शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकट ; मराठवाड्यातील उद्योगांची कामगारांअभावी कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 13:02 IST

केवळ १५ हजार कामगार, कर्मचारी  उपलब्ध झाल्याने उद्योजकांची मोठी कोंडी झाली आहे.

ठळक मुद्दे२६१६ कंपन्यांना परवानगी ९४ हजार कर्मचाऱ्यांची गरज, उपलब्ध १५ हजार

- विशाल सोनटक्केनांदेड : कोरोनाच्या संकटामुळे ठप्प झालेले उद्योग पुन्हा रुळावर आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. मात्र, कच्चा मालाची आवक आणि उत्पादित मालाच्या विक्रीचा प्रश्न असतांनाच आता कर्मचारी, कामगारांचाही तुटवडा जाणवू लागला आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत ४ हजार ३८४ कारखानदार पुन्हा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत. यातील २६१६ कारखान्यांना सुरु करण्यासाठी परवानगीही देण्यात आली आहे. हे कारखाने सुरु करण्यासाठी ९४ हजार ५१८ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, केवळ १५ हजार कामगार, कर्मचारी  उपलब्ध झाल्याने उद्योजकांची मोठी कोंडी झाली आहे.

कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यातील उद्योगांच्या विकासासाठी जानेवारी महिन्यातच शासनाने नांदेडसह शेंद्रा, जालना आणि उस्मानाबाद येथे नविन औद्योगिक वसाहती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत १६ नवे उद्योग आणण्यासाठीच्या हालचाली सुरु असतांनाच कोरोनाचे संकट उभे राहिल्याने आहे त्या उद्योगांनाही बे्रक बसला. तिसरा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शासनाने कोरोनामुळे ठप्प झालेल्या उद्योगाचे चाक पुन्हा फिरावे यासाठी अत्यावश्यक सेवेतील उद्योगांना परवानगी दिली. मात्र, उद्योजकांसमोरच्या अडचणी  थांबलेल्या नाहीत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे माल वाहतुकीवर मर्यादा आल्याने बाहेरुन येणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. दुसरीकडे परप्रांतियांसह स्थानिक कामगार, कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या भीतीने शहरे सोडून मोठ्या संख्येने आपले गाव गाठलेले आहे. त्यामुळेच  उद्योग सुरु करण्याची परवानगी मिळाल्यानंतरही प्रत्यक्षात उद्योग सुरु करण्यास अडचणी येत आहेत. सद्यस्थितीत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३ हजार ४९१ औद्योगिक संस्था पुन्हा आपले युनिट सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठी या संस्थांनी ४ हजार ३८४ अर्ज उद्योग विभागाकडे दाखल केलेले आहेत. यातील २ हजार ६१६ संस्थांना उद्योग सुरु करण्यासाठी परवानगीही देण्यात आलेली आहे. या संस्था पुर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी ९४ हजार ५१८ कामगार, कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ १५ हजार कर्मचारीच उपलब्ध झाल्याने मराठवाड्यातील उद्योजकांना कारखाने सुरु करण्यास अडचणी येत आहेत.

1730 गाड्यांची उद्योगांना आवश्यकता08 जिल्ह्यांत २६१६ कारखान्यांना उद्योग सुरु करण्यासाठी उद्योग विभागाच्या वतीने परवाना देण्यात आला आहे. या कारखान्यांकडून मालवाहतूक तसेच इतर कारणांसाठी १७३० गाड्यांची आवश्यकता असून, या गाड्यांसाठी उद्योजकांकडून पासेसची मागणी करण्यात आली होती. 

1147  गाड्यांना पास वितरित करण्यात आले आहेत.1119 पास हे एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात वितरीत करण्यात आले असून, बीड-१ , जालना -३, लातूर -९, नांदेड-६, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ९ पास देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून जास्तीत जास्त उद्योग सुरु व्हावेत यासाठी  प्रयत्न सुरु आहेत. याच हेतूने अत्यावश्यक सेवेतील उद्योगांना परवानगी देण्यात येत आहे; परंतु संसर्ग वाढण्याच्या भीतीने कामगार कामावर येण्यास धजावत नसल्याने अनेक कारखान्यांकडे आवश्यकतेएवढे कामगार, कर्मचारी उपलब्ध नाहीत. कच्चा माल, आणि मालवाहतूकीचाही प्रश्न आहे.    - व्यंकट मुद्दे, कार्यकारी अभियंता, औद्योगिक विकास महामंडळ, नांदेड

मराठवाड्यातील उद्योगांची  अशी आहे स्थिती

जिल्हा     प्राप्त अर्ज     परवानगी       कर्मचाऱ्यांची     उपलब्ध                    मिळालेले      आवश्यकता     कर्मचारीऔरंगाबाद       ३८१३    २२१२          ८४७०७           १०५८६बीड               १७९      १३२            १९२७             १८७७हिंगोली          १२        ०८              ८९                 ५५जालना           ६९        ०७              ३९३४             ७१लातूर             १३९      १२५            १२२५             १०४४नांदेड             ६१        ५४              १११७             ६१७उस्मानाबाद     ७४        ५५              ११०१             ५८२परभणी          ३७        २३              ४१८               १७४एकूण            ४३८४    २६१६          ९४५१८           १५००६..............................................................................

टॅग्स :Marathwadaमराठवाडाbusinessव्यवसायAurangabadऔरंगाबादNandedनांदेड