शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

दुष्काळी अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 12:24 AM

जिल्ह्यातील देगलूर, मुखेड आणि उमरी या तीन दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी शासनाने दुष्काळी अनुदान दिले असून या अनुदानासाठी ८६ कोटी ९१ लाख ७ हजार २९६ रुपयांचा निधी बँक खात्यात जमा केला आहे.

ठळक मुद्देतीन दुष्काळी तालुके ८६ कोटी ९१ लाखांचा निधी बँक खात्यात जमा

अनुराग पोवळे।नांदेड : जिल्ह्यातील देगलूर, मुखेड आणि उमरी या तीन दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी शासनाने दुष्काळी अनुदान दिले असून या अनुदानासाठी ८६ कोटी ९१ लाख ७ हजार २९६ रुपयांचा निधी बँक खात्यात जमा केला आहे. हे दुष्काळी अनुदान आता कधी वाटप होईल, याकडे शेतक-यांचे लक्ष लागले असून खरीप पेरणीपूर्वी हे अनुदान वाटप करण्यासाठी बँकांनी नियोजन करण्याच्या सूचना खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिल्या आहेत.जिल्ह्यात २०१८ मध्ये देगलूर, मुखेड आणि उमरी या तीन तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्यात आला होता. या दुष्काळामध्ये देगलूर तालुक्यातील १०८ गावांमधील ५७ हजार ७३७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. मुखेड तालुक्यात १३५ गावांत ७७ हजार ८६४ आणि उमरी तालुक्यात ६३ गावामध्ये ३४ हजार ९९१ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके बाधित झाली होती. या तीन तालुक्यांत १ लाख ७० हजार ५९२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. याचा फटका तीन तालुक्यांतील १ लाख ५५ हजार ७४१ शेतकºयांना बसला होता. त्यात मुखेड तालुक्यातील सर्वाधिक ७१ हजार १७६ शेतकºयांचा समावेश आहे. देगलूर तालुक्यातील ५४ हजार २३७ आणि उमरी तालुक्यातील ३० हजार ३२८ शेतकरी दुष्काळामुळे होरपळले होते.या दुष्काळी तालुक्यातील बाधित शेतक-यांना मदतीचे वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला. हे अनुदान वाटप करताना शेती पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक शेती पिकाच्या नुकसानीबाबत ६ हजार ८०० रुपये प्रतिहेक्टर किंवा किमान १ हजार रुपये यापैकी अधिक असेल ती रक्कम तसेच बहुवार्षिक पिकाच्या ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसानीबाबत १८ हजार रुपये प्रतिहेक्टर किंवा किमान २ हजार रुपये यापैकी अधिक असेल ती रक्कम शेतक-यांना वितरीत केली जाणार आहे. हे अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत असलेल्या शेतकºयांना दिले जाणार आहे.देगलूर तालुक्यातील ५४ हजार २३७ शेतक-यांसाठी ३० कोटी ४ लाख ५२ हजार रुपये अनुदान शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केले आहे. मुखेड तालुक्यातील ७१ हजार १७६ शेतक-यांसाठी ४० कोटी ६४ लाख १६ हजार आणि उमरी तालुक्यातील २० हजार ३२८ शेतक-यांसाठी १६ कोटी २३ लाख रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. हा निधी शेतक-यांच्या खात्यातही जमा करण्यात आला आहे.दुष्काळी अनुदान उचलण्यासाठी शेतक-यांची उमरी, देगलूर आणि मुखेड तालुक्यांतील जिल्हा बँकेच्या शाखामधून गर्दी होत आहे. खात्यात अनुदान जमा झाले असले तरी ते उचलण्यासाठी जिल्हा बँकेच्या दुष्काळी तालुक्यांतील शाखामध्ये उपलब्ध मनुष्यबळ लक्षात घेता शेतक-यांची गर्दी होत आहे. मुखेडचे आ. तुषार राठोड यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी जिल्हा बँकेद्वारे वेळेत अनुदान वाटप करण्याच्या सूचना खा. चिखलीकर यांनी केली़

जून अखेरपर्यंत अनुदान वाटप होणारच्शासनाने दुष्काळी अनुदानापोटी ८२ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. हा निधी दुष्काळी तालुक्यातील शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. आतापर्यत २६ कोटी रुपये शेतक-यांनी उचलले आहेत. उर्वरित रक्कमही पेरणीपूर्वी शेतक-यांना उचलता यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जून अखेरपर्यंत सर्व रक्कम वितरित होईल-अजय कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा मध्यवर्ती बँक

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीdroughtदुष्काळ