शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

५०० प्रमाणपत्र वाटप अडगळीला

By admin | Updated: August 6, 2014 02:16 IST

कंधार : महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

कंधार : महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. जात प्रमाणपत्रासह इतर प्रमाणपत्र काढण्यासाठीची प्रक्रिया ऐन भरात आली आहे. परंतु संपामुळे जवळपास ५०० संचिका अडगळीला पडल्याची बाब समोर आली आहे. यात सर्वाधिक फटका मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बसल्याचे धक्कादायक चित्र आहे.महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्रवेश, शिष्यवृत्तीसाठी जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो. व्यावसायिक उच्च शिक्षणासाठी अशाच प्रमाणपत्राची आवश्यकता लागते. शासकीय व निमशासकीय सेवेत नोकरीसाठी जातवैधता, रहिवासी पुरावा महत्वपूर्ण मानला जातो. त्यासाठी पालक-विद्यार्थ्यांची आवश्यक प्रमाणपत्रासाठी भक्कम पुरावे जमा करण्यासाठी मोठी घाई चालू आहे. त्यातच मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळे पुरावे जमा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. त्यातच ‘क’ पत्रक उपलब्ध नसलेली उमरज, शेकापूर, फुलवळ, पेठवडज, पानभोसी, शिराढोण, पानशेवटी, कल्हाळी ८ गावे समोर आली. ‘क’ पत्रक, खासरा ही महसुली पुरावे असल्यास इतर पुरावे त्याला बळकटी देतात. ‘क’ पत्रक नसल्यामुळे निर्गम उताऱ्यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. जि.प. शाळात पालकांची वर्दळ सुरू झाली. आवश्यक पुरावे जमा करुन पालक-विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र संचिका सादर केल्या. मराठा समाजाच्या जवळपास ४०० पेक्षा जास्त संचिका दाखल करण्यात आल्या आहेत. इतर प्रवर्गातील पालक- विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी, मिळकतीचे प्रमाणपत्र आदी संचिका दाखल झाल्या आहेत. परंतु गत चार दिवसापासून महसूल कर्मचारी संघटनेचे डी.पी. झगडे, एस.बी. गिते आदीच्या नेतृत्वाखाली कर्मचारी संपावर गेल्याने प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सादर केलेल्या संचिका आता अडगळीला पडल्या. नवीन संचिकाचा ओघ मोठा आहे. परंतु संपामुळे त्या संचिकाचा प्रवास सुद्धा अर्धवट झाला. सेतू सुविधाावरुन संचिका आता हलत नाहीत. त्यामुळे अनेकजण खेटे घालत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. राज्य शासनाने मराठा मुस्लिम समाजाला आरक्षणाचा निर्णय घेतला. आता प्रमाणपत्रासाठी संपाचा मोठा अडसर ठरत आहे. शासनाने तत्काळ संप मिटवावा आणि गैरसोय दूर करण्याची मागणी जनतेतून होत आहे. (वार्ताहर)