शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:50 IST

इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्राअंतर्गत असलेल्या पैनगंगेवरील डावा व उजव्या कालव्याची व चा-यांची दुरुस्ती येत्या १५ दिवसात करण्याची मागणी माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी अप्पर पैनगंगा प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली.

ठळक मुद्देइसापूरच्या पाण्याचा प्रश्न माजी मंत्री गावंडे यांनी घेतली अधीक्षकांची भेट

नांदेड : इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्राअंतर्गत असलेल्या पैनगंगेवरील डावा व उजव्या कालव्याची व चा-यांची दुरुस्ती येत्या १५ दिवसात करण्याची मागणी माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी अप्पर पैनगंगा प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली. यावेळी अधिका-यांना धारेवर धरत शेतक-यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावंडे यांनी केला आहे़इसापूरचे पाणी पैनगंगेत सोडण्यासाठी परिसरातील शेतकºयांनी आंदोलन सुरु केले होते़ त्यानंतर पाच दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला़ मंगळवारी या भागातील शेतकºयांचे शिष्टमंडळ माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांच्या नेतृत्त्वात अधिक्षक अभियंत्यांना भेटले. पैनगंगा नदीपात्रात कायमस्वरुपी पाणी सोडण्यासाठी ४० दलघमी पाणी आरक्षीत करावे़ त्यानंतर टप्या-टप्याने ते सोडून नदीचा नैसर्गिक प्रवाह सुरु ठेवावा, डाव्या कालव्याची त्यावरील नहर व पाटचाºयाच्या अस्तरीकरणाचे अपूर्ण काम पूर्ण करुन या कामासाठी त्वरीत २० कोटी रुपयांचा निधी वर्ग करावा, डाव्या कालव्याचे पाण्यावर होणारा सिंचनाचा अनुशेष भरुन काढावा़ कयाधू शाखा कालव्याचे पूनरुज्जीवन करुन हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील नहराचे काम पूर्ण करावे, हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील १२ नळयोजना चालू ठेवण्यासाठी नदीमध्ये नियमित पाण्याचा प्रवाह चालू ठेवावा, कालवा समितीच्या होणाºया बैठका इसापूर धरणावर घ्याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या़इसापूर निर्मितीनंतर पैनगंगेवर १२ लघुपाटबंधारे प्रकल्प तयार करण्यात आले नसल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरत नसल्याचे अधिकारी सांगतात. पाण्याचे योग्य नियोजन करुन पावसाळ्यात वाहून जाणारे पैनगंगा व कयाधूचे पाणी अडवण्यासाठी वेगळा प्रकल्प तयार केल्यास अधिकचे पाणी उपलब्ध होवू शकेल. तशी मागणी आपण राज्य शासनाकडे करणार असल्याचे गावंडे यांनी स्पष्ट केले. यावेळी दत्ता गंगासागर, चक्रधर पाटील, शंकर तालंगकर, तुकाराम माने, अरविंद माने, भागवत देवसरकर, अविनाश खंदारे, विठ्ठल देशमुख आदी उपस्थित होते.चा-यांच्या देखभाल अन् दुरुस्तीकडे दुर्लक्षइसापूर प्रकल्पाअंतर्गत असलेली जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी १७७ चा-या व कॅनाल तयार करण्यात आले. परंतु गत चाळीस वर्षात या चा-या अथवा कॅनालमधून एकदाही पाणी प्रवाहीत झाले नाही. कॅनॉलची उंची व उतार बरोबर नसल्याने धरणाचे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही. देखभाल व दुरुस्तीअभावी चाºयांची दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींनी मागण्या रेटल्या असत्या तर त्या केव्हाच पूर्ण झाल्या असत्या असा आरोप गावंडे यांनी केला.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीwater scarcityपाणी टंचाईDamधरण