शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडची सेंद्रिय हळद पोहोचणार पंतप्रधानांच्या स्वयंपाक घरात; दोन शेतकऱ्यांना संवादाची संधीही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:59 IST

नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा; दोन शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींशी थेट संवाद साधण्याची संधी

- शरद वाघमारेमालेगाव (जिल्हा नांदेड): पंतप्रधान धन्य, धान्य, कृषी योजनेचा शुभारंभ ११ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते होणार आहे. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नांदेड येथील दोघांशी संवाद साधणार आहेत, ज्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

या संवादासाठी निवड झालेल्यांमध्ये विज्ञान केंद्र नांदेड येथील कृषी विद्या तज्ञ प्रा. संदीप जायेभाय आणि अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील कृषी भूषण भगवानभाई इंगोले यांचा समावेश आहे. या दोघांनाही पंतप्रधानांशी थेट चर्चा करण्याची मोलाची संधी मिळाली आहे.

'धन्य, धान्य, कृषी योजना': शेतकऱ्यांसाठी संजीवनीपंतप्रधान धन्य, धान्य, कृषी योजनेचा मुख्य उद्देश शेतीचे उत्पादन वाढवणे, पिकांमध्ये विविधता आणणे, सिंचन आणि धान्य साठवण सुविधा सुधारणे, तसेच शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित असून, पहिल्या टप्प्यात १०० जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

या योजनेतून खालील उद्दिष्ट्ये साध्य करण्याचा प्रयत्न आहे:- शेतकऱ्यांच्या शेती उत्पादकतेत वाढ करणे.- शेतकऱ्यांना विविध प्रकारची पिके घेण्यास प्रोत्साहन देणे.- पायाभूत सुविधा सुधारणे: सिंचनाच्या सोयी वाढवणे आणि धान्य साठवणुकीसाठी ग्रामपंचायत व गट स्तरावर सुविधा निर्माण करणे.- शेतकऱ्यांना कमी आणि दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मालेगावच्या शेतकऱ्यांची सेंद्रिय शेतीअर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील कृषी भूषण भगवान इंगोले हे आपल्या शेतीत सेंद्रिय पद्धतीचा वापर करतात. विषमुक्त शेती म्हणून त्यांच्या उत्पादनाची ओळख असून, त्यांनी उत्पादित केलेल्या सेंद्रिय पद्धतीच्या हळदीला राज्यभरात मोठी मागणी आहे. या कार्यक्रमादरम्यान भगवान इंगोले हे त्यांनी उत्पादित केलेली सेंद्रिय आणि विषमुक्त हळद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देणार आहेत.

नैसर्गिक शेती काळाची गरजआपल्या भावना व्यक्त करताना कृषीभूषण भगवान इंगोले म्हणाले, "शेतीत सातत्याने रासायनिक खतांचा वापर केल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. विषमुक्त नैसर्गिक शेती करणे ही काळाची गरज आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती लागवड करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट चर्चा करण्याची मला संधी मिळाली आहे, याचा मनस्वी आनंद आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded farmers to interact with PM Modi on agriculture scheme.

Web Summary : Two Nanded farmers will discuss agriculture with PM Modi during the launch of the 'Dhanya, Dhaanya, Krishi Yojana'. The scheme aims to boost farm productivity, diversify crops, improve irrigation, and provide farmers with loans, benefiting 100 districts initially.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीNandedनांदेड