शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
4
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
5
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
6
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
7
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
8
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
9
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
10
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
11
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
12
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
13
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
14
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
15
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
16
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
17
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
18
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
19
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
20
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक

नांदेडची सेंद्रिय हळद पोहोचणार पंतप्रधानांच्या स्वयंपाक घरात; दोन शेतकऱ्यांना संवादाची संधीही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:59 IST

नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा; दोन शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींशी थेट संवाद साधण्याची संधी

- शरद वाघमारेमालेगाव (जिल्हा नांदेड): पंतप्रधान धन्य, धान्य, कृषी योजनेचा शुभारंभ ११ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते होणार आहे. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नांदेड येथील दोघांशी संवाद साधणार आहेत, ज्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

या संवादासाठी निवड झालेल्यांमध्ये विज्ञान केंद्र नांदेड येथील कृषी विद्या तज्ञ प्रा. संदीप जायेभाय आणि अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील कृषी भूषण भगवानभाई इंगोले यांचा समावेश आहे. या दोघांनाही पंतप्रधानांशी थेट चर्चा करण्याची मोलाची संधी मिळाली आहे.

'धन्य, धान्य, कृषी योजना': शेतकऱ्यांसाठी संजीवनीपंतप्रधान धन्य, धान्य, कृषी योजनेचा मुख्य उद्देश शेतीचे उत्पादन वाढवणे, पिकांमध्ये विविधता आणणे, सिंचन आणि धान्य साठवण सुविधा सुधारणे, तसेच शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित असून, पहिल्या टप्प्यात १०० जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

या योजनेतून खालील उद्दिष्ट्ये साध्य करण्याचा प्रयत्न आहे:- शेतकऱ्यांच्या शेती उत्पादकतेत वाढ करणे.- शेतकऱ्यांना विविध प्रकारची पिके घेण्यास प्रोत्साहन देणे.- पायाभूत सुविधा सुधारणे: सिंचनाच्या सोयी वाढवणे आणि धान्य साठवणुकीसाठी ग्रामपंचायत व गट स्तरावर सुविधा निर्माण करणे.- शेतकऱ्यांना कमी आणि दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मालेगावच्या शेतकऱ्यांची सेंद्रिय शेतीअर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील कृषी भूषण भगवान इंगोले हे आपल्या शेतीत सेंद्रिय पद्धतीचा वापर करतात. विषमुक्त शेती म्हणून त्यांच्या उत्पादनाची ओळख असून, त्यांनी उत्पादित केलेल्या सेंद्रिय पद्धतीच्या हळदीला राज्यभरात मोठी मागणी आहे. या कार्यक्रमादरम्यान भगवान इंगोले हे त्यांनी उत्पादित केलेली सेंद्रिय आणि विषमुक्त हळद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देणार आहेत.

नैसर्गिक शेती काळाची गरजआपल्या भावना व्यक्त करताना कृषीभूषण भगवान इंगोले म्हणाले, "शेतीत सातत्याने रासायनिक खतांचा वापर केल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. विषमुक्त नैसर्गिक शेती करणे ही काळाची गरज आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती लागवड करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट चर्चा करण्याची मला संधी मिळाली आहे, याचा मनस्वी आनंद आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded farmers to interact with PM Modi on agriculture scheme.

Web Summary : Two Nanded farmers will discuss agriculture with PM Modi during the launch of the 'Dhanya, Dhaanya, Krishi Yojana'. The scheme aims to boost farm productivity, diversify crops, improve irrigation, and provide farmers with loans, benefiting 100 districts initially.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीNandedनांदेड