शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

नांदेड परिमंडळात ३५ हजार शेतक-यांच्या कृषिपंपाला भेटला  मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा आधार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 13:49 IST

राज्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने कृषीपंप वीज ग्राहकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू करून शेतक-यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देनांदेड जिल्ह्यासह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नांदेड परिमंडळामध्ये मार्च २०१७ अखेर एकूण २८२१७९ वीज ग्राहकांकडे १०८९.०३ कोटी रूपयांची मूळ थकबाकी आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रारंभी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती, आता ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. विहित मुदतीमध्ये या योजनेत सहभागी न होणा-या कृषीपंपधारक वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. 

नांदेड : राज्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने कृषीपंप वीज ग्राहकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू करून शेतक-यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. या योजनेत सहभागी होत नांदेड परिमंडळातील ३५ हजार ४१५ शेतक-यांनी चालू देयक भरून १७ नोव्हेंबरपर्यंत १० कोटी ८८ लक्ष रूपयांचे वीजबिल भरत योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रारंभी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती, आता ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आणखी पंधरा दिवसांचा दिलासा शेतक-यांना दिला आहे.

नांदेड जिल्ह्यासह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नांदेड परिमंडळामध्ये मार्च २०१७ अखेर एकूण २८२१७९ वीज ग्राहकांकडे १०८९.०३ कोटी रूपयांची मूळ थकबाकी असून व्याज व दंडाची रक्कम १०३२.३७ कोटी रुपये अशी एकूण २१२१.४० कोटी रूपयांची थकबाकी आहे. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होत नांदेड परिमंडळातील ३५ हजार ४१५ शेतक-यांनी चालू देयक भरून १७ नोव्हेंबरपर्यंत १० कोटी ८८ लक्ष रूपयांचे वीजबिल भरुन मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील  भोकर विभागातील २६०९ वीज ग्राहकांनी ७४ लक्ष ७८९ हजार रुपये, देगलूर विभागातील ११०८ वीज ग्राहकांनी ३० लक्ष ५६५  हजार रुपये, नांदेड ग्रामीण विभागातील २८३३ वीज ग्राहकांनी ११४ लक्ष ६७९ हजार रुपये तर नांदेड शहर विभागातील १६५७ वीज ग्राहकांनी ६२ लक्ष ३५४ हजार रूपयांचा भरणा केला आहे. नांदेड परिमंडळात सर्वाधिक भरणा हिंगोली जिल्ह्यात झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील २२१४६  वीज ग्राहकांनी ६ कोटी ७४ लाख रुपये जमा केले आहेत. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील ५०६६ वीज ग्राहकांकडील १ कोटी ३२ लाख रूपयांचा समावेश आहे.   

अशी आहे कृषी संजीवनी योजनाकृषीपंप ग्राहकांची मूळ थकबाकी रुपये ३० हजारांपेक्षा जास्त असल्यास ती १० समान हप्त्यांमध्ये प्रत्येक दीड महिन्यांच्या     कालावधीमध्ये भरणा करावी लागेल. ३० हजारांच्या आत थकबाकी असणा-यांना थकबाकी जमा करण्यासाठी ५ हप्ते देण्यात येणार आहेत. योजनेत सहभागी होण्यासाठी चालू वीजबिल भरून डिसेंबरपासून मूळ थकबाकीपैकी २० टक्के पहिला हप्ता भरावा लागेल. त्यानंतर मार्च, जून, सप्टेंबर व डिसेंबर २०१८ पर्र्यंत प्रत्येकी २० टक्क्यांसह पूर्ण थकबाकी महावितरणकडे भरावी लागणार आहे. विहित मुदतीमध्ये या योजनेत सहभागी न होणा-या कृषीपंपधारक वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेडMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारmahavitaranमहावितरण