शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

कामगारांनी टाकला रेल्वेगाड्यांच्या सफाईवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 19:25 IST

रेल्वेगाड्यांच्या सफाईचे कंत्राट रेल्वे प्रशासनाने एच. एस. सर्व्हिस प्रोव्हायडरला दिले. या कंपनीने ३५ कामगार कामावर ठेवले. लॉकडाऊनच्या काळात २२ मार्चपासून या कामगारांनी रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांच्या सफाईची जबाबदारी पार पाडली. परंतु संबंधित कंपनीने मार्च महिन्यापासूनचे वेतन न दिल्यामुळे सोमवारी या कामगारांनी संप पुकारून रेल्वेगाड्यांच्या सफाईवर बहिष्कार टाकला. त्यामुळे दिवसभरात एकाही रेल्वेगाडीची सफाई होऊ शकली नाही.

ठळक मुद्दे‘सीटीएस’ कामगारांचा संप : तीन महिन्यांपासून वेतन अडकले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेगाड्यांच्या सफाईचे कंत्राट रेल्वे प्रशासनाने एच. एस. सर्व्हिस प्रोव्हायडरला दिले. या कंपनीने ३५ कामगार कामावर ठेवले. लॉकडाऊनच्या काळात २२ मार्चपासून या कामगारांनी रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांच्या सफाईची जबाबदारी पार पाडली. परंतु संबंधित कंपनीने मार्च महिन्यापासूनचे वेतन न दिल्यामुळे सोमवारी या कामगारांनी संप पुकारून रेल्वेगाड्यांच्या सफाईवर बहिष्कार टाकला. त्यामुळे दिवसभरात एकाही रेल्वेगाडीची सफाई होऊ शकली नाही.नागपूर रेल्वेस्थानकावर ‘क्लीन ट्रेन स्टेशन’ अंतर्गत सफाईचे कंत्राट एच. एस. सर्व्हिस प्रोव्हायडर या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने दोन पाळ्यामध्ये ७० कर्मचाऱ्यांकडून ठरवून दिलेल्या रेल्वेगाड्यांची सफाई करणे अपेक्षित आहे. परंतु कंपनीने केवळ ३५ कामगारच कामावर ठेवले आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ५ आणि दुपारी २ ते रात्री १० या दोन पाळ्यात प्रत्येकी १७ कामगार काम करतात. मार्च महिन्यात रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यान, कामगारांसाठी चालविण्यात येणाऱ्या श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरू करण्यात आली. लॉकडाऊनमध्ये दररोज जवळपास २२ रेल्वेगाड्यांच्या सफाईची जबाबदारी पार पाडली. लॉकडाऊनमध्ये कंपनीने सफाई कामगारांना मास्क, सॅनिटायझरचा पुरवठाही केला नाही. याशिवाय तीन महिन्यांचे वेतनही दिले नाही. सातत्याने वेतनाची मागणी करूनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. तीन महिन्यांचे वेतन अडकल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे सोमवारी या कामगारांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला. सर्व कामगार ‘डीआरएम’ कार्यालयात पोहचले. तेथे त्यांनी कंपनीचे व्यवस्थापक पुरण काळे यांना वेतनाची मागणी केली. त्यानंतर कामगारांचे दोन प्रतिनिधी रेल्वेचे अधिकारी कमलेश कुमार यांना भेटले. त्यांनी काम सुररू ठेवा, बिल पास झाल्यानंतर वेतन मिळेल असे सांगितले. परंतु तीन महिन्यांचे वेतन अडकल्यामुळे कामगार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. वेतन मिळाल्याशिवाय काम सुरू करणार नसल्याची माहिती विजय राऊत, कुणाल जनबंधू, मोसम दहाटे, रितीक पिलारे, रितेश जनबंधू, निकेश खरे, प्रताप खरे, राम डोंगरे, तुषार मानमोडे, रवी ठाकरे, अमन डोंगरे यांनी दिली. संपामुळे कामगारांनी एकाही गाडीची स्वच्छता केली नाही. अखेर रेल्वे प्रशासनाला इतर कर्मचारी सफाईच्या कामासाठी नेमण्याची पाळी आली.वेतनही मिळते कमी‘एच. एस. सर्व्हिसेसने नियमानुसार कामगारांना एका दिवसाचे ६०५ रुपये देण्याची गरज आहे. परंतु कंपनी केवळ ३०५ रुपयेच देत असल्याचा आरोप कामगारांनी केला. याशिवाय दिवाळीचा बोनस आणि इतर सुविधाही देण्यात येत नाहीत. वेतनवाढीची मागणी केल्यास कंपनीचा व्यवस्थापक कामावरून काढून टाकण्याची धमकी देत असल्याचे कामगारांनी सांगितले.लवकर देऊ कामगारांचे वेतन‘लॉकडाऊनमुळे कामगारांच्या वेतनाची बिले अडकली होती. परंतु त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच कामगारांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.’एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :railwayरेल्वेEmployeeकर्मचारीagitationआंदोलन