शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

१८० दलघमीची तरतूद करून लेंडी प्रकल्पाला सुधारित मान्यतेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 19:17 IST

महाराष्ट्र व तेलंगणा राज्याचा संयुक्त उपक्रम म्हणून लेंडी प्रकल्पाकडे पाहिले जाते.

नांदेड : महाराष्ट्रतेलंगणा राज्याचा संयुक्त उपक्रम म्हणून लेंडी प्रकल्पाकडे पाहिले जाते. मात्र या प्रकल्पातही खोडा घालण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून सुरु आहे. २००९ च्या प्रस्तावानुसार या प्रकल्पासाठी १८० दलघमी येवा मान्य करुन या प्रकल्पास सुधारित मान्यता द्यावी. तसेच जल आराखड्यात १८० दलघमी पाण्याची तरतूद करावी, अशी मागणीही खा. चव्हाण यांनी केली आहे.

लेंडी प्रकल्प महाराष्ट्र  आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांना सिंचन देणारा प्रकल्प आहे. १९८६ मध्ये शंकरराव चव्हाण पुढाकारातून १८० दलघमी पाणी वापरासाठी हा प्रकल्प पुढे आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून १५ हजार ७१० हेक्टर आणि तेलंगणातील ११ हजार २१४ हेक्टर सिंचित होणार आहे. मूळ प्रस्तावानुसार महाराष्ट्राने प्रकल्पासाठी ६२ टक्के खर्च करायचा आहे. तर उर्वरित ३८ टक्के खर्च आता तेलंगणा करणार आहे. या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झालेले असून कालव्यांची कामेही सुमारे ७५ टक्के पूर्ण झाली आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली सर्व जमीनही अधिग्रहित करण्यात आली असून केवळ ३ टक्के गावठाणाच्या पुनर्वसनाचे काम शिल्लक आहे.

१९८६ पासून या प्रकल्प उभारणीची प्रक्रिया सुरु आहे. त्यातच पुनर्वसनाच्या अनुषंगाने काही वाद निर्माण झाल्याने प्रकल्प पूर्णत्वासाठी विलंब झाला. सद्य:स्थितीत सुमारे ५०० कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च झाले आहेत. या प्रकल्पात १८० दलघमी येवा २००९ च्या प्रस्तावानुसार मान्य करण्यात आला आहे. मात्र पुन्हा नव्याने या प्रकल्पाचा अभ्यास करण्याचे तसेच प्रमाणपत्र घेण्याबाबतचा आग्रह केला जात आहे. हा प्रकार या प्रकल्पात खोडा घालणारा असल्याची टीका करीत प्रकल्पास तातडीने सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी. तसेच जल आराखड्यात १८० दलघमी पाण्याची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबरोबरच भोकर तालुक्यातील रेणापूर सुधा प्रकल्पाची उंची वाढवावी, पिंपळगाव, दिवशी, पाकी व जाकापूर या प्रकल्पांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध करुन द्यावे, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या  कालवा दुरुस्तीसाठी यंत्रसामग्री उपलब्ध करुन देण्याची मागणी खा. चव्हाण यांनी केली आहे.

ग्रीड पद्धतीचे वेगळे आरक्षण नकोउर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील ५.३१ टीएमसी पाणी बिगरसिंचन प्रयोजनासाठी आरक्षित केले जाते. त्यामुळे मराठवाड्यात ग्रीड पद्धतीने इसापूर धरणातून ५.२९ टीएमसी पाणी आरक्षित केल्यास ते शेती सिंचनासाठी मिळणार नाही. पर्यायाने या भागातील शेतक-यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे या पाण्यावर वेगळ्या ग्रीड पद्धतीने आरक्षण लावू नका, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणLendi Lakeलेंडी तलावWaterपाणीTelanganaतेलंगणाMaharashtraमहाराष्ट्र