शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

जागतिक वन दिन! राज्यातील वनसंपदेची भिस्त विदर्भावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:38 IST

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात ही टक्केवारी २० टक्क्यावर आहे. यामध्ये एकट्या विदर्भाची आकडेवारी ४० टक्कच्या वर असून विदर्भ वगळता राज्याची टक्केवारी आणखी खाली येणारी आहे.

ठळक मुद्देवनक्षेत्रात १४९ चौ.कि.मी पर्यंत घटजंगलवाढीचा दावा भ्रम

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात वनसंपदेत वाढ होण्यासाठी राज्य शासनाने गेल्या दोन वर्षापासून वृक्षलागवडीचे अभियान राबविले आहे. यामुळे सकारात्मक परिणाम दिसून येत असले तरी, हे परिणाम केवळ नागरी भागात दिसून येत आहेत. जंगल क्षेत्राची मात्र सातत्याने घट होत असल्याचा अहवाल डेहराडूनच्या वनसर्वेक्षण संस्थेने दिला आहे. २०१७ मध्ये ही घट १४९ चौरस किलोमीटर पर्यंत गेल्याचे धक्कादायक आकडे या संस्थेने दिले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात ही टक्केवारी २० टक्क्यावर आहे. यामध्ये एकट्या विदर्भाची आकडेवारी ४० टक्कच्या वर असून विदर्भ वगळता राज्याची टक्केवारी आणखी खाली येणारी आहे. त्यामुळे राज्याची एकूणच भिस्त ही आजही विदर्भावरच अवलंबून आहे, ही बाब मान्य करावी लागेल.महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र हे ३ लाख ७ हजार ७१३ चौ.कि.मी. एवढे आहे. २००९ च्या सर्वेक्षणात वनक्षेत्र ५०६५० चौ.किमी. होते, जे २०११ च्या आकडेवारीमध्ये ५०६४६ चौ.कि.मी. राहिले तर २०१५ मध्ये ते ५०६२८ चौ.कि.मी. पर्यंत घटल्याची नोंद आहे. अत्यंत घनदाट जंगलाच्या क्षेत्रातही चिंताजनक घट झाली आहे. २०१५ पासून १६ चा.कि.मी, आठ चौ.कि.मी व २०१७ मध्ये २४ चौ.कि.मी.ची घट झाली आहे. मध्यम दाट प्रकारात मोडणाऱ्या जंगलातही अशीच घट दर्शविणारी आकडेवारी समोर आली आहे. या सर्व प्रकारातील आकडेवारीनुसार गेल्या ५ वर्षात अत्यंत घनदाट, मध्यम घनदाट जंगलाच्या क्षेत्रात १४९ चौ.कि.मी. पर्यंत घट झाल्याचे सर्वेक्षणात नमूद केले आहे.वनसंपदेची भिस्त ही विदर्भावर अवलंबून असली तरी विदर्भातील जंगल क्षेत्रातच घट होत असल्याचे डेहराडूनच्या संस्थेच्या अहवालातून स्पष्ट होते. महाराष्ट्रामध्ये जे ‘अत्यंत घनदाट’ व सर्वसाधारण दाट जंगल प्रामुख्याने राज्यातील एकूण ३५ जिल्ह्यांपैकी ७ डोंगराळ जिल्हे व १२ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये आहेत. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ४३.४९ टक्के वनक्षेत्र हे या जिल्ह्यांमध्ये एकवटले आहे. यात विदर्भाचा वाटा मोठा आहे. २०११ च्या अहवालात ७ डोंगराळ जिल्ह्यांमध्ये ६ चौ. कि.मी. वनक्षेत्र कमी झाले आहे.

आताच्या २०१७ च्या अहवालात विदर्भातील अमरावती (९ चौ.कि.मी), चंद्रपूर (१२ चौ.कि.मी), गडचिरोली (१३ चौ.कि.मी.), अकोला (४ चौ.कि.मी.), बुलडाणा (७ चौ.कि.मी.) व यवतमाळ (६ चौ.कि.मी.) अशी भयावह घट नोंदविण्यात आली आहे.महाराष्ट्रात वनाच्छादनात झालेल्या घसरणीमागे असलेली करणेही या अहवालात अधोरेखित केली आहे. वनक्षेत्रावर शेतीसाठी होत असलेले अतिक्रमण हे एक कारण आहे. याशिवाय कोणत्याही प्रकल्पासाठी वनजमीनच हवी हा अट्टाहासही कारणीभूत आहे. २००७ ते २०१३ या कालावधीत महाराष्ट्रात ९८३८० हेक्टर वनजमीन शेतीसाठी वाटण्यात आली. हे सत्र अद्यापही थांबलेले नाही. २००५ ते २०११ या कालावधीत रेल्वेमार्ग, महामार्ग, खाणी, वीजनिर्मिती प्रकल्प आदी सामूहिक विकासाच्या प्रकल्पांसाठी ६६२७ हेक्टर वनजमीन वळविण्यात आल्याची शासकीय आकडेवारी उपलब्ध आहे. येणाऱ्या काळात वनविभागाला व राजकीय नेतृत्वाला या दोन्ही बाबींची गंभीर दखल घ्यावी लागेल.- किशोर रिठे,केंद्रीय वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य

टॅग्स :forestजंगल