शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात विसकटली संसाराची घडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:08 IST

नागपूर : जगामध्ये भारतीय विवाह संस्था सर्वांत बळकट मानली जाते; पण कोरोना काळात या संस्थेला तडे जात आहेत. गेल्या ...

नागपूर : जगामध्ये भारतीय विवाह संस्था सर्वांत बळकट मानली जाते; पण कोरोना काळात या संस्थेला तडे जात आहेत. गेल्या वर्षीपासून कौटुंबिक वाद वाढले आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेलेले पती-पत्नी घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेत आहेत.

कुटुंब न्यायालय विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष ॲड. श्याम अंभोरे यांनी या माहितीला दुजोरा दिला. कोरोनामुळे जिल्ह्यात विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परिणामी, अनेक जण बेरोजगार झाले आहेत. अनेकांचे वेतन कमी झाले आहे. त्यातून आर्थिक संकट कोसळले असून, त्याचा परिणाम कौटुंबिक शांततेवर झाला आहे. याशिवाय अनेक जण घरून काम करीत आहेत तर, काही काम बंद असल्यामुळे घरीच दिवस घालवत आहेत. ही बाबदेखील पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण करीत आहे. मुलांचा सांभाळ, घरातील कामे, कुटुंबातील ज्येष्ठांची देखभाल, आर्थिक ताळमेळ साधण्यात अपयश, खाण्या-पिण्याविषयी असमाधान अशा विविध कारणांवरून पती-पत्नीमध्ये भांडणे होत आहेत. त्यामुळे घटस्फोटासाठी न्यायालयात येणाऱ्या पती-पत्नीची संख्या गेल्या वर्षीपासून वाढली आहे, असे ॲड. अंभोरे यांनी सांगितले.

---------------

यामुळे होतात संसार उद्ध्वस्त

स्वत:बद्दलचा अहंकार, एकमेकांना कमी लेखणे, जोडीदाराने आपल्या मनासारखे वागावे असा आग्रह धरणे, एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करणे, सहनशीलतेचा अभाव, विभक्त कुटुंब पद्धती, एकमेकांना पुरेसा वेळ देण्यास टाळाटाळ, विवाहबाह्य संबंध, शारीरिक-मानसिक छळ, एकमेकांच्या नातेवाइकांचा अनादर करणे इत्यादी बाबी संसार उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरत आहेत.

--------------------

छळामुळे तोडले नाते

अजनी येथील एका पत्नीने सततच्या छळाला कंटाळून पतीसोबतचे वैवाहिक संबंध तोडले. पती एका खासगी कंपनीत काम करतो. कंपनीने कोरोनामुळे त्याला घरून काम करण्यास सांगितले होते. त्यामुळे तो दिवस-रात्र घरीच राहत होता. दरम्यान, तापट स्वभावामुळे तो पत्नीचा कोणत्या ना कोणत्या कारणावरून छळ करीत होता. पत्नीने बरेच दिवस छळ सहन केला; परंतु छळ असह्य झाल्यानंतर तिने घटस्फोट घेतला.

----------------------

मोबाइलच्या वेडामुळे घटस्फोट

पत्नी मोबाइलच्या आहारी गेली असल्याने आणि वारंवार समजावल्यानंतरही तिने स्वत:च्या वागण्यात बदल न केल्यामुळे एका पतीने घटस्फोट घेतला. संबंधित पती व्यावसायिक असून, कोरोनामुळे तो सध्या बराच वेळ घरी घालवीत आहे. दरम्यान, त्याला पत्नीचे मोबाइल वेड खटकायला लागले. त्यावरून भांडणे वाढली. पत्नी माघार घेण्यास तयार नव्हती. ती पतीचा अनादर करीत होती. करिता, पतीने विवाह संबंध संपवले.

----------------

एकमेकांना समजून घ्यावे

न्यायालयीन प्रक्रियेत थेट विभक्त होण्यापूर्वी एकमेकांना समजून घेण्यास वेळ दिला जातो. या वेळेत पती-पत्नीने भांडणांच्या कारणांचा विचार करावा. भांडणाची ८० टक्के कारणे अगदीच क्षुल्लक असतात. त्यामुळे जवळच्या व्यक्तीशी चर्चा करून वाद संपवावा. सध्या पुरुषांसोबत स्त्रियाही काम करणाऱ्या आहेत. त्यामुळे एकमेकांच्या कामाचे स्वरूप समजावे लागेल. महिलांनीही कमावत्या पुरुषावर असलेला दबाव लक्षात घेऊन नियोजन करावे. एकमेकांच्या भावना समजून घ्याव्यात. शक्यतो कामातही सहकार्याची भूमिका घ्यावी. मित्र आणि सोशल कनेक्शन कायम ठेवावे.

- डॉ. आभा बंग, मानसोपचार तज्ज्ञ.