शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कंधार तालुक्यात ८५६ जलस्त्रोतांची अ‍ॅपद्वारे तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:29 IST

मान्सूनपश्चात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे मोबाईल अ‍ॅपद्धारे नमुने संकलित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यात ९४९ पैकी ८५६ पाणीनमुने गोळा झाले असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील सरासरी काम २० जानेवारीपर्यंत ८१.६६ टक्के झाले आहे.

प्रा. डॉ. गंगाधर तोगरे।कंधार : मान्सूनपश्चात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे मोबाईल अ‍ॅपद्धारे नमुने संकलित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यात ९४९ पैकी ८५६ पाणीनमुने गोळा झाले असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील सरासरी काम २० जानेवारीपर्यंत ८१.६६ टक्के झाले आहे. तर कंधार तालुक्याचे काम ९०.२० टक्के झाले आहे. संकलित पाणीनमुने तपासणीअंती पिण्यास योग्य की अयोग्य, याचे वास्तव उलगडणार आहे.राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी दिलेल्या निर्देशानुसार जि. प. ही जिल्ह्याभर मोहीम राबवित आहे. कंधार तालुकास्तरावर ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या योजना व स्त्रोतांची रासायनिक तपासणीसाठी मोबाईल अ‍ॅपद्धारे पाणीनमुने गोळा करण्यात येत आहेत. १० आॅक्टो २०१८ ते २० जानेवारी २०१९ या कालावधीत गावे, वाडी, तांडे आदी भागात जाऊन पाणीनमुने संकलित करण्यात आले. पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रमात तालुक्याचे ९४९ चे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात ८५६ साध्य झाले. शंभर टक्के दिलेले उद्दिष्ट साध्य केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात अवघे ९३ शिल्लक स्त्रोतांचे रासायनिक तपासणी नमुने घेऊन १०० टक्के साध्य केले जाणार आहे.हा कार्यक्रम नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे, सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा यत्रंणेतील तांत्रिक दोष, पाणीस्त्रोत देखभाल व दुरूस्तीअभावी पाणी दूषित होते. पाण्याजवळील घाण यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असतो. अशामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. पाणीनमुने तपासणी करून ते पिण्यास योग्य की अयोग्य हे निश्चित केले जाते आणि शुद्ध पाणीपुरवठा केला केला जातो. पं. स. व तालुका आरोग्य विभागाने यासाठी समन्वयाने काम केले जात आहे. जिल्ह्यात ११ हजार २९० चे उद्दिष्ट होते. परंतु, ९ हजार २१९ फोटो अपलोड झाले. अर्धापूर १०० टक्के, उमरी १०० टक्के, तर कंधार ९० .२० टक्के उद्दिष्ट साध्य झाले. गटविकास अधिकारी कैलास बळवंत व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी.ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विस्तार अधिकारी अशोक सोनकांबळे, एस. एम. अली यांच्या सूचनेनुसार पाणी नमुने गोळा केले जात आहेत.तालुक्यातील आलेगाव येथील १३ पाणीनमुने संकलित करण्यात आले. आंबुलगा १५, औराळ ६, बाबूळगाव ६, बाचोटी ९, बहाद्दरपुरा १२, बाळांतवाडी व बामणी प्रत्येकी ४, बारूळ १९, भेंडेवाडी ५, भंडारकुमठ्याची वाडी ७, भोजूची वाडी २, भूकमारी १, भुत्याची वाडी ५, बोळका ८, चिखलभोसी १०, चिखली ७, चिंचोली प.क.१२, दहीकंळबा ९, दाताळा ७, दिग्रस बु़ १४, दिग्रस खु़ १३, गौळ १७, घोडज ७, गोणार ५, गुलाबवाडी ६, गुंडा ८, गुंटूर १०, हाळदा १५, इमामवाडी ६, कळका ८, कल्हाळी ६, काटकंळबा १३, कौठा ४४, कोटबाजार ११, कुरूळा २२, लालवाडी व मादाळी प्रत्येकी ७, मानसपुरी ८, नागलगाव ८, नवघरवाडी ७, उस्माननगर १५, पानभोसी १६ ,पांगरा १४ ,पानशेवडी १०, पेठवडज १९, फुलवळ २४ , राऊतखेडा ८, रूई ९, संगमवाडी ७ , शेकापूर १२ , शेल्लाळी ७, शिराढोण १३, तळ्याचीवाडी १०, तेलूर ८ , उमरज ५, वहाद १२, वाखरड १२, वंजारवाडी ७, येलूर ९ आदीसह सर्व गावचे पाणी नमुने संकलित करण्यात येत आहेत. हे नमुने तपासणीस पाठवून आणि त्यानंतर योग्य की अयोग्य, याचा उलगडा होईल. शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरतो. किती पाणीनमुने अयोग्य आहेत, हे समजण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

  • नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे, सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा यत्रंणेतील तांत्रिक दोष, पाणी स्त्रोत देखभाल व दुरूस्तीअभावी आदीमुळे पाणी दूषित होते. पाण्याजवळील घाण यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असतो. अशामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. पाणीनमुने तपासणी करून ते पिण्यास योग्य की अयोग्य हे निश्चित केले जाते.
  • पिण्यास योग्य की अयोग्य हे निश्चित शुद्ध पाणीपुरवठा केला केला जातो. पं. स. व तालुका आरोग्य विभागाने यासाठी समन्वयाने काम केले जात आहे. जिल्ह्यात ११ हजार २९० चे उद्दिष्ट होते. परंतु, ९ हजार २१९ फोटो अपलोड झाले. अर्धापूर १०० टक्के, उमरी १०० टक्के तर कंधार ९० .२० टक्के उद्दिष्ट साध्य झाले.
  • गटविकास अधिकारी कैलास बळवंत व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी.ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विस्तार अधिकारी अशोक सोनकांबळे, एस.एम.अली यांच्या सूचनेनुसार पाणीनमुने गोळा केले जात आहेत.
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई