शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

पाण्याअभावी होंडाळा ग्रामस्थांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:55 AM

होंडाळा पाणीपुरवठा करणारे मोठे मुख्य स्त्रोत नसल्यामुळे या गावाला दरवर्षीच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ नागरिकांना पिण्यासाठी ५ रुपयाला एक घागर खाजगी बोरचे विकत घ्यावे लागते

दत्तात्रय कांबळे।मुखेड: होंडाळा पाणीपुरवठा करणारे मोठे मुख्य स्त्रोत नसल्यामुळे या गावाला दरवर्षीच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ नागरिकांना पिण्यासाठी ५ रुपयाला एक घागर खाजगी बोरचे विकत घ्यावे लागते तर गावाजवळील एका तलावातून अशुद्ध पाणी नळाद्वारे सोडले जाते़ तर २ हजार ५०० नागरिकांची टँकरच्या एकाच फेरीवर तहान भागवली जाते़ यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले असल्याचे विदारक चित्र होंडाळा गावात आहे.मुखेड तालुक्यातील जांब बु. बाजारपेठेजवळ असलेले होंडाळा हे गाव २ हजार ५०० लोकसंख्या असलेले व ४०० पेक्षा जास्त कुटुंबसंख्या असलेले ९ ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेले मोठे गाव असून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठा स्त्रोत नसल्यामुळे दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ३० ते ३५ वर्षापूर्वी शासकीय योजनेतून सांगवी बेनक शिवारातील तलावाच्या खाली विहीर खोदून पाणी पुरवठा केला जातो़आजही त्याच ठिकाणाहून ३० ते ३५ वर्षांपासून पाणीपुरवठा गावाला केला जातो़ या सततच्या पाईपलाईन वापरामुळे ही पाईपलाईन कुचकामी झाली असून जागोजागी फुटलेल्या अवस्थेमध्ये दिसून येते़ गावाजवळ कोठेच जलस्त्रोत नाही़ यामुळे एका तलावातून पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये टाकून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा टाकीत घेतले जाते. हेच अशुद्ध पाणी एक दिवस किंवा दोन दिवसाआड सोडले जाते.अशा दूषित पाण्याच्या वापरामुळे गावांमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पाण्यापासून होणारे रोग कावीळ, कॉलरा अशा वेगवेगळ्या आजारांना नागरिकांना बळी पडावे लागत आहे. ग्रामपंचायतच्या मागणीप्रमाणे दोन पाणी टँकरची मागणी केली आणि दोन टँकरची मंजुरी पण मिळाली; पण आजघडीला गावात एका टँकरने एकच फेरी केली जाते.गावची शेती सुद्धा कोरडवाहू जमीन, खरीपाची शेती असून गावांमध्ये कोणताही उद्योग व्यवसाय नाही. या परिस्थितीमुळे होंडाळातील जवळपास २० टक्के लोक गाव सोडून विटकाम, ऊस काम, पुणे, मुंबई, हैदराबाद, अशा शहरात कामासाठी स्थलांतरित झालेले आहेत़ त्यामुळे गाव ओसाड झाले आहे़येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील बोरचे पाणी गावांमध्ये पाईपलाईन द्वारे आणले असून त्या नळाचे पाणी ५ रुपयाला १ भांडे पाणी याप्रमाणे विक्री करतो. यांना विचारले असता ते म्हणाले की बोअरचे पाणी गावाला पुरत नाही. म्हणून अधिग्रहण करता येत नाही़ यामुळे मी हा उपक्रम सुरू केला असे म्हणाले.

 

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई