शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
7
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
8
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
9
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
10
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
11
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
12
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
13
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
14
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
15
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
16
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
17
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
18
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
19
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
20
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आमराई फुलविण्यासाठी तरुणाई सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 00:02 IST

तरुणांनी आंब्याच्या कोय जमा करून वस्त्यांमध्ये, घरोघरी आणि मैदानात आंबा लागवड सुरू केली असून, येत्या पाच वर्षांत आमराई विकसित करण्याचे ध्येय बाळगले आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मोबाईल, इंटरनेटच्या दुनियेत वावरताना करियरकडे लक्ष ठेवणारी तरुणाई पर्यावरणबाबतही तेवढीच सजग असल्याचे दिसून येते. ही सजगता बाळगून पर्यावरण संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबविण्याची उदाहरणे समोर येतात. अशाच काही तरुणांनी चालविलेले एक अभियान सध्या लक्षवेधी ठरत आहे. हे अभियान आहे शहरात आमराई फुलविण्याचे. होय, या तरुणांनी आंब्याच्या कोय जमा करून वस्त्यांमध्ये, घरोघरी आणि मैदानात आंबा लागवड सुरू केली असून, येत्या पाच वर्षांत आमराई विकसित करण्याचे ध्येय बाळगले आहे.ग्रोविल फाऊंडेशनच्या माध्यमातून आमराई घडविण्याचे अभियान राबविण्यात आले आहे. या ग्रुपचा सक्रिय सदस्य आणि इंटेरियर डिझायनर असलेला आकाश जगताप यांनी या अभियानाबाबत लोकमतला माहिती दिली. या ग्रुपमध्ये सध्या १५० च्यावर सक्रिय सदस्य आहेत. या मित्रांनी उन्हाळा सुरू झाल्यापासून हे अभियान चालविले. आंबा खाल्ला किंवा घरी रस बनविला की कोय फेकून देण्याची सवय असते. ग्रुपच्या मित्रांनी सुरुवातीला या कोय जमा करण्यासह जवळचे मित्र, नातेवाईक यांना जागृत करण्याचे काम सुरू केले. आंब्याची कोय फेकण्याऐवजी ती घरी, आसपास, वस्तीत किंवा जवळच्या उद्यान, मैदानात लावावी असे आवाहन केले. पाहता पाहता १५० च्यावर सदस्य जुळले. यांनी मिळेल त्या ठिकाणी कोय लागवड केली.१५ ऑगस्टला महाअभियानविशेष म्हणजे या ग्रुपच्या सदस्यांकडे ९०० ते १००० आंब्याच्या कोय सध्या जमा आहेत. अभियानाशी जुळलेल्या कल्याण मित्र एनजीओच्या ग्रीष्मा नारनवरे यांनी ५०० रोपटी तर संकेत बाबरिया यांनी २०० रोपटी घरी तयार करून ठेवली आहेत. येत्या १५ ऑगस्टला शहरात आंबा लागवडीचे महाअभियान राबविणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. शिवाय महापालिका व नासुप्र यांच्या सहकार्याने शहरात एक-दोन ठिकाणाची निवड करून आमराई वाढविण्याचे ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अशी झाली जाणीवपक्षी निरीक्षणासाठी या ग्रुपचे सदस्य एकदा सोनेगावच्या जंगलात गेले. या जंगलात २०० च्यावर आंब्याची झाडे आहेत व त्यावर ४०० च्या आसपास प्रजातीच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. आंब्याच्या विशाल वृक्षांवर जैवविविधता वाढत असल्याची गोष्ट त्यांच्या लक्षात आली. शिवाय भरतवन वाचविण्याच्या अभियानात सहभागी असल्याने याप्रमाणे एखादे वन फुलविण्याच्या विचारातून हे अभियान सुरू केल्याचे आकाशने सांगितले.संगोपनाची जबाबदारीजमीन आणि पाण्याची उपलब्धता पाहून वृक्षारोपण केले जाईल. त्यानंतर तीन वर्षे या वृक्षांचे संगोपन करतील, अशा पाच स्थानिक सदस्यांची निवड केली जाईल. फेन्सिंग किंवा ट्री-गार्ड लावून संगोपन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवण्याचे काम करण्यात येईल.

टॅग्स :Mangoआंबाnagpurनागपूर