शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आमराई फुलविण्यासाठी तरुणाई सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 00:02 IST

तरुणांनी आंब्याच्या कोय जमा करून वस्त्यांमध्ये, घरोघरी आणि मैदानात आंबा लागवड सुरू केली असून, येत्या पाच वर्षांत आमराई विकसित करण्याचे ध्येय बाळगले आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मोबाईल, इंटरनेटच्या दुनियेत वावरताना करियरकडे लक्ष ठेवणारी तरुणाई पर्यावरणबाबतही तेवढीच सजग असल्याचे दिसून येते. ही सजगता बाळगून पर्यावरण संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबविण्याची उदाहरणे समोर येतात. अशाच काही तरुणांनी चालविलेले एक अभियान सध्या लक्षवेधी ठरत आहे. हे अभियान आहे शहरात आमराई फुलविण्याचे. होय, या तरुणांनी आंब्याच्या कोय जमा करून वस्त्यांमध्ये, घरोघरी आणि मैदानात आंबा लागवड सुरू केली असून, येत्या पाच वर्षांत आमराई विकसित करण्याचे ध्येय बाळगले आहे.ग्रोविल फाऊंडेशनच्या माध्यमातून आमराई घडविण्याचे अभियान राबविण्यात आले आहे. या ग्रुपचा सक्रिय सदस्य आणि इंटेरियर डिझायनर असलेला आकाश जगताप यांनी या अभियानाबाबत लोकमतला माहिती दिली. या ग्रुपमध्ये सध्या १५० च्यावर सक्रिय सदस्य आहेत. या मित्रांनी उन्हाळा सुरू झाल्यापासून हे अभियान चालविले. आंबा खाल्ला किंवा घरी रस बनविला की कोय फेकून देण्याची सवय असते. ग्रुपच्या मित्रांनी सुरुवातीला या कोय जमा करण्यासह जवळचे मित्र, नातेवाईक यांना जागृत करण्याचे काम सुरू केले. आंब्याची कोय फेकण्याऐवजी ती घरी, आसपास, वस्तीत किंवा जवळच्या उद्यान, मैदानात लावावी असे आवाहन केले. पाहता पाहता १५० च्यावर सदस्य जुळले. यांनी मिळेल त्या ठिकाणी कोय लागवड केली.१५ ऑगस्टला महाअभियानविशेष म्हणजे या ग्रुपच्या सदस्यांकडे ९०० ते १००० आंब्याच्या कोय सध्या जमा आहेत. अभियानाशी जुळलेल्या कल्याण मित्र एनजीओच्या ग्रीष्मा नारनवरे यांनी ५०० रोपटी तर संकेत बाबरिया यांनी २०० रोपटी घरी तयार करून ठेवली आहेत. येत्या १५ ऑगस्टला शहरात आंबा लागवडीचे महाअभियान राबविणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. शिवाय महापालिका व नासुप्र यांच्या सहकार्याने शहरात एक-दोन ठिकाणाची निवड करून आमराई वाढविण्याचे ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अशी झाली जाणीवपक्षी निरीक्षणासाठी या ग्रुपचे सदस्य एकदा सोनेगावच्या जंगलात गेले. या जंगलात २०० च्यावर आंब्याची झाडे आहेत व त्यावर ४०० च्या आसपास प्रजातीच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. आंब्याच्या विशाल वृक्षांवर जैवविविधता वाढत असल्याची गोष्ट त्यांच्या लक्षात आली. शिवाय भरतवन वाचविण्याच्या अभियानात सहभागी असल्याने याप्रमाणे एखादे वन फुलविण्याच्या विचारातून हे अभियान सुरू केल्याचे आकाशने सांगितले.संगोपनाची जबाबदारीजमीन आणि पाण्याची उपलब्धता पाहून वृक्षारोपण केले जाईल. त्यानंतर तीन वर्षे या वृक्षांचे संगोपन करतील, अशा पाच स्थानिक सदस्यांची निवड केली जाईल. फेन्सिंग किंवा ट्री-गार्ड लावून संगोपन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवण्याचे काम करण्यात येईल.

टॅग्स :Mangoआंबाnagpurनागपूर