शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:04 IST

जिल्ह्यातील विविध कारखान्यांसह ५६ संस्थांकडे जिल्हा बँकेचे तब्बल १९२ कोटी अनुत्पादित कर्ज थकित आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँक आक्रमक झाली असून गोदावरी मानार साखर कारखाना विक्री करण्यासाठी नव्याने निविदा काढण्याचे तर कलंबर सहकारी साखर कारखाना विक्रीच्या स्थगितीबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील विविध कारखान्यांसह ५६ संस्थांकडे जिल्हा बँकेचे तब्बल १९२ कोटी अनुत्पादित कर्ज थकित आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँक आक्रमक झाली असून गोदावरी मानार साखर कारखाना विक्री करण्यासाठी नव्याने निविदा काढण्याचे तर कलंबर सहकारी साखर कारखाना विक्रीच्या स्थगितीबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.ग्रामीण भागाची आर्थिक घडी ही जिल्हा बँकेवर अवलंबून असते. नांदेड जिल्हा बँकेचा ६८ शाखांच्या माध्यमातून कारभार सुरु आहे. मात्र थकित कर्जामुळे बँकेवर मर्यादा आल्या आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यातील ठेवीदारांचा विश्वास पुन्हा संपादित करण्यासाठी तसेच बँकेला गतवैैभव मिळवून देण्यासाठी थकित कर्जाची वसुली करणे आवश्यक आहे. शुक्रवारी नवनिर्वाचित अध्यक्ष दिनकर दहीफळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रामुख्याने याच विषयावर चर्चा झाली. बँकेचे थकित कर्ज १९२ कोटी आहे तर संचित तोटा १३४ कोटी रुपये आहे. अनुत्पादित थकित कर्जाची वसुली केल्यानंतरच हा संचित तोटा कमी होऊ शकतो. २००५ पूर्वी हा संचित तोटा ३६२ कोटींच्या घरात होता. मात्र तो आता १३४ कोटींवर आला आहे. थकित कर्ज वसुलीला गती देवून तो आणखी कमी केल्यास जिल्हा बँक पुन्हा रुळावर येऊ शकते. यामुळे गोदावरी मानार साखर कारखाना विक्री करण्यासाठी नव्याने निविदा काढण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत प्राधान्याने घेण्यात आला. कलंबर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेला मंत्रालयस्तरावरुन स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात दाद मागण्याचा निर्णयही घेण्यात आला. जिल्हा बँकेच्या थकबाकीसंदर्भातील अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. ही प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी बँकेच्या वकिलांची स्वतंत्र बैठक घेण्याचेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.बैठकीस उपाध्यक्ष डॉ. सुनील कदम, संचालक भास्करराव पाटील खतगावकर, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, गोविंदराव पाटील नागेलीकर, मोहनराव पाटील टाकळीकर यांच्यासह १३ संचालकांची उपस्थिती होती.नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६८ शाखा आहेत. यातील काही शाखा मागील अनेक वर्षांपासून तोट्यात आहेत. या शाखांना ठेवी वाढविण्यासह कर्जाची वसुली करुन आर्थिक पत वाढवावी, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र दिलेल्या मुदतीत या शाखांनी ना ठेवी वाढविल्या ना थकित कर्जाची अपेक्षित वसुली केली. त्यामुळे तोट्यात असलेल्या अशा शाखा पोसायच्या कशाला ? असा प्रश्नही या बैठकीत उपस्थित झाला. यावर तोट्यात असलेल्या ७ शाखा बंद करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.