शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
2
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
3
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
4
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
5
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
6
4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
7
सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या
8
नताशाशी घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याचा माहिकासोबत साखरपुडा? अभिनेत्रीच्या हातात दिसली अंगठी
9
देवदिवाळी २०२५: कशी साजरी करतात देवदिवाळी? काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा? वाचा 
10
वैभव सूर्यवंशीचा सुपरहिट धमाका! गोलंदाजांची धुलाई करत बनला 'नंबर १'; भारतही सेमीफायनलमध्ये
11
"तू ओवर ॲक्टिंग करतोय"; शिक्षिकेने वर्गात केला अपमान; सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रोसमोर घेतली उडी
12
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
13
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
14
India Israel Trade: महाराष्ट्राचे 'हे' प्रश्न इस्रायल दौऱ्यात मार्गी लागणार का? पीयूष गोयल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष!
15
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
16
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
17
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
18
२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
19
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
20
देव दिवाळी २०२५: ९ राशींना शुभ-लाभ, मनासारखे यश; ठरलेली कामे होतील, पैसा मिळेल, पण मोह टाळा!
Daily Top 2Weekly Top 5

Drought In Marathwada : रिठा येथील शेतकरी कुटुंबांची पोटासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 20:08 IST

चार वर्षांपासून दुष्काळाचे ग्रहण रिठा, रिठातांड्यांच्या मागे लागले आहे.

ठळक मुद्देपहिल्या वेचणीतच कपाशीचा झाडा

- गोकुळ भवरे, रिठा, जि. नांदेडडोंगराळ, अतिदुर्गम, आदिवासीबहुल असलेल्या किनवट तालुक्याचा भाग. या गावतांड्यावरील शेतकरी कोरडवाहू शेती कसतात. त्यामुळे सगळी मदार पावसावरच. पण यंदा केवळ सहाशे मि.मी.च पाऊस झाला. म्हणजेच एकूण सरासरीच्या ४८ टक्के. या पावसावर तगलेल्या कपाशीचा पहिल्या वेचणीत झाडा झाला. खरिपातील इतर पिकांचीही हीच कथा. चार वर्षांपासून दुष्काळाचे ग्रहण रिठा, रिठातांड्यांच्या मागे लागले आहे. त्यामुळे आता इथल्या माणसांच्या हाताला कामच राहिलेले नाही. या गावतांड्यावरील दीडशे कुटुंबांनी पोटासाठी घरदार सोडून स्थलांतर केले आहे.

किनवट या डोंगराळ तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी १ हजार २४० मिमी असताना किनवट तालुक्यात सप्टेंबर अखेर  केवळ ८२१ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यातही पावसाच्या पडण्यात मोठा खंड होता. परिणामी खरीप हंगामावर  मोठा परिणाम झाला. शेतकऱ्यांच्या हाती काहीच  लागले नाही. इस्लापूर मंडळात पावसाची नोंद  केवळ सहाशे मिमी इतकीच आहे. 

कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरात कापूस या नगदी पिकाचे उत्पादन आलेच नाही. कापसाची बॅग  पेरणी व  इतर  खर्च मिळून १५ हजार  रुपये केला. एका बॅगेला क्विंटल सोडाच पंधरा किलोचा उतारा आल्याने शेतकरी कर्जबाजारीच झाले आहे. पेरणीनंतर पावसाने उघडीप दिली. कसेबसे बियाणे उगवले. फूल, घाटे लागण्याच्या अवस्थेत असताना पुन्हा पावसाने दडी मारुन संपूर्ण खरीप हंगाम शतकऱ्यांच्या हातून गेला. भूगर्भातही पाणी नाही. त्यामुळे ज्वारीही हाती लागली नाही. त्यामुळे कडबा नाही.

जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. हाताला काम नसल्याने मजुरांची कुटुंबे  कामाच्या शोधात गाव सोडून स्थलांतरित झाले आहेत. गतवर्षी बोंडअळीने  गिळले. यावर्षी निसर्गाच्या प्रकोपाने शेतकरी संकटात सापडले आहे. शासनाच्या उदासीन धोरणांमुळे येथील शेतकरी देशोधडीला  लागला आहे. 

बळीराजा काय म्हणतो?

- माझ्याकडे तीन एकर शेती आहे. कापूस या वाणाची पावली लागवड केली. पाच बॅग लावल्या. दीड क्विंटलचा उतारा आला. हार्टफेल होऊन मरण्याची वेळ यावी अशीच परिस्थिती आहे. एकना एक दिवस जायचे आहे. पण निसर्गाच्या संकटाने बेकार कोंडीत सापडलो आहे. -मोहन पुरा राठोड, रिठातांडा

- कापसाची वाढ कमी झाली. बोंड आले नाही. पहिला पाऊस पडला. नंतर पावसाने उघाड दिली. दहा एकर कापूस असतानाही बॅगला वीस किलो उतारा आला नाही. आता कापसाला दोन बोंड लागले, पण फुटून कापूस पदरात येणार नाही. -वसंत उत्तम जाधव, शेतकरी

- मला साडेसात एकर शेतजमीन आहे. निसर्गाने यावर्षी दगा दिला. परिणामी कापसाला चिकट, पांढरा धागा आहे. पाणी देऊनही पाने गळून उलंगवाडी झाली. बोंड लागणे दूरच. केलेल्या खर्चाचा हिशोब पाहता जीव जायचीच वेळ आली आहे. -माधव विठ्ठल कांबळे, शेतकरी

- माझ्याकडे सोळा ते १७ एकर शेत आहे. कपाशी लावली. पहिल्यावेळेस १८ बॅग लावल्या. पण, बियाणे उगवलेच नाही.दुबार पेरणीवेळी दहा बॅग लागल्या.  जूननंतर पावसाने दगा दिला. चार क्विंटल कापूस घरात आला. आता काय करावे? खूप वाईट परिस्थिती आहे. जगणे कठीण झाले आहे, तर तिकडे शेतकऱ्याच्या बाबतीत उदासीन असलेले  राज्य व केंद्र शासन राजकारण करते आहे. -दत्ता गांगू जाधव

- एका बॅगला दहा किलोचा उतारा निघाला. असे असेल तर कपडेलत्ते, दाळदाणे, कुटुंबाचा गाडा, उसनवारी फेडावी कशी? असा प्रश्न सतावू लागला आहे.- खिरु चव्हाण, शेतकरी

काही आकडेवारी : - १४० - मागील ५ वर्षांची शेतकरी आत्महत्या - १८१९ - गावाची लोकसंख्या - ६०० मिमी पाऊस- खातेदार शेतकरी ५० हजार- भौगोलिक क्षेत्रफळ-१ लाख ५१ हजार हेक्टर- गावे १९१, वाडीतांडे १०५- खरीप हंगाम क्षेत्र-८२ हजार ३६० हेक्टर- पेरणी झालेले -८० हजार ८५२ हेक्टर- कापूस-५० हजार ७०७ हेक्टर, सोयाबीन -१६,३९९ हेक्टर, तूर-६ हजार ३३२ हेक्टर, ज्वारी- २ हजार ११२ हेक्टर, मूग-१ हजार १४३ हेक्टर, उडीद १ हजार ४५ हेक्टर

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीRainपाऊसFarmerशेतकरी