शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जागतिक नेत्रदान दिवस; नेत्रपेढ्यांना सक्षम करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 10:35 IST

भारतात २२५ नेत्रपेढ्या आहेत, यातील केवळ १५ नेत्रपेढ्याच क्षमतेने काम करीत असल्याचे वास्तव आहे. ज्या नेत्रपेढ्या चांगले काम करतात त्यांना शासकीय व खासगी हॉस्पिटल जोडून लक्ष्य दिल्यास अंधत्व निवारणाला गती येणे शक्य असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञाचे मत आहे.

ठळक मुद्देअंधत्व निवारण सत्कर्माला खीळबुबुळ मिळाले ५४०, १३० लोकांचे अंधत्व दूर झाले

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुबुळासंबंधी येणारे अंधत्वाचे प्रमाण हे जगभरात चौथे मोठे कारण आहे. भारतात प्रतिवर्ष दरहजारामागे ७.३ लोक मृत्युमुखी पडतात, मात्र यातील ५२ हजार नेत्रदान करतात. गेल्यावर्षी राज्यात केवळ ५ हजार लोकांनीच नेत्रदान केले. ते प्रत्यारोपणासाठी गरज असलेल्या बुबुळांपेक्षा खूप कमी आहे. नागपूर जिल्ह्याचे चित्रही फारसे चांगले नाही. ‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत’ २०१७-१८ या वर्षांत नेत्रदानातून ५४० बुबुळ मिळाले परंतु १३० रुग्णांमध्येच प्रत्यारोपण होऊ शकले. विशेष म्हणजे, नागपूर विभागात सहा नेत्रपेढ्या आहेत परंतु मेडिकल व महात्मे नेत्रपेढी सोडल्यास इतरांकडून प्रभावी कामकाज होत नसल्याने अंधत्व निवारण सत्कर्माला खीळ बसत आहे.मोतीबिंदू, काचबिंदू, बुबुळ खराब होणे, जीवनसत्वाची कमतरता, मधुमेह, अपघात आदी कारणांमुळे ४० दशलक्ष लोकांना अंधत्व येते. भारतात हे प्रमाण १६ दशलक्ष आहे. यात बुबुळ खराब झाल्यामुळे अंधत्व आलेल्या लोकांची संख्या ११ लाख आहे. भारतात गेल्यावर्षी २६ हजार बुबुळ प्रत्यारोपण झाले. परंतु दरवर्षी याच्या दुप्पट म्हणजे ४० हजार रुग्णांची भर पडते. हे प्रमाण कमी करण्यासाठी दरवर्षी २ लाख ५० हजार बुबुळांची गरज आहे. मात्र ५० हजारच बुबुळ मिळतात, त्यातही ४० टक्के बुबुळ विविध कारणांमुळे वापरणे शक्य होत नाही. भारतात २२५ नेत्रपेढ्या आहेत, यातील केवळ १५ नेत्रपेढ्याच क्षमतेने काम करीत असल्याचे वास्तव आहे. ज्या नेत्रपेढ्या चांगले काम करतात त्यांनाच ठेवून त्यांना शासकीय व खासगी हॉस्पिटल जोडून लक्ष्य दिल्यास अंधत्व निवारणाला गती येणे शक्य असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञाचे मत आहे.

मेयोमध्ये केवळ ९ प्रत्यारोपणमेयोच्या नेत्ररोग विभागाला आरोग्य विभागाने ५० बुबुळ संग्रह व ३० बुबुळ प्रत्यारोपणाचे लक्ष्य दिले होते. मात्र, आवश्यक सोई व वरिष्ठांसह निवासी डॉक्टरांचा मोठा ताफा असतानाही केवळ नऊ बुबुळ प्रत्यारोपण झाले.

मेडिकल, महात्मे नेत्रपेढीमध्ये सर्वाधिक बुबुळ प्रत्यारोपणशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागाच्या नेत्रपेढीला २०१७-१८ वर्षात ७४ बुबुळ मिळाले. यातून ४८ लोकांचे अंधत्व दूर करण्यात आले. महात्मे नेत्रपेढीला १८२ बुबुळ मिळाले यातून ३६ लोकांचे अंधत्व दूर करण्यात आले. आय केअर एनकेपी साळवे इन्स्टिट्यूटला ९६ बुबुळ मिळाले यातून २० लोकांचे तर सुरज आय इन्सिट्यूटला १७ बुबुळ मिळून ८ लोकांचेच अंधत्व दूर करण्यात यश आले.

गेल्या तीन वर्षांपासून लक्ष्य अपूर्णच‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत’ २०१५-१६ या वर्षांत सहा नेत्रपेढ्यांसह तीन रुग्णालयांना ६५० बुबुळ प्रत्यारोपणाचे लक्ष्य दिले होते. यांना ४५२ बुबुळ मिळाले यातील ९५ लोकांचे अंधत्व दूर झाले. २०१६-१७मध्ये ६५० लक्ष्य दिले होते. ५६९ बुबुळ मिळून ९९ लोकांचे अंधत्व दूर झाले. गेल्या वर्षी म्हणजे २०१७-१८मध्ये लक्ष्य तेवढेच होते, ५४० बुबुळ मिळाले असलेतरी १३० लोकांनाच दृष्टी मिळू शकली.

‘नॅशनल कॉर्निअल ग्रीड’ झाल्यास नेत्रपेढ्या एका छताखाली येतील. त्यांच्या कामकाजात सुसूत्रता येईल. कोणत्या नेत्रपेढीत किती बुबुळ उपलब्ध आहेत, प्रतीक्षा यादी किती लोकांची आहे, याची माहिती उपलब्ध होऊन जास्तीतजास्त बुबुळ प्रत्यारोपण होतील.- डॉ. अशोक मदान, विभाग प्रमुख, नेत्ररोग विभाग, मेडिकल.

टॅग्स :Healthआरोग्य