शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

कंधार तालुक्यात ८५६ जलस्त्रोतांची अ‍ॅपद्वारे तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:29 IST

मान्सूनपश्चात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे मोबाईल अ‍ॅपद्धारे नमुने संकलित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यात ९४९ पैकी ८५६ पाणीनमुने गोळा झाले असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील सरासरी काम २० जानेवारीपर्यंत ८१.६६ टक्के झाले आहे.

प्रा. डॉ. गंगाधर तोगरे।कंधार : मान्सूनपश्चात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे मोबाईल अ‍ॅपद्धारे नमुने संकलित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यात ९४९ पैकी ८५६ पाणीनमुने गोळा झाले असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील सरासरी काम २० जानेवारीपर्यंत ८१.६६ टक्के झाले आहे. तर कंधार तालुक्याचे काम ९०.२० टक्के झाले आहे. संकलित पाणीनमुने तपासणीअंती पिण्यास योग्य की अयोग्य, याचे वास्तव उलगडणार आहे.राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी दिलेल्या निर्देशानुसार जि. प. ही जिल्ह्याभर मोहीम राबवित आहे. कंधार तालुकास्तरावर ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या योजना व स्त्रोतांची रासायनिक तपासणीसाठी मोबाईल अ‍ॅपद्धारे पाणीनमुने गोळा करण्यात येत आहेत. १० आॅक्टो २०१८ ते २० जानेवारी २०१९ या कालावधीत गावे, वाडी, तांडे आदी भागात जाऊन पाणीनमुने संकलित करण्यात आले. पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रमात तालुक्याचे ९४९ चे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात ८५६ साध्य झाले. शंभर टक्के दिलेले उद्दिष्ट साध्य केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात अवघे ९३ शिल्लक स्त्रोतांचे रासायनिक तपासणी नमुने घेऊन १०० टक्के साध्य केले जाणार आहे.हा कार्यक्रम नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे, सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा यत्रंणेतील तांत्रिक दोष, पाणीस्त्रोत देखभाल व दुरूस्तीअभावी पाणी दूषित होते. पाण्याजवळील घाण यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असतो. अशामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. पाणीनमुने तपासणी करून ते पिण्यास योग्य की अयोग्य हे निश्चित केले जाते आणि शुद्ध पाणीपुरवठा केला केला जातो. पं. स. व तालुका आरोग्य विभागाने यासाठी समन्वयाने काम केले जात आहे. जिल्ह्यात ११ हजार २९० चे उद्दिष्ट होते. परंतु, ९ हजार २१९ फोटो अपलोड झाले. अर्धापूर १०० टक्के, उमरी १०० टक्के, तर कंधार ९० .२० टक्के उद्दिष्ट साध्य झाले. गटविकास अधिकारी कैलास बळवंत व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी.ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विस्तार अधिकारी अशोक सोनकांबळे, एस. एम. अली यांच्या सूचनेनुसार पाणी नमुने गोळा केले जात आहेत.तालुक्यातील आलेगाव येथील १३ पाणीनमुने संकलित करण्यात आले. आंबुलगा १५, औराळ ६, बाबूळगाव ६, बाचोटी ९, बहाद्दरपुरा १२, बाळांतवाडी व बामणी प्रत्येकी ४, बारूळ १९, भेंडेवाडी ५, भंडारकुमठ्याची वाडी ७, भोजूची वाडी २, भूकमारी १, भुत्याची वाडी ५, बोळका ८, चिखलभोसी १०, चिखली ७, चिंचोली प.क.१२, दहीकंळबा ९, दाताळा ७, दिग्रस बु़ १४, दिग्रस खु़ १३, गौळ १७, घोडज ७, गोणार ५, गुलाबवाडी ६, गुंडा ८, गुंटूर १०, हाळदा १५, इमामवाडी ६, कळका ८, कल्हाळी ६, काटकंळबा १३, कौठा ४४, कोटबाजार ११, कुरूळा २२, लालवाडी व मादाळी प्रत्येकी ७, मानसपुरी ८, नागलगाव ८, नवघरवाडी ७, उस्माननगर १५, पानभोसी १६ ,पांगरा १४ ,पानशेवडी १०, पेठवडज १९, फुलवळ २४ , राऊतखेडा ८, रूई ९, संगमवाडी ७ , शेकापूर १२ , शेल्लाळी ७, शिराढोण १३, तळ्याचीवाडी १०, तेलूर ८ , उमरज ५, वहाद १२, वाखरड १२, वंजारवाडी ७, येलूर ९ आदीसह सर्व गावचे पाणी नमुने संकलित करण्यात येत आहेत. हे नमुने तपासणीस पाठवून आणि त्यानंतर योग्य की अयोग्य, याचा उलगडा होईल. शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरतो. किती पाणीनमुने अयोग्य आहेत, हे समजण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

  • नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे, सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा यत्रंणेतील तांत्रिक दोष, पाणी स्त्रोत देखभाल व दुरूस्तीअभावी आदीमुळे पाणी दूषित होते. पाण्याजवळील घाण यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असतो. अशामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. पाणीनमुने तपासणी करून ते पिण्यास योग्य की अयोग्य हे निश्चित केले जाते.
  • पिण्यास योग्य की अयोग्य हे निश्चित शुद्ध पाणीपुरवठा केला केला जातो. पं. स. व तालुका आरोग्य विभागाने यासाठी समन्वयाने काम केले जात आहे. जिल्ह्यात ११ हजार २९० चे उद्दिष्ट होते. परंतु, ९ हजार २१९ फोटो अपलोड झाले. अर्धापूर १०० टक्के, उमरी १०० टक्के तर कंधार ९० .२० टक्के उद्दिष्ट साध्य झाले.
  • गटविकास अधिकारी कैलास बळवंत व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी.ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विस्तार अधिकारी अशोक सोनकांबळे, एस.एम.अली यांच्या सूचनेनुसार पाणीनमुने गोळा केले जात आहेत.
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई