या पाठीमागे फिरताना दिसते तर दुसरीकडे हीच पुढारी मंडळी नेत्याच्या वाढदिवसाचे बॅनर काढण्यात दंग झालेले दिसतात. दुष्काळग्रस्त गावांत लग्नाचा सुकाळ पाहिल्यानंतर येथे दुष्काळ नाही. कागदावरच हा दुष्काळ आहे़
  • पळसा येथील शेतक-याने शेतातील हरभरा आगीत जळाल्यामुळे मुलीचे ठरलेले लग्न कसे करावे? या विवंचनेतून आत्महत्या केली. २२ गावांतही सध्या पारायण, अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहेत. एका कार्यक्रमासाठी साधारणत: ५० हजार ते १ लक्ष रुपये खर्च होतो़ दुष्काळ पडल्यामुळे निदान त्यावर्षी खर्च करण्यात येऊ नये. परंतु पुढारी ऐकत नाहीत.
टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळmarriageलग्न