शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

नुकसानग्रस्त पिकांचे कृषी विभागाकडून पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:38 AM

नांदेड तालुक्यातील नांदुसा येथे उष्ण हवामानामुळे तीन एकर केळी पीक करपून जाऊन शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये १६ मे रोजी प्रकाशित होताच नांदेड कृषी विभागाने तातडीने केळी पिकांची पाहणी केली व शेतक-याला नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे अहवाल सादर केला.

ठळक मुद्देकेळीची बाग करपली नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे केला अहवाल सादर

मालेगाव : नांदेड तालुक्यातील नांदुसा येथे उष्ण हवामानामुळे तीन एकर केळी पीक करपून जाऊन शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये १६ मे रोजी प्रकाशित होताच नांदेड कृषी विभागाने तातडीने केळी पिकांची पाहणी केली व शेतक-याला नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे अहवाल सादर केला.शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. नांदेड जिल्ह्यात काही दिवसांपासून उष्णतेने उच्चांकी गाठली आहे. या उष्णतेचा परिणाम आता शेती पिकांवर होऊन शेतक-यावर नवे संकट उभे राहिले आहे. नांदुसा येथील शेतकरी गणेश तुकाराम जनकवाडे व मारोती तुकाराम जनकवाडे यांनी तीन एकर शेतीमध्ये केळीची लागवड केली आहे. त्यांच्या शेतात केळी उत्पादनास मुबलक पाणी उपलब्ध आहे. परंतु उष्णतेमुळे तीन एकरमधील केळी करपून गेली आहे. शिवाय पाने फाटल्यामुळे केळीच्या घडांची वाढ खुंटून ते गळून पडत आहेत. सध्या बाजारात केळी पिकांना मोठी मागणी असून ऐन हंगामाच्या काळात जनकवाडे यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याकडे कृषी विभागाच्या अधिका-यांनी दुर्लक्ष केले होते.या बाबतच्या नुकसानीचे वृत्त १६ मे रोजी प्रकाशित झाल्यानंतर कृषी विभागाला जाग आली. त्याच दिवशी नांदेड कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक अश्विनी वासालकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसान झालेल्या केळी पिकांची पाहणी केली व नुकसानीचा अहवाल पीक विमा कंपनीकडे पाठविला आहे.पिकांची पाहणी गरजेचीजिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे अनेक तालुक्यातील केळी, संत्रा, मोंसबी, डाळींबाच्या बागा सुकल्या आहेत़ अनेक वर्षांपासून जगविलेली झाडे अचानक करपत असल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे़ त्यामुळे सर्वच ठिकाणी पाहणी करण्याची गरज आहे़

नांदेड तालुक्यातील नांदुसा येथे प्रखर उष्णतेमुळे केळीचे नुकसान झाले. उष्ण हवामानामुळे पाने फाटून केळीची वाढ होत नाही. यामुळे केळीचे घडही गळून पडत आहेत. नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे अहवाल सादर केला आहे -अश्विनी वासालकर, कृषी सहायक, नांदेड

टॅग्स :NandedनांदेडTemperatureतापमानdroughtदुष्काळFarmerशेतकरी