शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

पडीत माळरानावर फळबाग फुलवून घेतले विक्रिमी उत्पन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 11:49 AM

यशकथा : मौजे बाबूळगाव (ता. कंधार, जि. नांदेड) येथील शेतकरी कैलास अर्जुनराव भंगारे यांनी पडीत, उजाड माळरानावर मोठ्या महेनतीने फळबाग फुलवून विक्रमी उत्पन्न घेतले आहे.

- प्रकाश गिते (बहाद्दरपुरा, जि.नांदेड)

मौजे बाबूळगाव (ता. कंधार, जि. नांदेड) येथील शेतकरी कैलास अर्जुनराव भंगारे यांनी पडीत, उजाड माळरानावर मोठ्या महेनतीने फळबाग फुलवून विक्रमी उत्पन्न घेतले आहे. तीन उलभ्यात पपईचे एकूण १३ लाख ५० हजार लाखांचे उत्पन्न मिळविले. सध्या पपई तोडणीस आली आहे. यातून त्यांना अंदाजित ६ लाखांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.

सन २००० मध्ये कैलास भंगारे यांनी पडीत माळरान असलेली ३ एकर जमीन खरेदी केली व ती जेसीबीच्या साहाय्याने उकरून लागवडी योग्य केली. काही दिवस त्यांनी या जमिनीवर पावसाच्या विश्वासावर पारंपरिक शेती कसली. मात्र, निसर्गाचा सतत लहरीपणा व वेळेवर पाऊस न येणे किंवा जास्त बरसणे, यामुळे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती झाली. सन २००९ मध्ये त्यांनी घरासमोर बोअर खोदला. सुदैवाने बोअरला चांगले पाणीही लागले. घरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या माळरानावरील शेतीत पाईपलाईन करून सन २०१३ मध्ये पुणे येथून ‘तायवाण-७८६ या पपईच्या बियाणे खरेदी केले.

६० दिवसांनंतर ६० आर क्षेत्रात ५ बाय ६ या अंतराने ११०० रोपाची लागवड केली. पाण्याचे व लागणारे घटक द्रव्य नियोजनबद्द नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रिप ठिबक सिंचनाने काटेकोरपणे पाण्याचा वापर करून ९ महिन्यांनंतर पपई तोडणीस सुरुवात केली. पहिल्याच तोडणीत त्यांना ५ लाखांचे उत्पन्न मिळाले तर पूर्णपणे तोड्याचे ७.५० लाखांचे उत्पन्न मिळाले. याप्रमाणे सतत तीन वेळेस पपईचे उत्पन्न घेतले. दोन वेळात १३.५० लाखांचे उत्पन्न त्यांना मिळाले, तर खर्च ३ लाख ५० हजार रुपये झाल्याचे भंगारे यांनी सांगितले.  

सध्याचा उलथा हा जानेवारी २०१८ मध्ये केलेल्या लागवडीचा तोड १५ दिवसांत सुरुवात होईल व त्यातून ६ लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. ६० आर क्षेत्रात ११०० झाडे यातून प्रत्येक झाडाला ९० ते १०० फळे आहेत. प्रत्येक फळ आजघडीला १.५० ते २ किलो वजनाचे आहे. पपईला आज किमान १८ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. यानुसार ६ लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे, असा विश्वास भंगारे यांनी व्यक्त केला. तीन वेळेस एकूण १९.५० लाखांचे उत्पन्न, तर खर्च ५ लाख ५० हजार आहे. याचाच अर्थ असा की, त्यांना खर्च वजा जाता सरासरी १४ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.

याकामी कैलास भंगारे यांना त्यांचे थोरले बंधू बाबूराव अर्जुन भंगारे यांचे मोलाचे मार्गदर्शन व मदत असल्याचे आवर्जून सांगितले. कैलास भंगारे यांनी साधारण माळरान जमिनीवर दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून, इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला. सर्वसाधारण शेतजमिनीवर ते लाखो रुपये उत्पन्न मिळवित असतील तर इतरांना ते का जमू नये, असा सवाल आहे. शेती ही फायद्याचीच आहे. फक्त तिच्यासाठी प्रचंड मेहनत करण्याची गरज आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfruitsफळे