शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
3
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
4
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
5
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
6
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
8
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
9
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
10
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
11
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
12
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
13
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
14
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
15
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
16
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
17
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
18
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
19
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
20
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!

कारखान्याचे बॉयलर पेटले; वाड्या, तांडे पडताहेत ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 18:47 IST

उसाचे उत्पादन चांगले असल्यामुळे ऊसतोड कामगारांसह मजुरांनाही यंदा कारखान्यांवर काम मिळणार आहे. 

ठळक मुद्देकुटुंबियांकडून निरोप, मजूर कारखान्याकडे रवाना

बारूळ : जिल्ह्यासह परजिल्ह्यांमधील कारखान्यांचे बॉयलर पेटल्याने तालुक्यातील बारूळ परिसरातील मजुरांना ऊसतोडीचे वेध लागले आहेत. वाडी, तांड्यांवरील कामगार ऊसतोडीला निघाल्याने वस्त्या, वाडी, तांडे, गावे आता ओस पडू लागली आहेत. दरम्यान, या कामगारांना निरोप देताना कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत.

गेल्यावर्षी परतीच्या दमदार पाऊस झाल्याने उसाच्या क्षेत्रात वाढ झाली होती. दरम्यान, यंदा कोरोनाच्या संकटामुळे मजुरांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे मजूर आर्थिक अडचणीत सापडले होते, तर यंदा अति पावसामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, टाकलेला खर्चही घरात न आल्यामुळे बळीराजा हताश झाला आहे. मात्र, उसाचे उत्पादन चांगले असल्यामुळे ऊसतोड कामगारांसह मजुरांनाही यंदा कारखान्यांवर काम मिळणार आहे. 

तालुक्यात साखर कारखाना नसल्यामुळे बारूळ, बाचोटी, हळदा, धर्मापुरी, चिंचोली, तेलूर, राहाटी, दहिकळंबा, मंगल सांगवी, औराळा, चिखली, काटकळंबा, पेठवडज, परिसरातील मसलगा नारनाळी, येलूर, वरवट  वाडी, तांडे यासह अन्य गावांतील ऊसतोड मजुरांना दरवर्षी  जिल्ह्यातील  कुंटूर कारखाना,  बाऱ्हाळी  कारखाना,  वागलवाडा कारखाना, शिवडी कारखाना यासह परजिल्ह्यांतील  लातूर, अंबाजोगाई, परभणी  येथील  कारखान्यांमध्ये ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांच्या गळीत हंगामास प्रारंभ झाला असल्याने  बारूळ परिसरासह अनेक गावांतील वाडीत तांड्यावरील ऊस कामगार ऊसतोडणीसाठी रवाना होत आहेत. तालुक्यातील  मजूर परजिल्ह्यांतील ऊसतोडणीसाठी जात आहेत. दररोज ५ ते १० ट्रक,  ट्रॅक्टरमधून  जाताना दिसत आहेत.  

कुटुंबियांकडून निरोप, मजूर कारखान्याकडे रवानावर्षभरातील पाच ते सहा महिने ऊसतोडणीतून मजुरी मिळते. उर्वरित कालावधीत हाताला मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. ऊसतोडणीसाठी न गेल्यास संसाराचा गाडा हाकायचा कसा, हा प्रश्‍न उपस्थित राहत असल्याचे हळदा येथील ऊसतोड मजुरांनी सांगितले. वर्षभरातील जवळपास पाच महिने गावी राहत नसल्याचेही ते म्हणाले.  ऊसतोड कामगारांच्या प्रत्येक घरातील मोठ्या व्यक्तींना हे काम करावे लागते. त्यामुळे लेकरांना सोडायचे कुठे, हा प्रश्न निर्माण होत असतो.  संपूर्ण कुटुंब सोबत घेऊन उसाच्या फडात दाखल होत आहे. लेकरांचे शिक्षण कोरोनामुळे झालेच नाही. पुढेही काय परिस्थिती निर्माण होईल हे निश्चित ठरवता येत नसल्यामुळे सोबत लेकरांना घेऊन आलो, असे अनेक मजुरांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीSugar factoryसाखर कारखाने