शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत टँकची सफाई करताना मजुराचा गुदमरून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:47 IST

एका केमिकल कंपनीतील भूमिगत आॅईल टँकची सफाई करताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने तीन मजूर गुदमरून बेशुद्ध झाले. उपचारादरम्यान त्यातील एकाचा करुण अंत झाला तर दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान कामठी मार्गावरील भिलगावच्या गोवर्धन एनर्जी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स प्रा. लि. या कंपनीत ही घटना घडली.

ठळक मुद्देविषारी वायूमुळे दोघे गंभीर : यशोधरानगरातील कंपनीत घडली घटना

लोकमत न्यूज नटवर्कनागपूर : एका केमिकल कंपनीतील भूमिगत आॅईल टँकची सफाई करताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने तीन मजूर गुदमरून बेशुद्ध झाले. उपचारादरम्यान त्यातील एकाचा करुण अंत झाला तर दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान कामठी मार्गावरील भिलगावच्या गोवर्धन एनर्जी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स प्रा. लि. या कंपनीत ही घटना घडली.चोरकू ऊर्फ छोटू (रा. गोपाल गंज, जि. सिवनी, मध्यप्रदेश) असे मृत मजुराचे नाव आहे. तर, हरिप्रसाद ऊर्फ राजू डेहरिया (३८) आणि कृष्णकुमार झारिया (३८) गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल असलेल्या मजुरांची नावे आहेत.सूत्रानुसार ही कंपनी नीलेश महाजन, राहुल आगोजी आणि कपिल चांडक हे भागीदारीत चालवतात. कंपनी परिसरात जमिनीच्या आत आॅईलची १० हजार लिटरची टँक आहे. यात आॅईल टाकण्यासाठी एक गोलाकार झाकण आहे. ठेकेदार प्रकाश लिल्लारे यांना कंपनी आणि टँकच्या सफाईचे काम देण्यात आले होते. सोमवारी सफाई करण्यासाठी टँकला ९० टक्के खाली करण्यात आले होते. दुपारी १२ वाजता टँकचे झाकण उघडण्यात आले. सर्वप्रथम चोरकू ऊर्फ छोटू टँकमध्ये उतरला. बरेच वेळा आवाज देऊनही तो बाहेर आला नाही. त्यामुळे राजू टँकमध्ये उतरला. तो देखील बराच वेळ होऊन बाहेर आला नाही. वारंवार आवाज देऊन त्यांच्याकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने कृष्णकुमार टँकमध्ये उतरला अन् तो देखील चोरकू तसेच राजूसारखा गुदमरून बेशुद्ध पडला. दरम्यान, टँकच्या सफाईसाठी गेलेले तीन मजूर बराच वेळ होऊनही टँकबाहेर न आल्याने आणि मोठमोठ्याने आवाज देऊनही त्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांनी अग्निशमन दलाला सूचित केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन टँकमधून बेशुद्धावस्थेत असलेल्या तिघांनाही बाहेर काढले. राजू व कृष्णकुमारला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चोरकूला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सायंकाळी ६.३० ते ७ च्या सुमारास चोरकूला मृत घोषित केले. या घटनेमुळे कंपनी परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. सफाईचे काम हाती घेण्यात आलेली टँक अनेक दिवसांपासून बंद होती. त्यामुळे टँकमध्ये विषारी वायू तयार झाला असावा आणि मजूर गुदमरून बेशुद्ध झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज संबंधितांनी बांधला आहे.पायात दोरीचा फास अडकवून बाहेर काढलेदरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन अधिकारी एस. बी. रामगुनावार आपल्या सहकाºयांसोबत कंपनीत पोहोचले. टँकमध्ये तिघेही बेशुद्ध पडल्याचा अंदाज आल्यामुळे आतमध्ये विषारी वायू असावा, असा त्यांना संशय आला. त्यामुळे जवानांना टँकमध्ये उतरविणे जीवाशी खेळण्यासारखे आहे, हे लक्षात घेत त्यांनी मजुरांना बाहेर काढण्यासाठी युक्ती लढविली. त्यानंतर दोरीचा फास तयार करून तो मजुरांच्या पायात अडकवण्यात आला आणि त्यांना बाहेर काढण्यात आले.व्यवस्थापक आणि ठेकेदार गजाआडतिघेही मजूर अप्रशिक्षित होते. याची माहिती असूनही त्यांचे जीव धोक्यात टाकून त्यांना कुठलीही सुरक्षा उपलब्ध न करता कंपनी व्यवस्थापनाने त्यांना टँकमध्ये उतरवले. त्याचमुळे एका गरीब मजुराचा मृत्यू झाला आणि दोघे मृत्यूशी झुंज देत आहेत. या दुर्घटनेला कंपनीचा व्यवस्थापक अमित महाजन (४०, रा. कामठी) आणि सफाईचे कंत्राट घेणारा प्रकाश लिल्लारे (३८, रा. पार्वतीनगर, वांजरा) या दोघांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा अंदाज बांधून यशोधरानगर पोलिसांनी या दोघांविरुद्ध कलम ३०८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. रात्री या दोघांनाही अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :nagpurनागपूरDeathमृत्यू