शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

बोंडअळीमुळे कंधार तालुक्यात १७ हजार हेक्टरवरील पांढरे सोने झाले बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 18:14 IST

६ महसूल मंडळांतर्गत १७ हजार २२५ हेक्टरवर पांढरे सोने लागवड करून सोनेरी स्वप्न बाळगणा-या शेतक-यांना बोंडअळीने आर्थिक दणका दिला़ नुकसान भरपाई मिळावी यासाठी कापूस बियाणे बिल अन् पिशवीची शोधाशोध करताना हजारो शेतक-यांची मोठी दमछाक सुरू झाली आहे़ 

कंधार (नांदेड ) : तालुक्यात ६ महसूल मंडळांतर्गत १७ हजार २२५ हेक्टरवर पांढरे सोने लागवड करून सोनेरी स्वप्न बाळगणा-या शेतक-यांना बोंडअळीने आर्थिक दणका दिला़ नुकसान भरपाई मिळावी यासाठी कापूस बियाणे बिल अन् पिशवीची शोधाशोध करताना हजारो शेतक-यांची मोठी दमछाक सुरू झाली आहे़ 

कंधार, कुरुळा, फुलवळ, बारूळ, पेठवडज, उस्माननगर या ६ महसूल मंडळात शेतक-यांनी ६६ हजार १०२ हेक्टरवर खरीप पेरणी केली़ त्यात कापूस, सेयाबीनची लागवड सर्वात जास्त होती़ त्यात १२ हजार ५७ शेतकºयांनी १७ हजार २२५ हेक्टरवर कापसाची लागवड केली़ सुरुवातीला अत्यल्प पर्जन्यामुळे वाढीवर परिणाम झाला़ आणि आता वेचणीचा हंगाम सुरू झाल्यावर बोंडअळीची लागण झाली़ कोरडवाहू शेती व बागायती शेतीतील कापूस उतारा प्रचंड घटला़ शेतकरी हवालदिल झाला़ बोंड अळीने फुले, बोंडे, पाते नाहीसे केले़ थोडासा कापूस वेचणीसाठी मजुरांची मनधरणी करावी लागली़ परंतु या अळीचा प्रादुर्भाव मजुराच्या शरीरावर खाजेद्वारे होण्याची भीती असल्याने ते ही  धास्तीने ग्रासले आहेत़ त्यामुळे  वेचणीचा भाव वधारला आहे़ पण खर्च आणि उतारा याचा ताळमेळ बसत नाही़ आणि शेतक-यांनी अनेक गावांत कापसात जनावरे सोडली़ अखेर शेतक-यांनी नुकसान भरपाईसाठीची मागणी केली़

कापूस अधिनियमातील तरतुदीनुसार तक्रारीचा सूर वाढला़ तक्रार अर्जासोबत कापूस बियाणाचे बिल, पिशवी, सातबारा आदी देणे भाग आहे़ अर्जानंतर मंडळ कृषि अधिकारी तथा बील निरीक्षक पाहणी करत आहेत़ एच फॉर्ममध्ये सर्व माहिती भरत आहेत़ आय फॉर्ममध्ये जिल्हास्तरीय समिती गावोगाव भैट देवून रँडम पद्धतीने हे काम चालू आहे़ त्यात कापूस संशोधन केंद्र, नांदेडचे डॉ़ढोक, तालुका कृषी अधिकारी संजय गायकवाड व मंडळ कृषि अधिकारी गावोगाव जाऊन अहवाल तयार करत आहेत.  १२६ महसुली गावे, वाडी तांड्यावरील शेतक-यांपैेकी १०६ गावातील अर्ज प्राप्त झाले आहेत़ त्यानुसार बारूळ, कौठा, उस्माननगर, लाठ खु़, पेठवडज, गोणार, आंबुलगा, हरबळ, घोडज, शेकापूर, गंगनबीड, नागलगाव, कुरुळा आदी गावातील आय फॉर्म भरणे चालू आहेख़रीप हंगामातील पेरणीसाठी बियाणे खरेदी बील, पिशवी कुठे ठेवले? याची शोधाशोध शेतकरी करत आहेत़ अनेकांना हे सापडत नाहीत़ त्यामुळे अडचणीत मोठी भर पडत आहे़ त्यामुळे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, असा सूर शेतक-यांत उमटत आहे.

बाधित कापूस क्षेत्राची पाहणी सुरूबोंडअळी बाधित कापूस क्षेत्राची पाहणी केली जात आहे़ प्राप्त अहवाल तयार करून शासनाकडे पाठवला जाईल़ बोंड अळी नियंत्रणासाठी डिसेंबर अखेर नांगरटी खोल करून घ्यावे़ त्यामुळे अळीचे अवशेष नष्ट होतील़ आणि पुढील वर्षी अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल़ शेतक-यांनी असे केल्यास अळीला पायबंद बसेल - संजय गायकवाड, तालुका कृषी अधिकारी, कंधाऱ 

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीNandedनांदेड