शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

माजी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:50 IST

इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्राअंतर्गत असलेल्या पैनगंगेवरील डावा व उजव्या कालव्याची व चा-यांची दुरुस्ती येत्या १५ दिवसात करण्याची मागणी माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी अप्पर पैनगंगा प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली.

ठळक मुद्देइसापूरच्या पाण्याचा प्रश्न माजी मंत्री गावंडे यांनी घेतली अधीक्षकांची भेट

नांदेड : इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्राअंतर्गत असलेल्या पैनगंगेवरील डावा व उजव्या कालव्याची व चा-यांची दुरुस्ती येत्या १५ दिवसात करण्याची मागणी माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी अप्पर पैनगंगा प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली. यावेळी अधिका-यांना धारेवर धरत शेतक-यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावंडे यांनी केला आहे़इसापूरचे पाणी पैनगंगेत सोडण्यासाठी परिसरातील शेतकºयांनी आंदोलन सुरु केले होते़ त्यानंतर पाच दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला़ मंगळवारी या भागातील शेतकºयांचे शिष्टमंडळ माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांच्या नेतृत्त्वात अधिक्षक अभियंत्यांना भेटले. पैनगंगा नदीपात्रात कायमस्वरुपी पाणी सोडण्यासाठी ४० दलघमी पाणी आरक्षीत करावे़ त्यानंतर टप्या-टप्याने ते सोडून नदीचा नैसर्गिक प्रवाह सुरु ठेवावा, डाव्या कालव्याची त्यावरील नहर व पाटचाºयाच्या अस्तरीकरणाचे अपूर्ण काम पूर्ण करुन या कामासाठी त्वरीत २० कोटी रुपयांचा निधी वर्ग करावा, डाव्या कालव्याचे पाण्यावर होणारा सिंचनाचा अनुशेष भरुन काढावा़ कयाधू शाखा कालव्याचे पूनरुज्जीवन करुन हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील नहराचे काम पूर्ण करावे, हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील १२ नळयोजना चालू ठेवण्यासाठी नदीमध्ये नियमित पाण्याचा प्रवाह चालू ठेवावा, कालवा समितीच्या होणाºया बैठका इसापूर धरणावर घ्याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या़इसापूर निर्मितीनंतर पैनगंगेवर १२ लघुपाटबंधारे प्रकल्प तयार करण्यात आले नसल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरत नसल्याचे अधिकारी सांगतात. पाण्याचे योग्य नियोजन करुन पावसाळ्यात वाहून जाणारे पैनगंगा व कयाधूचे पाणी अडवण्यासाठी वेगळा प्रकल्प तयार केल्यास अधिकचे पाणी उपलब्ध होवू शकेल. तशी मागणी आपण राज्य शासनाकडे करणार असल्याचे गावंडे यांनी स्पष्ट केले. यावेळी दत्ता गंगासागर, चक्रधर पाटील, शंकर तालंगकर, तुकाराम माने, अरविंद माने, भागवत देवसरकर, अविनाश खंदारे, विठ्ठल देशमुख आदी उपस्थित होते.चा-यांच्या देखभाल अन् दुरुस्तीकडे दुर्लक्षइसापूर प्रकल्पाअंतर्गत असलेली जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी १७७ चा-या व कॅनाल तयार करण्यात आले. परंतु गत चाळीस वर्षात या चा-या अथवा कॅनालमधून एकदाही पाणी प्रवाहीत झाले नाही. कॅनॉलची उंची व उतार बरोबर नसल्याने धरणाचे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही. देखभाल व दुरुस्तीअभावी चाºयांची दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींनी मागण्या रेटल्या असत्या तर त्या केव्हाच पूर्ण झाल्या असत्या असा आरोप गावंडे यांनी केला.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीwater scarcityपाणी टंचाईDamधरण